शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मार्चमध्येच उमा नदी कोरडी रत्नापुरात पाणी टंचाई

By admin | Updated: March 23, 2017 00:35 IST

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरला उमा नदीवरून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यालाच लागून पाणी साठविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे.

संबंधित विभागाने लक्ष द्यावे : शेतसिंचनाकरिताच वापरले पाणीनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरला उमा नदीवरून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यालाच लागून पाणी साठविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र मार्च महिन्यातच ही नदी कोरडी पडल्याने रत्नापुरात आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटणार आहे.मागील पंचेवीस वर्षापूर्वी रत्नापूर-नवरगावला पाणी पुरवठा करण्यासाठी संयुक्त नळयोजना मंजूर झाली. शिवणी जवळील उमा नदीमध्ये दोन विहिरी खोदण्यात आल्या. तसेच नदीच्या काठावर एक विहीर आणि त्यावर मोटरपंप बसविण्यात आले. याच मोटरपंपाच्या साहाय्याने रत्नापूर-नवरगावला नळयोजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता.मात्र दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नदी कोरडी होत असल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण व्हायचा. जेव्हा गावाला पाण्याची गरज असायची, तेव्हाच पिण्याचे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे नदीमधील विहिरींना उन्हाळ्याच्या दिवसांमध्येसुद्धा पाणी मिळावे आणि रत्नापूर-नवरगाव नळयोजनेला सतत पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी नदीमध्ये ६७ लाख रुपये खर्च करून चार-पाच वर्षापूर्वी मोठा बंधारा बांधण्यात आला. जेणेकरून नदीचे पाणी वाहून जाणार नाही. हे पाणी जमिनीतच जिरले पाहिजे व नळयोजना सतत सुरू राहिली पाहिजे, हा उद्देश होता.यावर्षीसुद्धा जानेवारी महिन्यातच बंधारा अडविण्यात आला आणि बंधाऱ्यामध्ये सहा-सात फुट पाणी नदी परिसरात सात कि.मी. च्या आसपास जमासुद्धा झाले. गावकऱ्यांना वाटायला लागले की यावर्षी उन्हाळभर आपल्याला नळयोजनेद्वारे पाणी मिळणार. मात्र आजच्या परिस्थितीत ते स्वप्नवत ठरले आहे.नदीमध्ये ज्या भागात विहिरी आहेत, त्या नदीच्या दोन्ही भागांना शेतकऱ्यांनी धानाच्या पिकाची डबल फसल लावलेली असून काही शेतकऱ्यांनी भाजीपाला लावलेला आहे. शेतकरी मोटारपंप व बोअरवेलच्या साहाय्याने बंधारा परिसरातील पाणी रोजच शेतीतील पिकांसाठी ओढत असतात. त्यामुळे बंधारा पुर्णत: कोरडा पडलेला असुन पाण्याचे स्त्रोत आटलेले आहेत. या परिसरात तीस-चाळीस मोटारपंप व बोअरवेलही आहे. त्यांना केवळ पावसाळी पीक घेण्यासाठी तीन महिन्यासाठी पाणी घेण्याची परवानगी असताना ते बारमाही पिकांसाठी नदीतील पाण्याचा दुरूपयोग करीत आहेत. ही परिस्थिती मागील कित्येक वर्षांपासून सुरू असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून दरवर्षी वरिष्ठ स्तरावर विद्युत कनेक्शन कापण्यासाठी कळविले जाते. मात्र वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांचे फावत आहे. आणि ते दरवर्षी डब्बल पिक घेत आहेत. मात्र या शेतकऱ्यांमुळे रत्नापूर गावातील महिलांना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ येत आहे.शिवाय नदीतील विहिरीच्या वरच्या भागाला शिवणीला जाण्यासाठी उमा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम हे १५-२० फूट खोलातून केले असल्याने पलिकडील पाणी खालच्या भागाला अजिबात झिरपत नाही. त्यामुळेही रत्नापूरवासीयांना नळयोजना उन्हाळ्यासाठी कुचकामी ठरत आहे.नवरगाववासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठी धुमनवेडा येथील बोअरवेल असून रत्नापूरवासीयांना उन्हाळ्यासाठी या एकमेव नळयोजनेवरच अवलंबून राहावे लागत आहे. कारण इतर पाण्याचे कुठलेही स्त्रोत नाहीत. पाण्याची या गंभीर समस्येची दखल ग्रामपंचायत रत्नापूरने घेतली असून रत्नापूर नळयोजनेला मिळणारे पाणी शेतकऱ्यांनी ओढल्यामुळे बंधारा शोभेची वस्तु बनला आहे. तेव्हा नदीपरिसरातील शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन तात्काळ कापावे, यासाठी रत्नापूर ग्रामपंचायतीने सरपंच सदाशिवराव मेश्राम, ग्रामविकास अधिकारी बोपनवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी चिमूर यांनी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)