शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

जिल्ह्यातील शेकडो बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:05 IST

यंदा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून शासनाने बंधारे बांधले. मात्र अत्यल्प पावसामुळे बंधाऱ्यातही ठणठणाट आहे. शेतीच्या सिंचनासोबतच गावागावात जलसंकटाची बिकट समस्या निर्माण होत असल्याने यावर्षी पाणीटंचाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपाण्याची पातळी घटल्याने जलसंकट : बहुतांश बंधाऱ्यांचे कामही अर्धवट

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून शासनाने बंधारे बांधले. मात्र अत्यल्प पावसामुळे बंधाऱ्यातही ठणठणाट आहे. शेतीच्या सिंचनासोबतच गावागावात जलसंकटाची बिकट समस्या निर्माण होत असल्याने यावर्षी पाणीटंचाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने शासनाने जलयुक्त शिवारसारखी सिंचनाच्या दृष्टीने शेतकºयांचे भले करणारी योजना अंमलात आणली. यापूर्वीही शासनाने शिवारात लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधले. त्यात काही बंधारे निधीअभावी रखडले आहे. तर काही बंधारे अर्धवट असून यात शासनाचा लाखो रूपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही. हे दुर्दैव आहे. यंदा हिवाळ्यातच नदी, नाले, तलाव, बंधाºयात पाणी नसल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, धिडशी, मारडा, मानोली, बाबापूर, हिरापूर परिसरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने गावकºयांची चिंता वाढली आहे. यावर्षी कमी पाऊस पडल्याने पाण्याची समस्या उग्ररूप धारण करीत आहे. शेतीला पाणी नसल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.राजुरा तालुक्यात शेकडो बंधारे शासनाने बांधले आहेत. मात्र आजघडीला या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबसुद्धा उरला नाही. काही बंधारे निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वाहून गेले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.शासन बंधाऱ्यावर लाखो रूपये खर्च करीत असेल आणि त्या बंधाºयाचा नागरिकांना, संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळत नसेल तर बंधारे बांधून काय फायदा, असा प्रश्न आता जनमाणसात विचारला जात आहे. यंदा पाण्याची समस्या अधिकच बिकट बनली असून राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांवर आतपासूनच जलसंकट घोंगावत आहे.बोअरवेलही आटल्याकधी न आटणाऱ्या शेतातील बोअरवेल यंदा आटल्या आहेत. रब्बी हंगामातील हजारो हेक्टर शेतीला याचा मोठा फटका बसणार आहे. सिंचनाअभावी यावर्षी उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडणार आहे.