शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

जीवतीत पार पडली पाणी टंचाईची आढावा बैठक

By admin | Updated: May 18, 2016 00:55 IST

येथील पंचायत समिती सभागृहात पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. माणिकगड पहाडावरील

अधिकाऱ्यांना धारेवर धरले : नागरिकांनी मांडल्या समस्याजिवती : येथील पंचायत समिती सभागृहात पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. माणिकगड पहाडावरील पाणीटंचाईचा सामना येथील सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. नागरिकांनी आढावा बैठकीत संवर्ग विकास अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, तहसीलदार एस.वाय. कुणारपवार, संवर्ग विकास अधिकारी नंदागवळी, पंचायत समिती उपसभापती गोतावळे, एस.डी. प्रभारी अडकिणे, विद्युत मंडळाचे वैरागडे, पाणी पुरवठा विभागाचे उद्धरवार, बांधकाम विभागाचे बर्डेकर, सिंचाईचे महाजनवार, आरोग्य अधिकारी डॉ. कोरडे उपस्थित होते तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी गैरहजर होते.तालुक्याची आढावा बैठक ही वर्षातून एकदा होत असते. संपूर्ण तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांना पत्र देऊन बोलाविले नसल्याने तसेच बऱ्याच लोकप्रतिनिधींना आढावा बैठकीची माहितीही नसल्याने गावकऱ्यांत प्रशासनाबाबत नाराजी असल्याचे सरपंचांनी सांगितले. ग्रामसेवक हे गावात राहत नसून, गडचांदूर, राजुरा, चंद्रपूर येथून ये-जा करीत असल्याने गावकऱ्यांनी कामे होत नाहीत. सात दिवसांतून एकदा ग्रामसेवक गावात येत असल्याचे कैफियत अनेक नागरिकांनी आमदारांसमोर मांडली. आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे सांगितले. साडेबारा गावातील घरकुलधारकांना संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली वेठीस धरले असल्याचे उपसभापती गोवातळे यांनी आमदार धोटेंच्या निदर्शनास आणून दिले. पूर्वीचा आंध्रप्रदेश आजच्या तेलंगणा राज्यातून साडेबारा गावातील बऱ्याच लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याचे कारण पुढे करुन महाराष्ट्रातून मंजूर झालेली घरकुलांची देयके मिळाली नसल्याच्या लाभार्थ्यांनी आमदारांच्यासमोर व्यथा मांडल्या. अ‍ॅड. धोटे यांनी ते राज्य त्यांचा पुरावा तयार करीत असल्याने आपल्या कोणत्याच योजना बंद करायच्या नाहीत. त्यासंदर्भात नंदागवळी यांना घरकुलाचे थांबलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पल्लेझरी, माथाडी, सारंगापूर येथील स्वस्त धान्य, दुकानदार योग्य दरात धान्य देत नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यानुसार तहसीलदारांना तात्काळ चौकशी करुन सामान्य नागरिकांना योग्य दरात पूर्ण माल मिळाला पाहिजे, अशा सूचना केल्या. प्रास्ताविक तहसीलदारांनी केले तर आभार कुळसंगे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)