शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

दोन दिवसांत एकदा पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:28 IST

चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने १ मार्चपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.

ठळक मुद्दे१ मार्चपासून अंमलबजावणी : पाणीटंचाईमुळे महापालिकेचा निर्णय

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने १ मार्चपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.सध्या इरई धरणात केवळ २३ क्युबिक मीटर जलसाठा आहे. यातील ४.८० क्युबिक मीटर पाणी दर महिन्याला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राकडून वीज निर्मितीसाठी घेतले जाते. एक क्युबिक मीटर पाणी दर महिन्याला चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी लागते. तर दोन क्युबिक मीटर पाणी केवळ बाष्पिभवनामुळे कमी होते. त्यामुळे सध्या धरणात अस्तित्वात असलेले पाणी पावसाळ्याला सुरुवात होईपर्यंत टिकविणे व नागरिकांना देणे मनपापुढे आव्हान आहे. यासाठी मनपाने पाणी टंचाई आराखडा तयार केला असून त्यात अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त काकडे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. वास्तविक फेब्रुवारी महिन्यातच एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार होता. मात्र अस्तित्वात असलेले पाणी बघता हा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र आता बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मनपाला एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घ्यावा लागल्याचेही आयुक्त काकडे म्हणाले.१ मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दोन दिवसातून आता एकदाच नळाद्वारे पाणी मिळू शकणार आहे.इरई नदी व धरणात मातीचा बंधारासंभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून इरई धरण येथे विहिरीसभोवताल मातीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. याशिवाय दाताळा येथील इरई नदीवरही एक बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाऱ्याचे काम सुरूही झाले आहे, अशी माहितीही काकडे यांनी दिली.विहिरी केल्या स्वच्छपाणी टंचाई काळात विहिरीतून नागरिकांना शुध्द पाणी घेता यावे, यासाठी शहरातील विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यातील ३९ विहिरींबाबत अहवाल आला असून या विहिरीत पाणी पिण्यायोग्य आहे. त्यामुळे या विहिरी नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आणखी ६५ विहिरींचा अहवाल आल्यानंतर त्या विहिरीत पाणीही नागरिकांना उपयोग पडणार आहे. याशिवाय शहरातील चार मोठ्या विहिरींवर हातपंप बसवून पाणी पुरवठा केला जाणार आहे.४५४ हातपंप उपलब्धशहरातील हातपंपांचीही मनपाद्वारे तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत शहरातील २०० हातपंप बंद असून ते सुरू होण्याची शक्यताही नसल्याचे आढळून आले. त्यामुळे उर्वरित ४५४ हातपंप सुरू करण्यात आले असून या हातपंपांची दररोज तपासणी केली जाईल. उन्हाळ्याच्या दिवसात या हातपंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.नळाच्या वेळात भारनियमननळाद्वारे पाणी पुरवठा होताना अनेकजण मोटरपंप लावून पाण्याचा उपसा करतात. त्यामुळे मोटरपंप जप्तीची मोहीम मनपाद्वारे सुरू करण्यात आली आहे. याशिवाय नळ येण्याच्या वेळात भारनियमन करण्यात यावे, यासाठी महावितरणला विनंती करण्यात आली आहे. भारनियमन असल्याने कुणीही मोटरपंप लावणार नाही, हा त्यामागील उद्देश असणार आहे.नवीन कनेक्शन नाहीइरई धरणात अत्यल्प जलसाठा असल्याने पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत शहरात कुणालाही नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार नसल्याचे मनपा आयुक्त काकडे यांनी यावेळी स्पष्ट केले. याशिवाय नवीन बांधकामालादेखील परवानगी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.