शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर मनपाद्वारे इरई धरणातील पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 18, 2017 00:49 IST

इरई धरणातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्या आहेत.

जलवाहिनीला गळती : दुरूस्तीकडे डोळझाकदुर्गापूर : इरई धरणातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्या आहेत. या गळत्या कित्येक वर्षांपासून तशाच कायम असल्याने अर्ध्याअधिक पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु त्या दुरूस्त करण्याकडे मनपाने डोळेझाक चालविली आहे.वीज निर्मितीकरिता चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने खास धरणाचे बांधकाम केले आहे. यातूनच मनपा चंद्रपूर शहरासाठी पाण्याची उचल करीत असते. याकरिता इरई धरणापासून तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १२०० एम.एम. ची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. हे पाणी ११० हार्स पॉवरच्या दोन पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविले जाते. प्रचंड गतीने पाणी जात असताना धरणाजवळच असलेल्या वीज केंद्राच्या फ्लो मीटर रूमपासून किटाळी गावापर्यंत कित्येक वर्षांपासून ठिकठिकाणी पाण्याखाली गळत्या ‘जैसे थे’च आहेत. त्या गळत्या तरोली गवताने झाकल्या गेल्या आहेत. एवढ्या भागात जिकडेतिकडे पाणी साचलेले दिसून येते. त्यानंतर कोयना गेट ते खत्री कॉलेजपर्यंतही गळत्या असून एअर व्हॉल्हही आहेत. त्या गळत्यांमधून आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात पाणी वाहून जात आहे.प्रत्येक जलवाहिनीवर धरणाजवळ धरणातून निघणारे पाणी व प्रत्यक्ष वीज केंद्रात पोहोचणारे पाण्याचे मोजमाप करणारे फ्लो मीटर बसविलेले आहेत. हे मीटर मनपाने बसविलेले आहेत. सध्या धरणातील पाण्याची पातळी २०५.३२५ मीटर असून त्यात ८६.३५ दलघमी पाणीसाठा आहे. म्हणजे ५४ टक्के पाणी धरणात अद्यापही शिल्लक आहे. मात्र गळत्या, पाण्याचा अपव्यय व बाष्पिभवनामुळे दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गळत्यामधून २४ तास सतत पाणी वाहून जात असल्याने धरणातील जलसाठ्याला जबर फटका बसत आहे. गेल्या पावसाळ्यात धरण तुडूंब भरले होते. त्यामुळे यंदा एवढा जलसाठा शिल्लक आहे. २०१० मध्ये पाऊस न आल्याने धरणाची छोट्या तळ्यासारखी अवस्था झाली होती. त्या भीषण संकटाचा महानगरपालिकेला विसर पडला आहे. (वार्ताहर)