शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

भर पावसाळ्यात पाणीटंचाई

By admin | Updated: July 31, 2016 01:55 IST

शहरात मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाण्याची टंचाई आहे. शहरातील तिन्ही पाण्याच्या टाकी व्यवस्थित भरत नसल्याने

सिंदेवाही : नगरपंचायत प्रशासकांचे दुर्लक्ष सिंदेवाही : शहरात मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाण्याची टंचाई आहे. शहरातील तिन्ही पाण्याच्या टाकी व्यवस्थित भरत नसल्याने पिण्याचे नळाला पाणी येत नाही. परिणामी महिलांना भर पावसात पाण्यासाठी भटकावे लागत आहे. प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवरचा प्रभाव कमी असल्याने कर्मचारी वाटेल तसे वागत असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील पाणी, विद्युत, नाल्या सफाई, गाळ फेकणे, नगरपंचायतमधील कामे होत नसल्याची ओरड होत आहे. मोटारपंप बंद, नदीला पूर, विद्युतपुरवठा बंद, पाईपलाईन फुटली आदी कारणे बऱ्याच वर्षांपासून कायम आहेत. मागील दोन वर्षांपासून प्रशासकाच्या हाती सत्ता आहे. समस्या खुप आहेत. पण २५ टक्के समस्या दूर होतील असे वाटत असताना समस्यामध्ये रोज भर पडत आहे. नगरपंचायतला शासनाच्या वतीने दोन वर्षांत निधी आला नसल्याचे प्रशासकांचे मत आहे. ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. मात्र, निधी तसाच कायम असल्याने नगरपंचायत आवक कमी आणि जावक जास्त झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, विद्युतबिल, स्टेशनरी खरेदी, किरकोळ खर्च कसा करायचा, असा प्रश्न प्रशासकांना पडला आहे. वारंवार निधीची मागणी केली असता निधी मिळत नाही. त्यामुळे पाण्याची समस्या व विद्युत समस्या दिवसेंदिवस वाढणार हे नक्की! (शहर प्रतिनिधी)