शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वेकोलिच्या भूमी अधिग्रहणामुळे पाण्याचे स्रोत गायब

By admin | Updated: April 24, 2016 01:04 IST

दरवर्षीप्रमाणे राजुरा तालुक्यातील वेकोलि परिसरातील साखरी येथे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे.

प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष : पाणी टंचाईने प्रकल्पग्रस्त त्रस्तसास्ती : दरवर्षीप्रमाणे राजुरा तालुक्यातील वेकोलि परिसरातील साखरी येथे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. येथील नळयोजना विविध कारणामुळे मागील अनेक वर्षांपासून ठप्प पडली आहे. गावातील सार्वजनिक विहिरी व बोअरवेलसुद्धा आटल्या आहेत. घरगुती बोअरवेलला पाणी नसल्यामुळे येथील नागरिक गावाशेजारील शेतातील विहिरी व बोअरवेलवरुन पाणी आणत होते. परंतु येथील शेतजमिनी वेकोलिने पोवनी दोन कोळसा खाणीकरिता अधिग्रहीत केल्यामुळे साखरीवासीयांचे पाण्याचे स्रोत वेकोलिच्या घश्यात गेले आहे.दरवर्षी वेकोलिमुळे परिसरातील गावात पाणी टंचाईची झळ सुरू होते. परंतु प्रशासन मात्र याकडे कमालीचे दुर्लक्ष करते. गावात नळयोजना असूनही पाण्यासाठी वणवण करावी लागते. साखरी येथे नळयोजना असून तीही ठप्प पडली आहे. पाण्यासाठी सार्वजनिक विहिरी, बोअरवेल आहेत. परंतु त्याही आटल्या आहेत. गावकऱ्यांनी घरगुती बोअरवेलसुद्धा खोदल्या. परंतु त्यांचीही पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली असून एखाद्या वेळी एक हंडाभर पाणी त्यातून निघते. अशा परिस्थितीत येथील नागरिक गावाशेजारील शेतात असलेल्या विहिरी व बोअरवेलवरुन पाणी आणत होते. परंतु या शेतजमिनी वेकोलिने अधिग्रहीत केल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील बोअरवेलवर असलेल्या मोटारी काढून घेतल्यामुळे साखरीवासीयांना या बोअरवेलवरुनसुद्धा पाणी मिळणे बंद झाले आहे.पाणी टंचाई जाणवत असतानासुद्धा प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करते. येथील नळयोजनेचे स्रोत आटल्यामुळे नळयोजना ठप्प पडली आहे. गावातील पाण्याची टाकी पांढरा हत्ती ठरत आहे. नळयोजनेसाठी दुसरे स्त्रोत करण्यात आले. त्यात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पाईपलाईनचे काम अर्धवट राहिल्यामुळे पाणी मिळणे शक्य झाले नाही. पाईप लाईनच्या कामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने आठकाठी घातल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नळ योजना सुरू केली असती तर पाणी टंचाईची समस्याच उद्भवली नसती. येथील पाणीटंचाई पाहता त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)पाणीटंचाईमुळे आम्हा महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावातील नळयोजना, हातपंप, विहिरीत पाणी नसल्याने शेतातील विहिरीवर धुणी भांडी करावी लागत आहे. शेती वेकोलित गेल्यामुळे शेतातील बोअरवेल बंद पडल्या असल्या तरी गावाशेजारी पाणी असलेल्या शेतातील विहिरी वेकोलिने गावकऱ्यांसाठी खुल्या ठेवाव्यात.- छाया सुनील इटनकर, साखरीपाणी टंचाई जाणवत असून नव्या नळयोजनेच्या पाईप लाईनचे काम सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने वरिष्ठांकडे नळयोजनेचे काम त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. लवकरच नळयोजना सुरू करण्यात येईल.- डी. बी. डेहणकर, ग्रामसेवक साखरी