शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

१० महिन्यांपासून देऊळवाडा गावात पाणीटंचाई

By admin | Updated: June 19, 2016 00:54 IST

तालुक्यातील देऊळवाडा येथे गेल्या १० महिन्यांपासून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

सरपंचाचा आरोप : पंचायत समिती, वेकोलि प्रशासनाने दुर्लक्षभद्रावती : तालुक्यातील देऊळवाडा येथे गेल्या १० महिन्यांपासून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत असून पंचायत समिती, वेकोलि प्रशासन, लोकप्रतिनिधींना वारंवार सूचना करुन सुद्धा गावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील सरपंच सुनिता बलकी यांनी पत्रकार परिषदेत केला.८०० लोकसंख्या असलेल्या देऊळवाडा गावात लोकसहभागातून ट्युबवेल व पाण्याची टाकी बांधण्यात आली. गेली कित्येक वर्ष या टाकीद्वारे संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केल्या जात होता. मात्र एक वर्षापूर्वी ट्युबवेल निकामी झाल्याने गावातील पाणी पुरवठा बंद झाला. येथील नागरिकांची ओरड लक्षात घेता, येथील सरपंच बलकी यांनी पंचायत समितीला गावातील पाणी पुरवठा बंद असल्याच्या सूचणा केली. मात्र येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी याबाबत मौन पाळले. या बाबतचे लेखी निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी, ग्रामीण पुरवठा विभाग या शासकीय विभागाकडे दिले. मात्र १० महिने लोटूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असे सांगितले.पाणीटंचाईचा प्रश्न आमदार, खासदार, वित्तमंत्री यांच्याकडे सुद्धा निवेदनाद्वारे मांडला. परंतु त्यांनी सुद्धा या देऊळवाडा गावाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या गावाला वेकोलि प्रशासनाने दत्तक घेतले खरे. मात्र येथील सुखसुविधाकडे दुर्लक्ष आहे. येथील महाप्रबंधकाला निवेदन देवून नवीन ट्युबवेल खोदून देण्याचा आग्रह केल असता, गावात ट्युबवेल खोदण्यात आले ते दोनच दिवसात निकाली झाले. ज्या कंत्राटदाराला ट्युबवेलचे खोदकाम देण्यात आले होते. त्यांनी हा ट्युबवेल यशस्वी झाला असे सांगून महाप्रबंधक कार्यालयातून बिल काढण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप बलकी यांनी केला. गावात पाण्याची व्यवस्था करुन द्यावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा, सरपंच बलकी, उपसरपंच मंगेश झाडे, सदस्य रंजना आत्राम, संगीता बावणे, श्याम रामटेके, गोपालकृष्ण बलकी यांनी दिला आह. (शहर प्रतिनिधी)