शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:48 IST

जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अवलंबून आहे. मात्र मागील दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला बल्लारपूर तालुक्यात ५६ टक्केच पर्जन्यमान झाले. आता धान्य व कापूस पिकाला पुन्हा एकदा जोरदार पावसाची गरज आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामावर संकट : बल्लारपूर तालुक्यात धान व कापूस पीक धोक्यात

अनकेश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अवलंबून आहे. मात्र मागील दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला बल्लारपूर तालुक्यात ५६ टक्केच पर्जन्यमान झाले. आता धान्य व कापूस पिकाला पुन्हा एकदा जोरदार पावसाची गरज आहे. यामुळे पिकांना संजीवनी मिळणार आहे. मात्र निसर्गाची हुलकावणी सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.बल्लारपूर तालुक्याचे सरासरी ११३२ मिमी पर्जन्यामान आहे. मागील वर्षी तालुक्यात केवळ ४१.८७ टक्केच पाऊ स पडला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हंगामावर विपरीत परिणाम झाला आणि बळीराजा आर्थिक संकटात ओढला गेला. यावर्षी देखील तालुक्यातील शेतकºयांवर अरिष्ठ ओढावल्याचे चिन्ह दिसत आहे. आजतागायत तालुक्यात ६३४.४ मिमी पावसाची नोंद झाली. तरीही शेतशिवार कोरडे आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.तालुक्याचे कृषी क्षेत्र कोरडवाहू असल्याने सिंचन सुविधाचा अभाव आहे. नाममात्र शेतकºयांकडे ओलीताची सोय असली तरी मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांचे कृषी व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून पावसाने हुलकावणी देण्यास सुरूवात केली. यामुळे शेतकरी गतवर्षीच्या संकटातून सावरण्याऐवजी पुन्हा संकटाच्या मार्गावरून वाटचाल करीत आहे.शेती व्यवसाय दरवर्षी तोट्यात जातोे. तरीही शेतकरी उत्पादनासाठी जीव ओतून राबतो. पीक कर्जाचा अडथळा पार करून काहींनी कर्ज घेतले. काहींनी सावकाराकडून कर्ज घेत बी-बियाण्यांची व खताची तरतूद केली. मशागत केलेल्या शेतात पेरणी केली. मात्र निस२र्गाची साथ बळीराजाला मिळत नसल्याने हिरवेगार पीक करपण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी येत आहे.७ हजार ११५ हेक्टर क्षेत्रात खरिपाची लागवड७ हजार ११५ क्षेत्रात तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. यामध्ये २ हजार ३९० हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड करण्यात आली. कापसाचे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र ३ हजार ९८२ हेक्टर इतके आहे. सोयाबीन १२८ हेक्टरमध्ये लागवड असून गळीत धान्य १२८, हळद ९.३०, मिरची ८ व भाजीपाला १०७ हेक्टरमध्ये लावण्यात आले आहे.