शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

धरणांचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:22 IST

यंदा पावसाने वेळोवेळी शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. शेतीला आवश्यक पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाने अचानक दगा दिल्याने राजुरा तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती पाण्याअभावी वाळायला लागली आहे. परिसरात अमलनाला सिंचन प्रकल्प आहे. परंतु धरणाचे पाणी शेतीला अद्यापही सोडले नसल्याने या धरणाचा फायदा केवळ खासगी कंपन्यांनाच होत आहे.

ठळक मुद्देकॅनलची दुरुस्तीच नाही : अमलनाला धरणाचे पाणी शेतात केव्हा सोडणार ?

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा पावसाने वेळोवेळी शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. शेतीला आवश्यक पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाने अचानक दगा दिल्याने राजुरा तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती पाण्याअभावी वाळायला लागली आहे. परिसरात अमलनाला सिंचन प्रकल्प आहे. परंतु धरणाचे पाणी शेतीला अद्यापही सोडले नसल्याने या धरणाचा फायदा केवळ खासगी कंपन्यांनाच होत आहे.निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया कोरडवाहू शेतीचे दिवस आता संपले आहे. पाणी असेल तरच आता शेती पिकते हे सर्वांना माहित असूनही ज्या आशेवर शेतीला पाणी मिळण्यासाठी सिंचन प्रकल्प बांधला, त्या अमलनाला धरणाचे पाणी अद्यापही राजुरा तालुक्यातील पाचगाव, पांढरपोणी, चंदनवाही, मंगी, खैरगुडा, परिसरातील शेतात सोडले नाही. शेतीला सध्या सिंचनाची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु संबंधित विभागाने अजूनही कॅनलची दुरूस्तीच केली नाही. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून आहे. तर काटेरी झुडपांनी अतिक्रमण केल्याने शेतीला पाणी पोहोचणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शेतीवर शेतकऱ्यांनी यंदा अतोनात खर्च केला आहे. परंतु शेतकऱ्यांना निसर्गानेही दगा दिल्याने यावर्षी उत्पादनात मोठी धट होणार आहे. पाचगाव, मंगी, चंदनवाही पांढरपौणी, खैरगुडा परिसरात अमलनाला धरणातून शेतीला पाणी सोडण्यासाठी कॅनलद्वारे पाणी शेतात पोहचण्याची व्यवस्था केली. लाखो रूपये खर्च करून कॅनल बांधले. मात्र संबंधित विभागाने अद्यापही कॅनलची दुरूस्ती केली नाही. मग या विभागाचे जबाबदार अधिकारी अनभिज्ञ कसे?एकीकडे शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न चालविले जातात. तर दुसरीकडे अंमलनाला धरणातून शेतीला पाणी सोडण्याचे सौजन्य कोणत्याही लोकप्रतिनिधींनी दाखविले नाही. त्यामुळे धरणांचे पाणी शेतीला सोडण्याची मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबूलवार, रूपेश गेडेकर, दशरथ भोयर, सुधाकर गेडेकर, तिरूपती इंदूरवार, किसन पिंपळकर व शेतकऱ्यांनी केली आहे.धरणांचा आर्थिक लाभ खासगी कंपन्यांनाचराजुरा - कोरपना तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी, यासाठी अमलनाला धरण बांधण्यात आले. मात्र या धरणातून शेतीला पाणी सोडण्याऐवजी अधिक पाणी परिसरातील सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जाते. त्यामुळे या धरणाचा शेतीला फायदा काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.अमलनाला धरणाचे पाणी अद्यापही शेतीला सोडले नाही. अथवा कॅनलची दुरूस्तीही करण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याअभावी कोरडवाहू शेतातील पिके वाळायला लागली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन धरणाचे पाणी शेतीला सोडण्याची व्यवस्था करून द्यावी.-गोपाल जंबूलवार,उपसरपंच, पाचगाव