शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

पाणी पातळी दीड मीटरने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:57 IST

यावर्षी संपूर्ण पावसाळा गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५३.३० टक्के पाऊस झाला असून या कमी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी तब्बल दीड मीटरने घटल्याची माहिती ....

ठळक मुद्देजिल्ह्यात ५३.३० टक्केच पाऊस : उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी संपूर्ण पावसाळा गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५३.३० टक्के पाऊस झाला असून या कमी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी तब्बल दीड मीटरने घटल्याची माहिती भूजल सर्व्हेक्षण विभागाने दिली आहे.भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून दरवर्षी वर्षांतून तीनदा भूजल पातळीची नोंद घेतली जाते. या अहवालातून त्या गावांना, तालुक्यांना पाणी वापराबाबत सूचना मिळत असतात. त्यामुळे प्रशासनही त्या आधारे पाण्याचे नियोजन करीत असते. दरवर्षी मार्च व जुलै महिन्यात होणाºया सर्व्हेक्षणातून पाणी पातळीत घट दिसून येत असते. मात्र आॅक्टोबर महिन्यात होणाºया सर्व्हेक्षणात पाणी पातळीत वाढ झालेली दिसते. मात्र यावर्षी कमी पावसामुळे आॅक्टोबर महिन्यातच जिल्ह्याची पाणी पातळी दीड मीटरने घटल्याचे समोर आले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला दिला. त्यामुळे पेरणीची कामे उशिराने झाली. तब्बल महिनाभराने पाऊस पडला. मात्र पावसात सातत्य नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांनाही सरासरी गाठता आली नाही. त्यामुळे सध्या अनेक सिंचन प्रकल्पांनी आताच तळ गाठले आहे. यामुळे सिंचन प्रकल्पांतून नळ योजनांना होणारा पाणीपुरवठा प्रभावित होत असून आतापासूनच नियोजन आवश्यक आहे.जिल्ह्यात काही दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझीम पावसाची हजेरी लागत असल्याने या पावसाने शेतपिकांना फायदा होत आहे. मात्र सिंचन प्रकल्प व नदी, नाले कोरडे असल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी समस्या उद्भवण्याची चिन्ह आहेत.