शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
3
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
4
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
5
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
6
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
7
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
8
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
9
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
10
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
11
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
12
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
13
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
14
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
15
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
16
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
17
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
18
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
19
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
20
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
Daily Top 2Weekly Top 5

झिरे खोदून प्यावे लागते पाणी !

By admin | Updated: May 10, 2014 00:04 IST

मागील तीन महिन्यापासून कोंढाना गावात पाणी पुरवठा बंद आहे. त्यात पिण्याच्या पाण्याचे एकमेव स्रोत असलेल्या विहिरीचा उपसा करण्यात आलेला नाही.

 दिलीप बच्चुवार - धाबा

मागील तीन महिन्यापासून कोंढाना गावात पाणी पुरवठा बंद आहे. त्यात पिण्याच्या पाण्याचे एकमेव स्रोत असलेल्या विहिरीचा उपसा करण्यात आलेला नाही. त्यामुळे गावात भिषण पाणी टंचाई सुरू आहे. तहान भागविण्यासाठी नागरिकांना चक्क झिरे खोदून पाणी काढावे लागत आहे. हे करतानाही दोन किमीची पायपीट नशिबी आली आहे. पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत कोंढाणा गाव येते. धाबा ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या या गावात पूर्वीपासूनच पाण्याची भिषण समस्या आहे. गावात पाण्याचे स्रोत नाहीत. अनेक वेळा विहिरी खोदण्यात आल्या. बोअरवेल मारण्यात आली. मात्र पाण्याचा पत्ता नाही. त्यामुळे गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या नाल्यातील पाणी घेऊन नागरिक आपली तहान भागवितात. धाबा, गोजोली पाणी पुरवठा योजनेत या गावाचा समावेश झाल्यावर येथील पाणी प्रश्न सुटला. मात्र तीन महिन्यापूर्वी या गावाच्या पाईपलाईनला मंगलपेठची पाईपलाईन जोडण्यात आली. कोंढाणा गाव टेकडावर वसलेले असल्याने या गावात पाणी पुरवठा होणे बंद झाले. थोळेफार पाणी नळाला येते मात्र या पाण्याने एक, दोनच मडके भरली जातात. त्यामुळे गावात पाण्यासाठी हाहा:कार सुरू आहे. नाल्यात असलेल्या विहिरीचा उपसा मागील दोन वर्षापासून करण्यात आलेला नाही. नाल्यालाही सध्या पाणी नाही. त्यामुळे नागरिकांना आता नाल्यात ठिकठिकाणी झिरे खोदून पाणी काढावे लागत आहे. हेच पाणी प्यायलाही वापरले जात आहे. पहाटेपासूनच नागरिक नाल्याकाठी जमा होतात. प्रत्येक झिर्‍यावर मडक्याच्या रांगा असतात. एक मडके भरण्यासाठी किमान अर्धा तास लागत असतो. रखरखत्या उन्हातही गावकरी पाणी भरण्यासाठी गुंतले असतात. दिवसा पाणी मिळाले नाही तर सायंकाळी अंधारात झिर्‍यातील पाणी काढावे लागते. नाल्यात असलेल्या विहिरीचा उपसा करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली. मात्र या मागणीकडे ग्रामपंचायतीने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकणार्‍या या गावात स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर आहे. चार वर्षापासून येथील नाल्यांचा उपसा झालेला नाही. गावात सर्वत्र घाण साचलेली आहे. पाणी प्रश्न त्वरित सोडवा, अशी आर्त मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)