शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षक, वनपाल, वनमजुरांचा बेमुदत संप

By admin | Updated: August 27, 2014 23:24 IST

वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांच्यावर शासनाकडून होत असलेल्या सततच्या अन्यायामुळे ब्रह्मपुरी उपविभागीय संघटनेच्या वतीने २७ आॅगस्टपासून बेमुदत संप सुरु केले आहे.

ब्रह्मपुरी : वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांच्यावर शासनाकडून होत असलेल्या सततच्या अन्यायामुळे ब्रह्मपुरी उपविभागीय संघटनेच्या वतीने २७ आॅगस्टपासून बेमुदत संप सुरु केले आहे.संघटनेने वारंवार शासन व वनविभागाकडे निवेदन, सभा विनंती, शांतता मार्गाने धरणे आंदोलन, साखळी उपोषण केले. परंतु, शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. अनेक मागण्या २० वर्षापासून प्रलंबित आहेत त्यामुळे संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. शासनस्तरावरुन मागणीला कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही. संघटनेने वनरक्षक, वनपाल यांची अन्यायकारक वेतनश्रेणी सुधारणा करणे, वनरक्षक, वनपाल यांना कायम प्रवासभत्ता मंजूर करणे, पोलीस विभागाप्रमाणे सोयीसवलती व भत्ते लागू करणे, एमआरईजीएस विभागाप्रमाणे काम केलेल्या रोजंदारी वन कामगारांना कायम करणे, शासन निर्णय १६ आॅक्टोबर २०१२ अन्वये स्थायी वनकामगारांची सेवा ३० जून २००४ पासून ग्राह्य धरावी, वनमजूरांचा पाच लाखांचाविमा शासनाने काढावा, आदी मागण्यांसाठी बेमुदत बंद वनविभागाच्या कार्यालयासमोर सुरु केले आहे. संपात एन.डी. मडावी, जे. एम. वैद्य, एस.बी. बुरडकर, डी.एस. गेडाम, सिडाम, हटवार, नेरलवार, मोहुर्ले व अन्य वनमजूर सहभागी आहेत. यावेळी ब्रह्मपुरी संघटनेसह नागभीड, चिमूर, तळोधी, सिंदेवाही येथील सर्व वनकर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)