शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

रत्नापूर येथील वाॅटर एटीएम २५ दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST

नवरगाव : येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र गावाच्या चौकात बसविलेे; परंतु मागील २५ दिवसांपासून ...

नवरगाव : येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र गावाच्या चौकात बसविलेे; परंतु मागील २५ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे बंद झाले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर हे गाव आठ हजार लोकसंख्येचे आहे. शिवणी मार्गावरील उमा नदीपात्रातून नळयोजनेद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जातो. गावातील सर्व नागरिकांना सुरळीत पाण्याचा पुरवठा होण्यासाठी चार जलकुंभ उभारले आहेत. नदीवरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असताना पाण्यासोबत गाळही येतो. गढूळ पाणी साठविण्याच्या जलकुंभात जमा होते. जलकुंभाची नियमित स्वच्छता होत नाही. यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. नेहमीची समस्या लक्षात घेऊन नळयोजनेलाच जलशुद्धीकरण योजना द्यावी, अशी मागणी गावकरी आणि ग्रामपंचायतीकडून प्रशासनाला करण्यात आली आहे. अजूनही ती मान्य झाली नाही.

गावाची गरज लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने जलशुद्धीकरण संयंत्र (वाॅटर एटीएम ) सुरू करण्यात आले. त्याचा लाभ बरेच नागरिक घेतात. मागील २५ दिवसांपासून सदर वाॅटर एटीएमही बंद पडले आहे.