शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

पहाडावरील १० गावांमध्ये पेटणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:24 IST

तालुक्यातील दहा गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने ही समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना केली नाही तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देविहिरींनी तळ गाठला : पाण्यासाठी महिलांची भटकंती

मनोज गोरे ।आॅनलाईन लोकमतकोरपना : तालुक्यातील दहा गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने ही समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना केली नाही तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले. पहाडावरील अनेक गावांमधील बोरवेल बंद पडल्या. पिण्याच्या पाण्यासाठी अन्य साधन नसल्याने महिलांचे हाल होत आहे. संवर्ग विकास अधिकारी घोन्सीकर, तहसीलदार गाडे यांनी नुकताच टंचाईग्रस्त गावाचा दौरा करुन पाहणी केली. सरपंच व ग्रामसचिवांकडून माहिती मागवून उपाययोजना केल्याचे सांगण्यात आले. परंतु पत्येक्षात कोणतेही कामे सुरू झाली नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.टंचाईग्रस्त गावांमधील महिला प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त करीत आहेत. कातलाबोडी, पारधीगुडा, शिवापूर, बोरगाव, भोईगुडा, परसोडा गुडा, भागलहिरा, उमरहिरा आदी गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या समपातळीवर असलेल्या गावांमध्ये टंचाई नाहीत. परंतु, अनेक बोरवेल बंद आहेत. ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरू केली. परंतु आर्थिक मर्यादा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई गावाची माहिती घेवून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा एप्रिल- मे महिन्यात पाण्यासाठी गावागावांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचे हालयेथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात पाण्याची भीषण टंचाई आहे. पाणी मिळत नसल्याने बाहेरुन आणण्याची वेळ आली. ग्रामीण रुग्णालयात पुरेसे पाणी मिळत नाही, असा आरोप केला जात आहे.पाण्याची टाकी शोभेची वास्तूग्रामीण रुग्णालय परिसरात पाण्याची टाकी बांधण्यात आली. पुरेसे पाणी मिळत नसल्याने शोभेची वास्तू ठरली आहे. पंचायत समिती, पोलीस स्टेशन व विविध शासकीय कार्यालयामध्येही मुबलक पाणी मिळत नाही.शहरामध्ये टंचाई निर्माण झाल्यास टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात आम्ही खबरदारी घेत आहोत. नागरिकांच्या गरजा लक्षात घेवून उपाययोजनेचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.- नंदा बावणे, नगराध्यक्ष, कोरपनातालुक्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. संकटग्रस्त गावांमध्ये तातडीने उपाययोजना केली जाणार आहे.- हरिश गाडे, तहसीलदार, कोरपना