शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जलयुक्त शिवार अभियानाने जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:11 IST

राज्य शासनाने २०१४ पासून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

ठळक मुद्देदिलासा : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेची आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने २०१४ पासून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. नाला खोलीकरण, शेततळ्याचे निर्माण, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, जमिनीतील पुनर्भरण, जुन्या सर्व प्रकल्पांना दिलेली नवसंजीवनी, सुरू करण्यात आलेले नवे प्रकल्प, गोसेखुर्दच्या पाण्यामुळे वाढलेले सिंचन, धरणांमध्ये वाढलेला पाणीसाठा, यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पाणी पातळी वाढल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या आकडेवारीने पुढे आले आहे.राज्य शासनाने २०१४ पासून शाश्वत सिंचन आणि शाश्वत शेती यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जलसंधारण, जलसंपदा, वनविभाग, कृषी विभाग, मनरेगा, भूजल सर्वेक्षण विभाग आदी सर्व विभागांनी जलयुक्त शिवार अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आहे.यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरण्याची प्रक्रिया वाढली असून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वेगवेगळ्या स्तरावर तयार होत आहे. यामुळे संरक्षित सिंचन क्षमतादेखील वाढत असून शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधराही तालुक्यात मागील तीन वर्षात झालेल्या कामांनी आता दृश्य स्वरूपात साठवण क्षमतेत वाढ होत असल्याचे चित्र पुढे आले आहे.राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे अभियान चालू केले. यामुळे अंदाजे एका शेततळ्यात एक ते दीड हेक्टर सिंचन करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक उपसा सिंचन प्रकल्प गेल्या २०-२२ वर्षांपासून बंद पडलेले होते. ते सुरू करण्यात आले आहे. त्यामुळेदेखील सिंचनात वाढ झाली आहे. सप्टेंबर २०१७ आणि सप्टेंबर २०१८ या वर्षात तालुकानिहाय भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास केल्यास जवळपास भूगर्भातील पाणी पातळीमध्ये एक ते सव्वा मीटरपर्यंत वाढ झाली आहे. २०१७ च्या सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षी जिल्ह्याची सरासरी भूगर्भपातळी उणे १.५० मीटर होती. यावर्षी ही सरासरी उणे ०.२९ मीटर आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे जिल्ह्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विश्वास वालदे यांनी ही माहिती दिली आहे.