शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

देलनवाडी येथील पाण्याचा झरा चमत्कार नसून नैसर्गिक स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 01:06 IST

सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे श्री. ऋषी देवस्थानच्या टेकडीच्या पायथ्याशी पाण्याचा झरा लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली.

थेंब-थेंब पाणी झिरपतेय : बघ्यांची गर्दी संपता संपेना दिलीप मेश्राम  नवरगाव सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे श्री. ऋषी देवस्थानच्या टेकडीच्या पायथ्याशी पाण्याचा झरा लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली. काही लोकांना ही देवाची कृपा वाटली. परंतु हा प्रकार चमत्कार वगैरे नसल्याचे सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे. देलनवाडी येथे पुरातन श्री. ऋषी देवस्थान एका उंच टेकडीवर आहे. टेकडीच्या दोन्ही भागाला निवासी वस्ती आहे. तर मागच्या भागात शेतजमीनआहे. मनोहर गोबाडे यांच्या शेतीलगत टेकडीच्या मागच्या भागाला काही नागरिकांना पाणी वाहताना दिसले. तोंडातोंडी ही घटना गावामध्ये चर्चेचा विषय ठरली. पुन्हा थोडे खोदकाम केल्यानंतर आणखी पाणी निघाले. यावेळी नागरिकांनी हा चमत्कार असल्याची चर्चा सुरू केली. यावर काहींचा विश्वासही बसला. ज्या टेकडीच्या पायथ्यामधून पाणी निघत आहे. तो भाग आणि शेतामध्ये विहिरीतील पाण्याची पातळी यांची तुलना केल्यास २५ ते ३० फूट अंतर आहे. म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी २५ ते ३० फूट खोल आहे. त्याच्यावर झरा आहे. त्यामुळे झऱ्याला पाणी कुठून येते, याबद्दल नागरिकांमध्ये कुतूहल आहे. हा प्रकार मागील आठ-नऊ दिवसांपासून सुरू असून टेकडीमधून पाणी कमी-अधिक प्रमाणात झिरपत आहे. त्या ठिकाणावरून गेल्या दोन-तीन दिवसांपासून अत्यल्प पाणी झिरपत आहे. काही गावकऱ्यांनी चमत्कार समजून एका महाराजांना पाचारण करून पूजा केली. ते महाराज मागील आठ-नऊ दिवसांपासून त्याच ठिकाणी निवासी आहेत. तेथे त्यांनी दानपेटीही लावली असून नागरिक पेटीमध्ये दानही टाकत आहेत. याबाबत ‘लोकमत’ वार्ताहराने महाराजांसोबत चर्चा केली असता ‘ही सर्व देवाची करणी असल्यानेच उन्हाळ्याचे दिवस असतानाही पाणी निघत आहे. त्यामध्ये पाणी पुन्हा वाढण्याची शक्यताही महाराजांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात पाण्याचा प्रवाह दिवसेंदिवस कमी-कमी होत चालला असून घटनास्थळाला भेट दिली असता थेंब-थेंब पाणी झिरपताना दिसले. टेकडीच्या पायथ्याशी एका विशिष्ट ठिकाणावरून पाणी झिरपत आहे. परंतु या उंच ठिकाणी पाणी नेमके कुठून येते, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पाणी झिरपत असलेल्या ठिकाणापासून ३०० ते ३५० फूट अंतरावरून नळयोजनेचा पाईप टेकडीवर ऋषी देवस्थानाकडे गेलेला आहे. तसेच टेकडीवर पुरातन विहीरही होती. ती अलीकडे बुजविण्यात आली आहे. कदाचित त्या विहीरीतील पाणी, नळयोजनेच्या लिक झालेल्या पाईपमधील पाणी किंवा दगडांची टेकडी असल्याने पावसाळ्यात पाणी साचले आणि त्याला मार्ग मिळाल्याने ते दगडांमधून झिरपत येत असावे, असा अंदाज सुज्ञ नागरिक वर्तवित आहेत. या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाहीचे तहसीलदार भास्कर बांबोळे व नायब तहसीलदार रामचंद्र नैताम यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी केवळ थेंब-थेंब पाणी निघत होते. नायब तहसीलदार नैताम यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ही घटना म्हणजे चमत्कार वगैरे काहीही नसून असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत असतात. उंच टेकडीवर उन्हाळ्यातसुद्धा पाणी झिरपताना दिसते. त्यामुळे या घटनेकडे नागरिकांनी चमत्कार म्हणून पाहू नये तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. याबाबत देलनवाडी येथील खेमराज गोविंदा डोंगरवार यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्या मते, हा चमत्कार नसून चमत्कार घडविण्यासाठी भूतलावर आता माणसेच राहिली नाहीत. माणसामध्ये प्रामाणिकपणा राहिला नाही. ऋषी देवस्थानाकडे नळयोजनेद्वारे पाणी येते. त्यातील एखादा पाईप लिक झाला असावा, असे मत डोंगरवार यांनी व्यक्त केले.