शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या भूमी अधिग्रहणामुळे पाण्याचे स्रोत गायब

By admin | Updated: April 24, 2016 01:04 IST

दरवर्षीप्रमाणे राजुरा तालुक्यातील वेकोलि परिसरातील साखरी येथे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे.

प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष : पाणी टंचाईने प्रकल्पग्रस्त त्रस्तसास्ती : दरवर्षीप्रमाणे राजुरा तालुक्यातील वेकोलि परिसरातील साखरी येथे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. येथील नळयोजना विविध कारणामुळे मागील अनेक वर्षांपासून ठप्प पडली आहे. गावातील सार्वजनिक विहिरी व बोअरवेलसुद्धा आटल्या आहेत. घरगुती बोअरवेलला पाणी नसल्यामुळे येथील नागरिक गावाशेजारील शेतातील विहिरी व बोअरवेलवरुन पाणी आणत होते. परंतु येथील शेतजमिनी वेकोलिने पोवनी दोन कोळसा खाणीकरिता अधिग्रहीत केल्यामुळे साखरीवासीयांचे पाण्याचे स्रोत वेकोलिच्या घश्यात गेले आहे.दरवर्षी वेकोलिमुळे परिसरातील गावात पाणी टंचाईची झळ सुरू होते. परंतु प्रशासन मात्र याकडे कमालीचे दुर्लक्ष करते. गावात नळयोजना असूनही पाण्यासाठी वणवण करावी लागते. साखरी येथे नळयोजना असून तीही ठप्प पडली आहे. पाण्यासाठी सार्वजनिक विहिरी, बोअरवेल आहेत. परंतु त्याही आटल्या आहेत. गावकऱ्यांनी घरगुती बोअरवेलसुद्धा खोदल्या. परंतु त्यांचीही पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली असून एखाद्या वेळी एक हंडाभर पाणी त्यातून निघते. अशा परिस्थितीत येथील नागरिक गावाशेजारील शेतात असलेल्या विहिरी व बोअरवेलवरुन पाणी आणत होते. परंतु या शेतजमिनी वेकोलिने अधिग्रहीत केल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील बोअरवेलवर असलेल्या मोटारी काढून घेतल्यामुळे साखरीवासीयांना या बोअरवेलवरुनसुद्धा पाणी मिळणे बंद झाले आहे.पाणी टंचाई जाणवत असतानासुद्धा प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करते. येथील नळयोजनेचे स्रोत आटल्यामुळे नळयोजना ठप्प पडली आहे. गावातील पाण्याची टाकी पांढरा हत्ती ठरत आहे. नळयोजनेसाठी दुसरे स्त्रोत करण्यात आले. त्यात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पाईपलाईनचे काम अर्धवट राहिल्यामुळे पाणी मिळणे शक्य झाले नाही. पाईप लाईनच्या कामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने आठकाठी घातल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नळ योजना सुरू केली असती तर पाणी टंचाईची समस्याच उद्भवली नसती. येथील पाणीटंचाई पाहता त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)पाणीटंचाईमुळे आम्हा महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावातील नळयोजना, हातपंप, विहिरीत पाणी नसल्याने शेतातील विहिरीवर धुणी भांडी करावी लागत आहे. शेती वेकोलित गेल्यामुळे शेतातील बोअरवेल बंद पडल्या असल्या तरी गावाशेजारी पाणी असलेल्या शेतातील विहिरी वेकोलिने गावकऱ्यांसाठी खुल्या ठेवाव्यात.- छाया सुनील इटनकर, साखरीपाणी टंचाई जाणवत असून नव्या नळयोजनेच्या पाईप लाईनचे काम सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने वरिष्ठांकडे नळयोजनेचे काम त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. लवकरच नळयोजना सुरू करण्यात येईल.- डी. बी. डेहणकर, ग्रामसेवक साखरी