शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

दोन दिवसांत एकदा पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:28 IST

चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने १ मार्चपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.

ठळक मुद्दे१ मार्चपासून अंमलबजावणी : पाणीटंचाईमुळे महापालिकेचा निर्णय

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने १ मार्चपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.सध्या इरई धरणात केवळ २३ क्युबिक मीटर जलसाठा आहे. यातील ४.८० क्युबिक मीटर पाणी दर महिन्याला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राकडून वीज निर्मितीसाठी घेतले जाते. एक क्युबिक मीटर पाणी दर महिन्याला चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी लागते. तर दोन क्युबिक मीटर पाणी केवळ बाष्पिभवनामुळे कमी होते. त्यामुळे सध्या धरणात अस्तित्वात असलेले पाणी पावसाळ्याला सुरुवात होईपर्यंत टिकविणे व नागरिकांना देणे मनपापुढे आव्हान आहे. यासाठी मनपाने पाणी टंचाई आराखडा तयार केला असून त्यात अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त काकडे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. वास्तविक फेब्रुवारी महिन्यातच एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार होता. मात्र अस्तित्वात असलेले पाणी बघता हा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र आता बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मनपाला एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घ्यावा लागल्याचेही आयुक्त काकडे म्हणाले.१ मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दोन दिवसातून आता एकदाच नळाद्वारे पाणी मिळू शकणार आहे.इरई नदी व धरणात मातीचा बंधारासंभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून इरई धरण येथे विहिरीसभोवताल मातीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. याशिवाय दाताळा येथील इरई नदीवरही एक बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाऱ्याचे काम सुरूही झाले आहे, अशी माहितीही काकडे यांनी दिली.विहिरी केल्या स्वच्छपाणी टंचाई काळात विहिरीतून नागरिकांना शुध्द पाणी घेता यावे, यासाठी शहरातील विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यातील ३९ विहिरींबाबत अहवाल आला असून या विहिरीत पाणी पिण्यायोग्य आहे. त्यामुळे या विहिरी नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आणखी ६५ विहिरींचा अहवाल आल्यानंतर त्या विहिरीत पाणीही नागरिकांना उपयोग पडणार आहे. याशिवाय शहरातील चार मोठ्या विहिरींवर हातपंप बसवून पाणी पुरवठा केला जाणार आहे.४५४ हातपंप उपलब्धशहरातील हातपंपांचीही मनपाद्वारे तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत शहरातील २०० हातपंप बंद असून ते सुरू होण्याची शक्यताही नसल्याचे आढळून आले. त्यामुळे उर्वरित ४५४ हातपंप सुरू करण्यात आले असून या हातपंपांची दररोज तपासणी केली जाईल. उन्हाळ्याच्या दिवसात या हातपंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.नळाच्या वेळात भारनियमननळाद्वारे पाणी पुरवठा होताना अनेकजण मोटरपंप लावून पाण्याचा उपसा करतात. त्यामुळे मोटरपंप जप्तीची मोहीम मनपाद्वारे सुरू करण्यात आली आहे. याशिवाय नळ येण्याच्या वेळात भारनियमन करण्यात यावे, यासाठी महावितरणला विनंती करण्यात आली आहे. भारनियमन असल्याने कुणीही मोटरपंप लावणार नाही, हा त्यामागील उद्देश असणार आहे.नवीन कनेक्शन नाहीइरई धरणात अत्यल्प जलसाठा असल्याने पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत शहरात कुणालाही नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार नसल्याचे मनपा आयुक्त काकडे यांनी यावेळी स्पष्ट केले. याशिवाय नवीन बांधकामालादेखील परवानगी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.