शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

ढगात पाणी, शेतात पाणी अन्‌ बळीराजाच्या डोळ्यांतही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली : बळीराजा हवालदिल निलेश झाडे गोंडपिपरी : सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना ...

शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली : बळीराजा हवालदिल

निलेश झाडे

गोंडपिपरी : सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. वैनगंगा, वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट शेतात शिरले. नदीकाठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे.

गोंडपिपरी तालुक्यात सलग चार दिवस जोरदार पाऊस बरसला. पावसाची वाट बघणारे शेतकरी सुखावले. नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांवर मात्र संकट कोसळले आहे. संततधार पावसाने वैनगंगा आणि वर्धा नदी फुगली आहे. लहान-मोठे नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदी, नाल्यातील पाणी थेट शेतात शिरले आहे. शेतीपिके पाण्याखाली आहेत. पिके कुजून जाण्याचा धोका वाढला आहे. तालुक्यातील पोडसा, वेडगाव, हिवरा, सकमुर, किरमिरी, दरूर, अळेगाव, नंदवर्धन, शिवणी, तारसा गावांना मोठाच फटका बसल्याची माहिती आहे. पूर कायम राहिला तर प्रभावित क्षेत्राचा आकडा वाढू शकेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

कोट

नदीकाठी असलेली शेती पाण्याखाली आली आहे. अळेगाव, हिवरा, पोडसा गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने प्रभावित झालेल्या क्षेत्राची पाहणी करून नुकसान भरपाईची मदत त्वरित द्यावी.

-तुकाराम झाडे, अध्यक्ष तालुका काँग्रेस गोंडपिपरी

240721\1114-img-20210724-wa0063.jpg

शेती