शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

धरणांचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:22 IST

यंदा पावसाने वेळोवेळी शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. शेतीला आवश्यक पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाने अचानक दगा दिल्याने राजुरा तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती पाण्याअभावी वाळायला लागली आहे. परिसरात अमलनाला सिंचन प्रकल्प आहे. परंतु धरणाचे पाणी शेतीला अद्यापही सोडले नसल्याने या धरणाचा फायदा केवळ खासगी कंपन्यांनाच होत आहे.

ठळक मुद्देकॅनलची दुरुस्तीच नाही : अमलनाला धरणाचे पाणी शेतात केव्हा सोडणार ?

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा पावसाने वेळोवेळी शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. शेतीला आवश्यक पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाने अचानक दगा दिल्याने राजुरा तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती पाण्याअभावी वाळायला लागली आहे. परिसरात अमलनाला सिंचन प्रकल्प आहे. परंतु धरणाचे पाणी शेतीला अद्यापही सोडले नसल्याने या धरणाचा फायदा केवळ खासगी कंपन्यांनाच होत आहे.निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया कोरडवाहू शेतीचे दिवस आता संपले आहे. पाणी असेल तरच आता शेती पिकते हे सर्वांना माहित असूनही ज्या आशेवर शेतीला पाणी मिळण्यासाठी सिंचन प्रकल्प बांधला, त्या अमलनाला धरणाचे पाणी अद्यापही राजुरा तालुक्यातील पाचगाव, पांढरपोणी, चंदनवाही, मंगी, खैरगुडा, परिसरातील शेतात सोडले नाही. शेतीला सध्या सिंचनाची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु संबंधित विभागाने अजूनही कॅनलची दुरूस्तीच केली नाही. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून आहे. तर काटेरी झुडपांनी अतिक्रमण केल्याने शेतीला पाणी पोहोचणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शेतीवर शेतकऱ्यांनी यंदा अतोनात खर्च केला आहे. परंतु शेतकऱ्यांना निसर्गानेही दगा दिल्याने यावर्षी उत्पादनात मोठी धट होणार आहे. पाचगाव, मंगी, चंदनवाही पांढरपौणी, खैरगुडा परिसरात अमलनाला धरणातून शेतीला पाणी सोडण्यासाठी कॅनलद्वारे पाणी शेतात पोहचण्याची व्यवस्था केली. लाखो रूपये खर्च करून कॅनल बांधले. मात्र संबंधित विभागाने अद्यापही कॅनलची दुरूस्ती केली नाही. मग या विभागाचे जबाबदार अधिकारी अनभिज्ञ कसे?एकीकडे शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न चालविले जातात. तर दुसरीकडे अंमलनाला धरणातून शेतीला पाणी सोडण्याचे सौजन्य कोणत्याही लोकप्रतिनिधींनी दाखविले नाही. त्यामुळे धरणांचे पाणी शेतीला सोडण्याची मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबूलवार, रूपेश गेडेकर, दशरथ भोयर, सुधाकर गेडेकर, तिरूपती इंदूरवार, किसन पिंपळकर व शेतकऱ्यांनी केली आहे.धरणांचा आर्थिक लाभ खासगी कंपन्यांनाचराजुरा - कोरपना तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी, यासाठी अमलनाला धरण बांधण्यात आले. मात्र या धरणातून शेतीला पाणी सोडण्याऐवजी अधिक पाणी परिसरातील सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जाते. त्यामुळे या धरणाचा शेतीला फायदा काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.अमलनाला धरणाचे पाणी अद्यापही शेतीला सोडले नाही. अथवा कॅनलची दुरूस्तीही करण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याअभावी कोरडवाहू शेतातील पिके वाळायला लागली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन धरणाचे पाणी शेतीला सोडण्याची व्यवस्था करून द्यावी.-गोपाल जंबूलवार,उपसरपंच, पाचगाव