शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळी वाढल्यावरही पाणीटंचाई

By admin | Updated: February 21, 2017 00:28 IST

यावर्षी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात ०.४० मीटर भूजल पातळी वाढली आहे.

सहा कोटींचा आराखडा : नळ दुरूस्ती, विहीर खोलीकरणवर मोठा खर्च चंद्रपूर : यावर्षी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात ०.४० मीटर भूजल पातळी वाढली आहे. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यानंतरही जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या सहा महिन्यांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीटंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी मंजूर केला आहे. अप्रचलित दोन आणि प्रचलित सहा उपाययोजनांसाठी ६ कोटी २७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गटविकास अधिकाऱ्यांची सभा घेऊन अभ्यासपूर्ण कृती आराखडा तयार केला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्याचा कालावधीसाठी ५१ गावांमध्ये ८१ विहिरींचा गाळ काढणे, खोलीकरण करण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच आराखड्यात चार गवांमध्ये चार खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचाही समावेश आहे. ५१ विहीरींच्या खोलीकरणासाठी २० लाख २५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. खासगी विहीर अधिग्रहणासाठी दोन लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. एप्रिल ते जून महिन्यांत ९६ गावांमध्ये १८३ विहिरींचे खोलीकरण व गाळ काढण्यासाठी ४८ लाख २५ हजार रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.अप्रचलित उपाययोजनाशिवाय प्रचलित उपाययोजना जानेवारी ते मार्च या कालावधीतही करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नळ योजना विशेष दुरुस्तीची कामे ८५ गावांमध्ये करण्यात येणार आहेत. त्यावर ३ कोटी ५९ लाख ३३ हजार रुपये खर्च होईल. ५९ गावांमध्ये ७१ हातपंपासह विंधन विहिरीसाठी ६८ लाख ८७ हजार रुपये, ६ गावांमध्ये ७ कुपनलिकांवर १२ लाख ६० हजार रुपये, १२ गावांमध्ये १७ हातपंपांची विशेष दुरूस्तीसाठी १ लाख ७० हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे.एप्रिल ते जून महिन्यात ९६ गावांमध्ये १८३ विहिरींचा गाळ काढणे व खोलीकरणासाठी ४८ लाख २५ हजार रुपये, ३ गावांमध्ये ३ खासगी विहिरींचे अधिग्रहणासाठी १ लाख ५० हजार रुपये आणि १० गावांमध्ये १० टँकरने पाणीपुरवठ्यासाठी ५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याच काळात ७४ गावांमध्ये ९९ हातपंपासह विंधन विहिरीवर ९६ लाख ३ हजार रुपये, ५ गावांमध्ये ६ कुपनलिकांवर १० लाख ८० हजार रुपये, ८ गावांमध्ये १२ हातपंपांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी १ लाख २० हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)५२ देखभाल प्रस्ताव तयार जानेवारी ते मार्च या कालावधीकरिता ८५ उपाययोजना करण्यात येणार आहेत. सध्या तीन महिन्यांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक कालावधी संपला आहे. त्यावेळी नळ योजना देखभालीचे ५२ प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. गटविकास अधिकारी स्तरावरून आता हातपंपाचे प्रस्ताव मागविणे सुरू आहे. त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. १२ गावांत हातपंपाची दुरूस्ती करायची आहे. तर ५९ गावांत हातपंपासह विंधन विहिरी करायच्या आहेत.विहीर खोलीकरणाची गरज काय ?गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २२.९३ टक्के पाऊस अधिक पडला. याशिवाय जलशिवार योजना राबविण्यात आली. परिणामी भूजल पातळी जानेवारी महिन्यात ४.५८ मीटर नोंदविण्यात आली. ही भूजल पातळी वाढली असेल तर विहीर खोलीकरण करण्याची गरज नाही. त्यामुळे टंचाई आराखड्यातील विहीर खोलीकरण ही उपाययोजना राबविली जाण्याची शक्यता अत्यल्प आहे. नळ दुरूस्तीवरही आराखड्याचा अर्धा म्हणजे ३ कोटी ५९ लाख रुपये खर्च धरण्यात आला आहे. ही उपाययोजना करून पाणीटंचाई निवारण करण्याचा दावा आहे.भूवैज्ञानिकांची दोन पदे रिक्तजिल्ह्यासाठी भूवैज्ञानिकांची तीन पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ एक भूवैज्ञानिक कार्यरत आहेत. उर्वरित दोन रिक्त आहेत. परिणामी एकाच भूवैज्ञानिकाला आराखडा तयार करणे, योजनांचे सर्वेक्षण करणे, प्रस्ताव तयार करणे अशी विविध तांत्रिक कामे करावी लागतात. रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकांना पत्र दिले आहे.जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ८५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५२ देखभाल प्रस्ताव तयार असून अन्य उपायोजनांचे सर्वेक्षण सुरू आहे. १५० बोअरवेल्स करण्यात येणार आहेत. लवकरच उपाययोजनांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्याकरिता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे.-विजय टाकळीकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प. चंद्रपूर.