शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

मार्चमध्येच उमा नदी कोरडी रत्नापुरात पाणी टंचाई

By admin | Updated: March 23, 2017 00:35 IST

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरला उमा नदीवरून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यालाच लागून पाणी साठविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे.

संबंधित विभागाने लक्ष द्यावे : शेतसिंचनाकरिताच वापरले पाणीनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरला उमा नदीवरून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यालाच लागून पाणी साठविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र मार्च महिन्यातच ही नदी कोरडी पडल्याने रत्नापुरात आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटणार आहे.मागील पंचेवीस वर्षापूर्वी रत्नापूर-नवरगावला पाणी पुरवठा करण्यासाठी संयुक्त नळयोजना मंजूर झाली. शिवणी जवळील उमा नदीमध्ये दोन विहिरी खोदण्यात आल्या. तसेच नदीच्या काठावर एक विहीर आणि त्यावर मोटरपंप बसविण्यात आले. याच मोटरपंपाच्या साहाय्याने रत्नापूर-नवरगावला नळयोजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता.मात्र दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नदी कोरडी होत असल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण व्हायचा. जेव्हा गावाला पाण्याची गरज असायची, तेव्हाच पिण्याचे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे नदीमधील विहिरींना उन्हाळ्याच्या दिवसांमध्येसुद्धा पाणी मिळावे आणि रत्नापूर-नवरगाव नळयोजनेला सतत पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी नदीमध्ये ६७ लाख रुपये खर्च करून चार-पाच वर्षापूर्वी मोठा बंधारा बांधण्यात आला. जेणेकरून नदीचे पाणी वाहून जाणार नाही. हे पाणी जमिनीतच जिरले पाहिजे व नळयोजना सतत सुरू राहिली पाहिजे, हा उद्देश होता.यावर्षीसुद्धा जानेवारी महिन्यातच बंधारा अडविण्यात आला आणि बंधाऱ्यामध्ये सहा-सात फुट पाणी नदी परिसरात सात कि.मी. च्या आसपास जमासुद्धा झाले. गावकऱ्यांना वाटायला लागले की यावर्षी उन्हाळभर आपल्याला नळयोजनेद्वारे पाणी मिळणार. मात्र आजच्या परिस्थितीत ते स्वप्नवत ठरले आहे.नदीमध्ये ज्या भागात विहिरी आहेत, त्या नदीच्या दोन्ही भागांना शेतकऱ्यांनी धानाच्या पिकाची डबल फसल लावलेली असून काही शेतकऱ्यांनी भाजीपाला लावलेला आहे. शेतकरी मोटारपंप व बोअरवेलच्या साहाय्याने बंधारा परिसरातील पाणी रोजच शेतीतील पिकांसाठी ओढत असतात. त्यामुळे बंधारा पुर्णत: कोरडा पडलेला असुन पाण्याचे स्त्रोत आटलेले आहेत. या परिसरात तीस-चाळीस मोटारपंप व बोअरवेलही आहे. त्यांना केवळ पावसाळी पीक घेण्यासाठी तीन महिन्यासाठी पाणी घेण्याची परवानगी असताना ते बारमाही पिकांसाठी नदीतील पाण्याचा दुरूपयोग करीत आहेत. ही परिस्थिती मागील कित्येक वर्षांपासून सुरू असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून दरवर्षी वरिष्ठ स्तरावर विद्युत कनेक्शन कापण्यासाठी कळविले जाते. मात्र वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांचे फावत आहे. आणि ते दरवर्षी डब्बल पिक घेत आहेत. मात्र या शेतकऱ्यांमुळे रत्नापूर गावातील महिलांना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ येत आहे.शिवाय नदीतील विहिरीच्या वरच्या भागाला शिवणीला जाण्यासाठी उमा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम हे १५-२० फूट खोलातून केले असल्याने पलिकडील पाणी खालच्या भागाला अजिबात झिरपत नाही. त्यामुळेही रत्नापूरवासीयांना नळयोजना उन्हाळ्यासाठी कुचकामी ठरत आहे.नवरगाववासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठी धुमनवेडा येथील बोअरवेल असून रत्नापूरवासीयांना उन्हाळ्यासाठी या एकमेव नळयोजनेवरच अवलंबून राहावे लागत आहे. कारण इतर पाण्याचे कुठलेही स्त्रोत नाहीत. पाण्याची या गंभीर समस्येची दखल ग्रामपंचायत रत्नापूरने घेतली असून रत्नापूर नळयोजनेला मिळणारे पाणी शेतकऱ्यांनी ओढल्यामुळे बंधारा शोभेची वस्तु बनला आहे. तेव्हा नदीपरिसरातील शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन तात्काळ कापावे, यासाठी रत्नापूर ग्रामपंचायतीने सरपंच सदाशिवराव मेश्राम, ग्रामविकास अधिकारी बोपनवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी चिमूर यांनी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)