शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

धरणांचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:22 IST

यंदा पावसाने वेळोवेळी शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. शेतीला आवश्यक पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाने अचानक दगा दिल्याने राजुरा तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती पाण्याअभावी वाळायला लागली आहे. परिसरात अमलनाला सिंचन प्रकल्प आहे. परंतु धरणाचे पाणी शेतीला अद्यापही सोडले नसल्याने या धरणाचा फायदा केवळ खासगी कंपन्यांनाच होत आहे.

ठळक मुद्देकॅनलची दुरुस्तीच नाही : अमलनाला धरणाचे पाणी शेतात केव्हा सोडणार ?

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा पावसाने वेळोवेळी शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. शेतीला आवश्यक पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाने अचानक दगा दिल्याने राजुरा तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती पाण्याअभावी वाळायला लागली आहे. परिसरात अमलनाला सिंचन प्रकल्प आहे. परंतु धरणाचे पाणी शेतीला अद्यापही सोडले नसल्याने या धरणाचा फायदा केवळ खासगी कंपन्यांनाच होत आहे.निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया कोरडवाहू शेतीचे दिवस आता संपले आहे. पाणी असेल तरच आता शेती पिकते हे सर्वांना माहित असूनही ज्या आशेवर शेतीला पाणी मिळण्यासाठी सिंचन प्रकल्प बांधला, त्या अमलनाला धरणाचे पाणी अद्यापही राजुरा तालुक्यातील पाचगाव, पांढरपोणी, चंदनवाही, मंगी, खैरगुडा, परिसरातील शेतात सोडले नाही. शेतीला सध्या सिंचनाची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु संबंधित विभागाने अजूनही कॅनलची दुरूस्तीच केली नाही. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून आहे. तर काटेरी झुडपांनी अतिक्रमण केल्याने शेतीला पाणी पोहोचणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शेतीवर शेतकऱ्यांनी यंदा अतोनात खर्च केला आहे. परंतु शेतकऱ्यांना निसर्गानेही दगा दिल्याने यावर्षी उत्पादनात मोठी धट होणार आहे. पाचगाव, मंगी, चंदनवाही पांढरपौणी, खैरगुडा परिसरात अमलनाला धरणातून शेतीला पाणी सोडण्यासाठी कॅनलद्वारे पाणी शेतात पोहचण्याची व्यवस्था केली. लाखो रूपये खर्च करून कॅनल बांधले. मात्र संबंधित विभागाने अद्यापही कॅनलची दुरूस्ती केली नाही. मग या विभागाचे जबाबदार अधिकारी अनभिज्ञ कसे?एकीकडे शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न चालविले जातात. तर दुसरीकडे अंमलनाला धरणातून शेतीला पाणी सोडण्याचे सौजन्य कोणत्याही लोकप्रतिनिधींनी दाखविले नाही. त्यामुळे धरणांचे पाणी शेतीला सोडण्याची मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबूलवार, रूपेश गेडेकर, दशरथ भोयर, सुधाकर गेडेकर, तिरूपती इंदूरवार, किसन पिंपळकर व शेतकऱ्यांनी केली आहे.धरणांचा आर्थिक लाभ खासगी कंपन्यांनाचराजुरा - कोरपना तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी, यासाठी अमलनाला धरण बांधण्यात आले. मात्र या धरणातून शेतीला पाणी सोडण्याऐवजी अधिक पाणी परिसरातील सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जाते. त्यामुळे या धरणाचा शेतीला फायदा काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.अमलनाला धरणाचे पाणी अद्यापही शेतीला सोडले नाही. अथवा कॅनलची दुरूस्तीही करण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याअभावी कोरडवाहू शेतातील पिके वाळायला लागली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन धरणाचे पाणी शेतीला सोडण्याची व्यवस्था करून द्यावी.-गोपाल जंबूलवार,उपसरपंच, पाचगाव