शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

तपाळ योजनेचा पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: February 26, 2016 01:03 IST

तपाळ पाणी पुरवठा योजनेच्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केल्याने नागभीडसह ११ गावांना या योजनेमार्फत होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.

घनश्याम नवघडे नागभीडतपाळ पाणी पुरवठा योजनेच्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केल्याने नागभीडसह ११ गावांना या योजनेमार्फत होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी या गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल सुरु झाले आहेत.नागभीड, नवखळा, चिखलपरसोडी, देवटेक, बाळापूर, ढोरपा, मौशी, या नागभीड तालुक्यातील आणि तोरगाव (खुर्द), तोरगाव (बुज.) बेलगाव आणि तपाळ या ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. १९९९ मध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हा परिषदेकडे या योजनेची देखभाल दुरुस्तीचे काम असले तरी जिल्हा परिषदेने या कामासाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.योजनेच्या देखभालीसाठी १३ ते १४ वर्षापासून १४ कामगार कार्यरत आहेत. या काळात अनेक कंत्राटदार बदलले असले तरी कामागार मात्र तेच आहेत. असे या कामावरील कामगारांचे म्हणणे आहे. या कामगारांना शासकीय नियमानुसार मेहनताना देण्यात यावा व हात मेहनताना बँकेमार्फत देण्यात यावा, अशी या कामगारांची असली तरी महिन्याचे साडेपाच हजार रुपयात या कामगारांची बोळवण करण्यात येत आहे आणि हा मेहनताना बँकेमार्फत जमा न करता नगदी स्वरूपात देण्यात येत आहे.कामगार ही मागणी आॅक्टोबर १५ पासून ही करीत असले तरी कामगारांच्या या मागण्या कोणीच मनावर घेतल्या नाही. त्यामुळे कामगार संतापले आणि त्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. शेवटी २२ फेब्रुवारीपासून सर्व कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले. या योजनेत मुख्य आणि महत्वाची भूमिका जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची असली तरी कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष न घालता कंत्राटदाराचे हित कसे साधता येईल, याकडेच जि.प.च्या अधिकाऱ्यांचा कल असल्याचा कामगारांचा आरोप आहे.गेल्या तीन दिवसांपासून या अकरा गावांचा पाणी पुरवठा ठप्प आहे. त्यामुळे या अकरा गावात नागरिकांचे पाण्याविना हाल सुरु आहेत. त्यातल्या त्यात नागभीडची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. नागभीडमध्ये ४० टक्के लोकांकडे पाण्याची खासगी व्यवस्था असली तरी पिण्यासाठी मात्र १०० टक्के लोक तपाळच्याच पाण्याचा वापर करतात, हे वास्तव आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे पाणी बंद असल्याने नागभीडमध्ये लोकांचे अतिशय हाल सुरु असले संबंधितांकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही, हे विशेष.