शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती...
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
5
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
6
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
7
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
8
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
9
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
10
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
11
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
12
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
13
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
14
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
15
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
16
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
17
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
18
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
19
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
20
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी

जलयुक्त शिवार अभियानाने जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:11 IST

राज्य शासनाने २०१४ पासून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

ठळक मुद्देदिलासा : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेची आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने २०१४ पासून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. नाला खोलीकरण, शेततळ्याचे निर्माण, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, जमिनीतील पुनर्भरण, जुन्या सर्व प्रकल्पांना दिलेली नवसंजीवनी, सुरू करण्यात आलेले नवे प्रकल्प, गोसेखुर्दच्या पाण्यामुळे वाढलेले सिंचन, धरणांमध्ये वाढलेला पाणीसाठा, यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पाणी पातळी वाढल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या आकडेवारीने पुढे आले आहे.राज्य शासनाने २०१४ पासून शाश्वत सिंचन आणि शाश्वत शेती यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जलसंधारण, जलसंपदा, वनविभाग, कृषी विभाग, मनरेगा, भूजल सर्वेक्षण विभाग आदी सर्व विभागांनी जलयुक्त शिवार अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे.यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरण्याची प्रक्रिया वाढली असून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वेगवेगळ्या स्तरावर तयार होत आहे. यामुळे संरक्षित सिंचन क्षमतादेखील वाढत असून शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधराही तालुक्यात मागील तीन वर्षात झालेल्या कामांनी आता दृश्य स्वरूपात साठवण क्षमतेत वाढ होत असल्याचे चित्र पुढे आले आहे.राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे अभियान चालू केले. यामुळे अंदाजे एका शेततळ्यात एक ते दीड हेक्टर सिंचन करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक उपसा सिंचन प्रकल्प गेल्या २०-२२ वर्षांपासून बंद पडलेले होते. ते सुरू करण्यात आले आहे. त्यामुळेदेखील सिंचनात वाढ झाली आहे. सप्टेंबर २०१७ आणि सप्टेंबर २०१८ या वर्षात तालुकानिहाय भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास केल्यास जवळपास भूगर्भातील पाणी पातळीमध्ये एक ते सव्वा मीटरपर्यंत वाढ झाली आहे. २०१७ च्या सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षी जिल्ह्याची सरासरी भूगर्भपातळी उणे १.५० मीटर होती. यावर्षी ही सरासरी उणे ०.२९ मीटर आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे जिल्ह्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विश्वास वालदे यांनी ही माहिती दिली आहे.