शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कोळसा खाणींनी घटतेय पाण्याची पातळी

By admin | Updated: June 8, 2015 01:54 IST

राजुरा तालुक्याला कोळसा खाणींचे वरदान असले तरी कोळसा उत्खननासाठी वेकोलित मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या प्रचंड उपशामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

प्रकाश काळे  गोवरीराजुरा तालुक्याला कोळसा खाणींचे वरदान असले तरी कोळसा उत्खननासाठी वेकोलित मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या प्रचंड उपशामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. परिणामी भविष्यात वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे राजुरा तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट घोंगावत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणी बोअरवेलपेक्षा २०० ते ३०० फुट अधिक खोल असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. तालुक्यात गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी विस्तारल्या आहेत. वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बदलल्याने थोड्याफार पावसाने वेकोलि परिसरातील गावात पूर परिस्थिती निर्माण होते. वेकोलिची गोवरी नं. १ कोळसा खाण गोवरी गावाला अगदी लागून आहे. वेकोलिने गोवरी गावालागत असलेल्या नैसर्गिक नाल्यावर मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहेत. मात्र ते टाकताना दुष्परिणामांचा विचार वेकोलि प्रशासनाने केला नाही. वेकोलि परिसरातील नाले, नदी, उन्हाळ्यापूर्वीच आटत असल्याने जनावरांना पाणी मिळणे कठीण होते. शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. परंतु वेकोलिच्या कोळसा खाणी खासगी बोअरवेल पेक्षाही अधिक खोल असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.कोळसा खाणीतील पाण्याच्या प्रचंड उपसामुळे दिवसेंदिवस राजुरा तालुक्यातील गावांत पाणी टंचाई उग्ररूप धारण करीत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दिवसरात्रं भटकंती करावी लागते. मात्र वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे होणाऱ्या या दुष्परीणामांचे भोग परिसरातील जनतेला भोगावे लागतात. परंतु अनेकदा गावकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी वेकोलि प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. कोळसा खाणीतून उडणाऱ्या धुळीने शेतातील पीक पूर्णत: काळवंडते. वेकोलि परिसरातील रस्ते धुळीने माखले असून त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार बळावण्याची भीती असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र वेकोलि प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने कोळसा खाणींचे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागत आहे. मात्र यावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत.