शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

चंद्रपुरातील पाणी पेटणार

By admin | Updated: May 14, 2017 00:31 IST

मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. अशा काळात कंत्राटदार कंपनीच्या मनमानीमुळे मनपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनेक वॉर्डात टंचाई : सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी दंड थोपटलेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. अशा काळात कंत्राटदार कंपनीच्या मनमानीमुळे मनपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून प्रशासनाविरोधात दंड थोटपले आहे. अयोध्या नगर, हनुमान नगर, सुमित्रनगर, दत्त नगर, आदी विविध भागांत गेल्या पाच वर्षांपासून व्यवस्थित पाणी पोहोचत नाही. वडगाव, डॉ. आंबेडकर नगर, बाबुपेठ आदी भागातही पाण्याचा प्रश्न आहे. मनपाच्या नवीन पदाधिकाऱ्यांपुढे पाण्याचा पेच निर्माण झाला आहे. तीन आठवड्यानंतर मान्सून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच चंद्रपूर शहरात शनिवारी मान्सूनपूर्व धारा बरसल्या आहेत. उन्हाळा संपायला आला तरी पाणी समस्या कायम आहे. गेल्या मार्च महिन्यात सुमित्र नगर, हनुमान नगर, अयोध्या नगर येथील नागरिकांनी नळाचे पाणी मिळत नसल्याची तक्रार केली होती. गेल्या पाच वर्षांपासून पाणीपट्टी भरतो, तरी पाणी का मिळत नाही, असा टाहो नागरिकांनी फोडला होता. तसेच एकोरी वॉर्ड, भिवापूर, बाबुपेठ, डॉ. आंबेडकर नगर, इंडस्ट्रियल वॉर्ड, वडगाव आदी परिसरातही नियमित पाणीपुरवठा होत नाही.आता या प्रश्नाने उग्ररूप धारण केले आहेत. शहराच्या सर्वच भागात समान पातळीवर पाणीपुरवठा केला जात नाही. त्याबाबत २०१३पासून तक्रारी करण्यात येत आहेत. चंद्रपूर शहराला मनपाने पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शनकडे आहे. या कंपनीच्या विरोधात सुमित्र नगर, महेश नगर येथील नागरिकांनी तक्रार केली.सत्ताधारी नगरसेवक करणार उपोषणनगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी दे. गो. तुकूम प्रभागात येणाऱ्या विविध भागातील नागरिकांना नळाचे पाणी मिळत नसल्याचे पत्र मनपाचे आयुक्त संजय काकडे यांना दिले. त्यावर शहर अभियंता महेश बारई यांनी ८ मे रोजी उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला तक्रारीचे निराकरण करण्याचे आदेश दिले. पत्र प्राप्त होताच या भागांमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. परंतु अद्याप पाणी समस्या आहे. त्यामुळे नगरसेवक कासनगोट्टूवार यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.पाणी प्रश्नावर बसपा व शहर आघाडी आक्रमकशहराच्या अनेक भागात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगून बसपा व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मनपाची विशेष सभा आयोजित करण्याची मागणी महापौर अंजली घोटेकर यांच्याकडे केली आहे. वडगावसह विविव वॉर्डांमध्ये पाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जटपुरा गेट प्रभागातील जलनगर वॉर्डात सुहाना शेख या दीड वर्षीय मुलीचा नालीत पडून मृत्यू झाला. बसपाचे गटनेते अनिल रामटेके, पितांबर कश्यप, बंटी परचाके आणि शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख आदींनी महापौरांची भेट घेऊन मागणी केली आहे.