शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चंद्रपूर मनपाद्वारे इरई धरणातील पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 18, 2017 00:49 IST

इरई धरणातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्या आहेत.

जलवाहिनीला गळती : दुरूस्तीकडे डोळझाकदुर्गापूर : इरई धरणातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्या आहेत. या गळत्या कित्येक वर्षांपासून तशाच कायम असल्याने अर्ध्याअधिक पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु त्या दुरूस्त करण्याकडे मनपाने डोळेझाक चालविली आहे.वीज निर्मितीकरिता चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने खास धरणाचे बांधकाम केले आहे. यातूनच मनपा चंद्रपूर शहरासाठी पाण्याची उचल करीत असते. याकरिता इरई धरणापासून तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १२०० एम.एम. ची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. हे पाणी ११० हार्स पॉवरच्या दोन पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविले जाते. प्रचंड गतीने पाणी जात असताना धरणाजवळच असलेल्या वीज केंद्राच्या फ्लो मीटर रूमपासून किटाळी गावापर्यंत कित्येक वर्षांपासून ठिकठिकाणी पाण्याखाली गळत्या ‘जैसे थे’च आहेत. त्या गळत्या तरोली गवताने झाकल्या गेल्या आहेत. एवढ्या भागात जिकडेतिकडे पाणी साचलेले दिसून येते. त्यानंतर कोयना गेट ते खत्री कॉलेजपर्यंतही गळत्या असून एअर व्हॉल्हही आहेत. त्या गळत्यांमधून आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात पाणी वाहून जात आहे.प्रत्येक जलवाहिनीवर धरणाजवळ धरणातून निघणारे पाणी व प्रत्यक्ष वीज केंद्रात पोहोचणारे पाण्याचे मोजमाप करणारे फ्लो मीटर बसविलेले आहेत. हे मीटर मनपाने बसविलेले आहेत. सध्या धरणातील पाण्याची पातळी २०५.३२५ मीटर असून त्यात ८६.३५ दलघमी पाणीसाठा आहे. म्हणजे ५४ टक्के पाणी धरणात अद्यापही शिल्लक आहे. मात्र गळत्या, पाण्याचा अपव्यय व बाष्पिभवनामुळे दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गळत्यामधून २४ तास सतत पाणी वाहून जात असल्याने धरणातील जलसाठ्याला जबर फटका बसत आहे. गेल्या पावसाळ्यात धरण तुडूंब भरले होते. त्यामुळे यंदा एवढा जलसाठा शिल्लक आहे. २०१० मध्ये पाऊस न आल्याने धरणाची छोट्या तळ्यासारखी अवस्था झाली होती. त्या भीषण संकटाचा महानगरपालिकेला विसर पडला आहे. (वार्ताहर)