शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

पहाडावरील १० गावांमध्ये पेटणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:24 IST

तालुक्यातील दहा गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने ही समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना केली नाही तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देविहिरींनी तळ गाठला : पाण्यासाठी महिलांची भटकंती

मनोज गोरे ।आॅनलाईन लोकमतकोरपना : तालुक्यातील दहा गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने ही समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना केली नाही तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले. पहाडावरील अनेक गावांमधील बोरवेल बंद पडल्या. पिण्याच्या पाण्यासाठी अन्य साधन नसल्याने महिलांचे हाल होत आहे. संवर्ग विकास अधिकारी घोन्सीकर, तहसीलदार गाडे यांनी नुकताच टंचाईग्रस्त गावाचा दौरा करुन पाहणी केली. सरपंच व ग्रामसचिवांकडून माहिती मागवून उपाययोजना केल्याचे सांगण्यात आले. परंतु पत्येक्षात कोणतेही कामे सुरू झाली नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.टंचाईग्रस्त गावांमधील महिला प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त करीत आहेत. कातलाबोडी, पारधीगुडा, शिवापूर, बोरगाव, भोईगुडा, परसोडा गुडा, भागलहिरा, उमरहिरा आदी गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या समपातळीवर असलेल्या गावांमध्ये टंचाई नाहीत. परंतु, अनेक बोरवेल बंद आहेत. ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरू केली. परंतु आर्थिक मर्यादा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई गावाची माहिती घेवून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा एप्रिल- मे महिन्यात पाण्यासाठी गावागावांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचे हालयेथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात पाण्याची भीषण टंचाई आहे. पाणी मिळत नसल्याने बाहेरुन आणण्याची वेळ आली. ग्रामीण रुग्णालयात पुरेसे पाणी मिळत नाही, असा आरोप केला जात आहे.पाण्याची टाकी शोभेची वास्तूग्रामीण रुग्णालय परिसरात पाण्याची टाकी बांधण्यात आली. पुरेसे पाणी मिळत नसल्याने शोभेची वास्तू ठरली आहे. पंचायत समिती, पोलीस स्टेशन व विविध शासकीय कार्यालयामध्येही मुबलक पाणी मिळत नाही.शहरामध्ये टंचाई निर्माण झाल्यास टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात आम्ही खबरदारी घेत आहोत. नागरिकांच्या गरजा लक्षात घेवून उपाययोजनेचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.- नंदा बावणे, नगराध्यक्ष, कोरपनातालुक्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. संकटग्रस्त गावांमध्ये तातडीने उपाययोजना केली जाणार आहे.- हरिश गाडे, तहसीलदार, कोरपना