शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेकडो बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:05 IST

यंदा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून शासनाने बंधारे बांधले. मात्र अत्यल्प पावसामुळे बंधाऱ्यातही ठणठणाट आहे. शेतीच्या सिंचनासोबतच गावागावात जलसंकटाची बिकट समस्या निर्माण होत असल्याने यावर्षी पाणीटंचाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपाण्याची पातळी घटल्याने जलसंकट : बहुतांश बंधाऱ्यांचे कामही अर्धवट

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून शासनाने बंधारे बांधले. मात्र अत्यल्प पावसामुळे बंधाऱ्यातही ठणठणाट आहे. शेतीच्या सिंचनासोबतच गावागावात जलसंकटाची बिकट समस्या निर्माण होत असल्याने यावर्षी पाणीटंचाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने शासनाने जलयुक्त शिवारसारखी सिंचनाच्या दृष्टीने शेतकºयांचे भले करणारी योजना अंमलात आणली. यापूर्वीही शासनाने शिवारात लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधले. त्यात काही बंधारे निधीअभावी रखडले आहे. तर काही बंधारे अर्धवट असून यात शासनाचा लाखो रूपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही. हे दुर्दैव आहे. यंदा हिवाळ्यातच नदी, नाले, तलाव, बंधाºयात पाणी नसल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, धिडशी, मारडा, मानोली, बाबापूर, हिरापूर परिसरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने गावकºयांची चिंता वाढली आहे. यावर्षी कमी पाऊस पडल्याने पाण्याची समस्या उग्ररूप धारण करीत आहे. शेतीला पाणी नसल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.राजुरा तालुक्यात शेकडो बंधारे शासनाने बांधले आहेत. मात्र आजघडीला या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबसुद्धा उरला नाही. काही बंधारे निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वाहून गेले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.शासन बंधाऱ्यावर लाखो रूपये खर्च करीत असेल आणि त्या बंधाºयाचा नागरिकांना, संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळत नसेल तर बंधारे बांधून काय फायदा, असा प्रश्न आता जनमाणसात विचारला जात आहे. यंदा पाण्याची समस्या अधिकच बिकट बनली असून राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांवर आतपासूनच जलसंकट घोंगावत आहे.बोअरवेलही आटल्याकधी न आटणाऱ्या शेतातील बोअरवेल यंदा आटल्या आहेत. रब्बी हंगामातील हजारो हेक्टर शेतीला याचा मोठा फटका बसणार आहे. सिंचनाअभावी यावर्षी उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडणार आहे.