शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

पावले चालती जोगापूरची वाट !

By admin | Updated: December 19, 2015 00:50 IST

मनाला मोहून टाकणारी घणदाट वनराई आणि निसर्गरम्य वातावरणात असलेले जोगापूरचे हनुमान मंदिर आहे.

यात्रास्थळी सुविधा पुरविण्याची गरज : मार्गशिर्ष प्रतिपदेपासून यात्रेला प्रारंभशाहु नारनवरे विरूर (स्टे)मनाला मोहून टाकणारी घणदाट वनराई आणि निसर्गरम्य वातावरणात असलेले जोगापूरचे हनुमान मंदिर आहे. मार्गशीर्ष प्रतिप्रदेपासून शनिवार व सोमवारला येथे मोठी यात्रा भरते. या पार्श्वभूमीवर ‘पावले चालती जोगापूरची वाट’ याची प्रचिती येते.तसेच भाविक आपल्या सोयीनुसार आठवड्यातून कोणत्याही दिवशी देवदर्शनाला जातात. महिनाभर भाविकांची व यात्रेकरूची गर्दी असते. म्हणून या जोगापूरच्या यात्रेला फार महत्वाचे मानले जाते. राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) पासून उत्तरलेला सात किमी अंतरावर जोगापूरचे देवस्थान आहे. येथे राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, बल्लारपूर, चंद्रपूर यासारख्या मोठ्या शहरातून तसेच विरूर व परिसरातील सर्वच भागातील खेड्यापाड्यातून या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. देवदर्शनाला येणारे भाविक बैलबंडी, रेंगी, सायकल मोटार, जीप, कमांडर, ट्रक, एस.टी., ट्रॅक्टर आदी वाहनांनी येताना दिसतात. काही भाविक आपल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी पायदळसुद्धा दर्शनाला येतात.जोगापूर हनुमान मंदिर परिसरात एक ते सव्वा महिन्यापर्यंत दुकाने थाटली जातात. त्यात हॉटेल, खेळणीचे दुकान, पानटपरी, किराणा, भाजीपाला आदी किरकोळ दुकाने असतात. काही दुकाने तर एक महिनाभर मुक्कामाला असतात. यात्रेला भाविकांची गर्दी वाढत असल्याने दिवसेंदिवस दुकानात वाढ होत आहे. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेच्या भरवश्यावर त्यांच्या पोटाची खळगी भरली जाते. मात्र हे सर्व करताना त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे.जोगापूर या ठिकाणी सात हनुमानाची मूर्ती असल्याचे काही वृद्ध लोकांनी सांगितले. परंतु त्यातील आता फक्त दोनच हनुमानाच्या मूर्ती अस्तित्वात आहेत. बाकीच्या मूर्ती गुप्तधनाच्या लालसेने काही समाजकंटकांनी नाहीसे केल्याचे कळते. आता अस्तित्वात असलेले दोन्ही हनुमानाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. श्रद्धाळु नवस ठेऊन पूजा पाठ करतात. त्यामुळे जोगापूर यात्रेचे आपसुकच महत्व वाढले आहे. परंतु मागील काही वर्षापासून या यात्रेला वेगळेच रुप आले आहे. तालुक्याला लाभलेला हा धार्मिक वारसा अस्ताला जातो की काय, याची खंत भक्तगणाला वाटू लागली आहे. यात्रेच्या ठिकाणी धार्मिक स्थळी अवैध दारू, अवैध जुगार, तीन पत्ते खेळण्याचा प्रकार वाढला आहे. याकडे पोलीस यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या जोगापूर देवस्थान स्थळी जाण्याकरिता रस्त्याची फार बिकट परिस्थिती झाली असून दुचाकी, चारचाकी वाहनांना तसेच पायी चालणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने भाविक यात्रेला जाण्याचे टाळतात. त्यामुळे राजुरा तालुक्यातील जोगापूरच्या हनुमान देवस्थानाला शासनाने पर्यटनाच्या दृष्टीने निगा राखण्याची गरज निर्माण झाली आहे. विरूर - जोगापूर - राजुरा या मार्गाचे डांबरीकरण करावे. जेणेकरून भाविकांना दर्शनाला जाण्यासाठी सुलभ होईल. तसेच होत असलेल्या अवैध धद्यांना आळा बसवून या स्थळाला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याची गरज आहे.