शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
5
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
6
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
7
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
8
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
9
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
11
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
12
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
13
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
14
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
15
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
16
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
17
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
18
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
19
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
20
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

मूल तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई

By admin | Updated: June 5, 2014 23:54 IST

मूल तालुक्यात ४८ ग्रामपंचायती असून ११0 गावांचा समावेश आहे. तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंचायत समितीस्तरावरुन २५.0५ लाख रुपयांचा

राजू गेडाम - मूलमूल तालुक्यात ४८ ग्रामपंचायती असून ११0 गावांचा समावेश आहे. तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंचायत समितीस्तरावरुन २५.0५ लाख रुपयांचा आराखडा शासनस्तरावर मंजुरीसाठी मागविण्यात आला. मात्र प्रशासनाने एकही प्रस्ताव मंजूर न केल्याने जून महिन्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवायला लागली आहे. २५ लाखांपैकी अर्धा निधी मंजूर झाला असता, तर काही गावांतील प्रस्ताव मंजूर झाले असते तर त्या गावांना दिलासा मिळाला असता. मात्र एकही प्रस्ताव मंजूर न झाल्याने प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मूल तालुक्यातील भादुर्णी, काटवन, कोसंबी, ताडाळा, नलेश्‍वर, बाबराळा, नांदगाव, चिरोली, सुशी, टेकाडी, भवराळा, चिमढा, चांदापूर, पिपरी दीक्षित, चिखली, बोंडाळा बुज, नवेगाव भु., फिस्कुटी, केळझर, राजोली या २0 गावांत ३४ ठिकाणी विहिरी खोल करणे, गाळ उपसणे व इनवेल बोअर करणे यासाठी ४.८0 लाख रुपयाचा प्रस्ताव पाणी टंचाई आराखड्यात सादर करण्यात आला. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून पाणी समस्येची टर उडविली. नळयोजना दुरुस्तीसाठी मूल तालुक्यातील राजोली, चिरोली, चकघोसरी, जुनासूर्ला, राजगड, बोरचांदली या सहा गावात २१ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याकडेसुद्धा प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसून येते. नवीन हातपंपासाठी तालुक्यातील जुनासुर्ला, काटवन, आकापूर, मानकापूर, चकघोसरी या पाच गावात पाच लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याकडे सुद्धा डोळेझाक करण्यात आली. हातपंप दुरुस्तीसाठी मारोडा, आकापूर, चांदापूर, नवेगाव भूजला, गडीसूर्ला, सिंतळा, ताडभूज, येरगाव या आठ गावात नऊ कामे प्रस्तावित आली. ४.२५ लाख रुपयाच्या किंमतीच्या कामांना मंजुरी देण्यात आली नाही. मात्र मूल पंचायत समितीने स्वत: पुढाकर घेऊन सदर आठ गावांत हातपंपाची दुरुस्त केली. मात्र इतर गावांत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत येत असल्याने ती शासनस्तरावरुन मंजूर होणे गरजेचे होते.सन २0१३-१४ या वर्षात पाणी टंचाई आराखडा सादर करण्यात आला. त्यातील निधी मंजूर झाला असता तर भविष्यात सन २0१४-१५ या वर्षात पाणी टंचाईवर मात करता आली असती. पाण्याची पातळी मे व जून महिन्यात खालावली. परिणामी लांब अंतरावर पाणी आणावे लागते. विहिरीचे खोलीकरण, गाळ उपसणे व इनवेल बोअर झाले असते तर ऐन मे व जून महिन्यात गावकर्‍यांना पायपीट करावी लागली नसती. प्रशासनाकडून ही बाब गंभीरतेने न घेता केवळ कागदी घोडेच नाचविण्याचे काम केले जात आहे.