शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

देलनवाडी येथील पाण्याचा झरा चमत्कार नसून नैसर्गिक स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 01:06 IST

सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे श्री. ऋषी देवस्थानच्या टेकडीच्या पायथ्याशी पाण्याचा झरा लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली.

थेंब-थेंब पाणी झिरपतेय : बघ्यांची गर्दी संपता संपेना दिलीप मेश्राम  नवरगाव सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे श्री. ऋषी देवस्थानच्या टेकडीच्या पायथ्याशी पाण्याचा झरा लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली. काही लोकांना ही देवाची कृपा वाटली. परंतु हा प्रकार चमत्कार वगैरे नसल्याचे सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे. देलनवाडी येथे पुरातन श्री. ऋषी देवस्थान एका उंच टेकडीवर आहे. टेकडीच्या दोन्ही भागाला निवासी वस्ती आहे. तर मागच्या भागात शेतजमीनआहे. मनोहर गोबाडे यांच्या शेतीलगत टेकडीच्या मागच्या भागाला काही नागरिकांना पाणी वाहताना दिसले. तोंडातोंडी ही घटना गावामध्ये चर्चेचा विषय ठरली. पुन्हा थोडे खोदकाम केल्यानंतर आणखी पाणी निघाले. यावेळी नागरिकांनी हा चमत्कार असल्याची चर्चा सुरू केली. यावर काहींचा विश्वासही बसला. ज्या टेकडीच्या पायथ्यामधून पाणी निघत आहे. तो भाग आणि शेतामध्ये विहिरीतील पाण्याची पातळी यांची तुलना केल्यास २५ ते ३० फूट अंतर आहे. म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी २५ ते ३० फूट खोल आहे. त्याच्यावर झरा आहे. त्यामुळे झऱ्याला पाणी कुठून येते, याबद्दल नागरिकांमध्ये कुतूहल आहे. हा प्रकार मागील आठ-नऊ दिवसांपासून सुरू असून टेकडीमधून पाणी कमी-अधिक प्रमाणात झिरपत आहे. त्या ठिकाणावरून गेल्या दोन-तीन दिवसांपासून अत्यल्प पाणी झिरपत आहे. काही गावकऱ्यांनी चमत्कार समजून एका महाराजांना पाचारण करून पूजा केली. ते महाराज मागील आठ-नऊ दिवसांपासून त्याच ठिकाणी निवासी आहेत. तेथे त्यांनी दानपेटीही लावली असून नागरिक पेटीमध्ये दानही टाकत आहेत. याबाबत ‘लोकमत’ वार्ताहराने महाराजांसोबत चर्चा केली असता ‘ही सर्व देवाची करणी असल्यानेच उन्हाळ्याचे दिवस असतानाही पाणी निघत आहे. त्यामध्ये पाणी पुन्हा वाढण्याची शक्यताही महाराजांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात पाण्याचा प्रवाह दिवसेंदिवस कमी-कमी होत चालला असून घटनास्थळाला भेट दिली असता थेंब-थेंब पाणी झिरपताना दिसले. टेकडीच्या पायथ्याशी एका विशिष्ट ठिकाणावरून पाणी झिरपत आहे. परंतु या उंच ठिकाणी पाणी नेमके कुठून येते, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पाणी झिरपत असलेल्या ठिकाणापासून ३०० ते ३५० फूट अंतरावरून नळयोजनेचा पाईप टेकडीवर ऋषी देवस्थानाकडे गेलेला आहे. तसेच टेकडीवर पुरातन विहीरही होती. ती अलीकडे बुजविण्यात आली आहे. कदाचित त्या विहीरीतील पाणी, नळयोजनेच्या लिक झालेल्या पाईपमधील पाणी किंवा दगडांची टेकडी असल्याने पावसाळ्यात पाणी साचले आणि त्याला मार्ग मिळाल्याने ते दगडांमधून झिरपत येत असावे, असा अंदाज सुज्ञ नागरिक वर्तवित आहेत. या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाहीचे तहसीलदार भास्कर बांबोळे व नायब तहसीलदार रामचंद्र नैताम यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी केवळ थेंब-थेंब पाणी निघत होते. नायब तहसीलदार नैताम यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ही घटना म्हणजे चमत्कार वगैरे काहीही नसून असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत असतात. उंच टेकडीवर उन्हाळ्यातसुद्धा पाणी झिरपताना दिसते. त्यामुळे या घटनेकडे नागरिकांनी चमत्कार म्हणून पाहू नये तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. याबाबत देलनवाडी येथील खेमराज गोविंदा डोंगरवार यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्या मते, हा चमत्कार नसून चमत्कार घडविण्यासाठी भूतलावर आता माणसेच राहिली नाहीत. माणसामध्ये प्रामाणिकपणा राहिला नाही. ऋषी देवस्थानाकडे नळयोजनेद्वारे पाणी येते. त्यातील एखादा पाईप लिक झाला असावा, असे मत डोंगरवार यांनी व्यक्त केले.