शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पाणी पातळी दीड मीटरने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:57 IST

यावर्षी संपूर्ण पावसाळा गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५३.३० टक्के पाऊस झाला असून या कमी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी तब्बल दीड मीटरने घटल्याची माहिती ....

ठळक मुद्देजिल्ह्यात ५३.३० टक्केच पाऊस : उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी संपूर्ण पावसाळा गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५३.३० टक्के पाऊस झाला असून या कमी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी तब्बल दीड मीटरने घटल्याची माहिती भूजल सर्व्हेक्षण विभागाने दिली आहे.भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून दरवर्षी वर्षांतून तीनदा भूजल पातळीची नोंद घेतली जाते. या अहवालातून त्या गावांना, तालुक्यांना पाणी वापराबाबत सूचना मिळत असतात. त्यामुळे प्रशासनही त्या आधारे पाण्याचे नियोजन करीत असते. दरवर्षी मार्च व जुलै महिन्यात होणाºया सर्व्हेक्षणातून पाणी पातळीत घट दिसून येत असते. मात्र आॅक्टोबर महिन्यात होणाºया सर्व्हेक्षणात पाणी पातळीत वाढ झालेली दिसते. मात्र यावर्षी कमी पावसामुळे आॅक्टोबर महिन्यातच जिल्ह्याची पाणी पातळी दीड मीटरने घटल्याचे समोर आले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला दिला. त्यामुळे पेरणीची कामे उशिराने झाली. तब्बल महिनाभराने पाऊस पडला. मात्र पावसात सातत्य नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांनाही सरासरी गाठता आली नाही. त्यामुळे सध्या अनेक सिंचन प्रकल्पांनी आताच तळ गाठले आहे. यामुळे सिंचन प्रकल्पांतून नळ योजनांना होणारा पाणीपुरवठा प्रभावित होत असून आतापासूनच नियोजन आवश्यक आहे.जिल्ह्यात काही दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझीम पावसाची हजेरी लागत असल्याने या पावसाने शेतपिकांना फायदा होत आहे. मात्र सिंचन प्रकल्प व नदी, नाले कोरडे असल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी समस्या उद्भवण्याची चिन्ह आहेत.