शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

चंद्रपूर मनपाद्वारे इरई धरणातील पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 18, 2017 00:49 IST

इरई धरणातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्या आहेत.

जलवाहिनीला गळती : दुरूस्तीकडे डोळझाकदुर्गापूर : इरई धरणातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्या आहेत. या गळत्या कित्येक वर्षांपासून तशाच कायम असल्याने अर्ध्याअधिक पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु त्या दुरूस्त करण्याकडे मनपाने डोळेझाक चालविली आहे.वीज निर्मितीकरिता चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने खास धरणाचे बांधकाम केले आहे. यातूनच मनपा चंद्रपूर शहरासाठी पाण्याची उचल करीत असते. याकरिता इरई धरणापासून तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १२०० एम.एम. ची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. हे पाणी ११० हार्स पॉवरच्या दोन पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविले जाते. प्रचंड गतीने पाणी जात असताना धरणाजवळच असलेल्या वीज केंद्राच्या फ्लो मीटर रूमपासून किटाळी गावापर्यंत कित्येक वर्षांपासून ठिकठिकाणी पाण्याखाली गळत्या ‘जैसे थे’च आहेत. त्या गळत्या तरोली गवताने झाकल्या गेल्या आहेत. एवढ्या भागात जिकडेतिकडे पाणी साचलेले दिसून येते. त्यानंतर कोयना गेट ते खत्री कॉलेजपर्यंतही गळत्या असून एअर व्हॉल्हही आहेत. त्या गळत्यांमधून आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात पाणी वाहून जात आहे.प्रत्येक जलवाहिनीवर धरणाजवळ धरणातून निघणारे पाणी व प्रत्यक्ष वीज केंद्रात पोहोचणारे पाण्याचे मोजमाप करणारे फ्लो मीटर बसविलेले आहेत. हे मीटर मनपाने बसविलेले आहेत. सध्या धरणातील पाण्याची पातळी २०५.३२५ मीटर असून त्यात ८६.३५ दलघमी पाणीसाठा आहे. म्हणजे ५४ टक्के पाणी धरणात अद्यापही शिल्लक आहे. मात्र गळत्या, पाण्याचा अपव्यय व बाष्पिभवनामुळे दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गळत्यामधून २४ तास सतत पाणी वाहून जात असल्याने धरणातील जलसाठ्याला जबर फटका बसत आहे. गेल्या पावसाळ्यात धरण तुडूंब भरले होते. त्यामुळे यंदा एवढा जलसाठा शिल्लक आहे. २०१० मध्ये पाऊस न आल्याने धरणाची छोट्या तळ्यासारखी अवस्था झाली होती. त्या भीषण संकटाचा महानगरपालिकेला विसर पडला आहे. (वार्ताहर)