शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
7
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
8
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
9
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
10
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
11
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
12
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
13
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
14
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
15
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
16
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
17
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
18
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
19
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
20
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न

१० महिन्यांपासून देऊळवाडा गावात पाणीटंचाई

By admin | Updated: June 19, 2016 00:54 IST

तालुक्यातील देऊळवाडा येथे गेल्या १० महिन्यांपासून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

सरपंचाचा आरोप : पंचायत समिती, वेकोलि प्रशासनाने दुर्लक्षभद्रावती : तालुक्यातील देऊळवाडा येथे गेल्या १० महिन्यांपासून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत असून पंचायत समिती, वेकोलि प्रशासन, लोकप्रतिनिधींना वारंवार सूचना करुन सुद्धा गावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील सरपंच सुनिता बलकी यांनी पत्रकार परिषदेत केला.८०० लोकसंख्या असलेल्या देऊळवाडा गावात लोकसहभागातून ट्युबवेल व पाण्याची टाकी बांधण्यात आली. गेली कित्येक वर्ष या टाकीद्वारे संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केल्या जात होता. मात्र एक वर्षापूर्वी ट्युबवेल निकामी झाल्याने गावातील पाणी पुरवठा बंद झाला. येथील नागरिकांची ओरड लक्षात घेता, येथील सरपंच बलकी यांनी पंचायत समितीला गावातील पाणी पुरवठा बंद असल्याच्या सूचणा केली. मात्र येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी याबाबत मौन पाळले. या बाबतचे लेखी निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी, ग्रामीण पुरवठा विभाग या शासकीय विभागाकडे दिले. मात्र १० महिने लोटूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असे सांगितले.पाणीटंचाईचा प्रश्न आमदार, खासदार, वित्तमंत्री यांच्याकडे सुद्धा निवेदनाद्वारे मांडला. परंतु त्यांनी सुद्धा या देऊळवाडा गावाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या गावाला वेकोलि प्रशासनाने दत्तक घेतले खरे. मात्र येथील सुखसुविधाकडे दुर्लक्ष आहे. येथील महाप्रबंधकाला निवेदन देवून नवीन ट्युबवेल खोदून देण्याचा आग्रह केल असता, गावात ट्युबवेल खोदण्यात आले ते दोनच दिवसात निकाली झाले. ज्या कंत्राटदाराला ट्युबवेलचे खोदकाम देण्यात आले होते. त्यांनी हा ट्युबवेल यशस्वी झाला असे सांगून महाप्रबंधक कार्यालयातून बिल काढण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप बलकी यांनी केला. गावात पाण्याची व्यवस्था करुन द्यावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा, सरपंच बलकी, उपसरपंच मंगेश झाडे, सदस्य रंजना आत्राम, संगीता बावणे, श्याम रामटेके, गोपालकृष्ण बलकी यांनी दिला आह. (शहर प्रतिनिधी)