शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जादुटोण्याच्या भयाने घोडणकप्पीचे अख्खे गाव झाले उजाड!

By admin | Updated: September 23, 2015 04:49 IST

पिढ्यान्पिढ्यापासून एकोप्याने जीवन जगणाऱ्या आदिवासी गुड्यात कुणीतरी जादुटोणा करीत आहे. त्यामुळेच गुड्यात

शंकर चव्हाण ल्ल जिवतीपिढ्यान्पिढ्यापासून एकोप्याने जीवन जगणाऱ्या आदिवासी गुड्यात कुणीतरी जादुटोणा करीत आहे. त्यामुळेच गुड्यात आजाराचे प्रमाण नेहमीच घडत असल्याने त्या काळात एकाचा मृत्यु तर दुसऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले. ही जादुटोण्याचीच करामत असावी, कुणीतरी आपला छेड करतोयं, या भीतीपोटी घोडणकप्पी गुड्यातील २२ कुटुंबांनी शासनाने दिलेल्या घरकुलाचा थारा सोडल्याची घटना मागील आठ महिण्यापूर्वी भारी ग्रामपंचायत मधल्या घोडणकप्पी गावात घडली आहे. २९ कुटुंब व १५२ लोकसंख्या असलेल्या या गुड्यात आजच्या स्थितीत सातच कुटुंब वास्तव्यास असून तेही दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. मात्र आजपर्यंत या गंभीर घटनेची दखल कुणीही घेतले नसल्याचे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या आॅन द स्पॉट भेटीत पाहायला मिळाले. भारी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या घोडणकप्पी या गुड्यात गेल्या अनेक वर्षापासून एकोप्याने राहणाऱ्या आदिवासी बांधवांना प्यायला पाणी नाही, जायला धड रस्ता नाही, जवळपास दवाखाण्याची सोय नाही, दोन शिक्षकी जिल्हा परिषदेची शाळा असलेल्या या गुड्यात विद्युत खांब आहे. मात्र चार महिन्यापासून वीज नाही, अशा अनेक समस्या आवासून उभ्या असतानासुद्धा संपूर्ण कुटुंबात, गावात आनंदाचे वातावरण राहायचे. मात्र या गावाला कुणाची दृष्टच लागली काय, गावात जादुटोण्याच्या संशयाचे भूत निर्माण झाले व काही दिवसातच शासनाच्या योजना सोडून २२ कुटुंबांनी स्थलांतरित होऊन दोन किमी अंतरावर वास्तव्य करीत असल्याचा गंभीर प्रकार पाहायला मिळत आहे.एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असले तरी पहाडावरील काही गावात अंधश्रद्धेवरचा विश्वास कायम आहे. छोट्या-मोठ्या आजारावर ते घरीच उपचार करताना पाहायला मिळते. मागील एक दोन वर्षापूर्वी जादुटोणा करीत असल्याच्या कारणावरुन सोरेकासा येथील पती-पत्नीचा दगडाने ठेचून शेतात हत्या झाली. तेव्हापासून गावकऱ्यांच्या मानगुटीवर अंधश्रद्धेचे भूत बसले असून यावर जनजागृती करण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हालसध्या घोडणकप्पी गावात वास्तव्यास असलेल्या सात कुटुंबापैकी रामु आत्राम या आदिवासी बांधवासोबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने चर्चा केली असता ते म्हणाले, गावात रस्ता, वीज व पिण्याच्या पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत होती. मार्चनंतर गावात आंघोळीचे पाणी तर सोडाच प्यायलाही पाणी मिळत नाही. त्यामुळे त्या नागरिकांनी कंटाळून गाव सोडल्याचे सांगितले.हातपंपही दुर्लक्षित४गेल्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर गावात शासनाने हातपंप खोदले. मात्र गेल्या सहा महिन्यापासून त्याची फिटींग केली नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल कायम दिसत असून विद्युत पुरवठाही गेल्या चार महिन्यापासून गावात बंद आहे. नाल्याच्या कडेला त्यांचे वास्तव्य!४जादुटोण्याच्या कारणावरुन शासकीय योजनेंतर्गत राहण्यासाठी दिलेले घरकुल सोडून स्थलांतरित झालेले २२ आदिवासी कुटुंबांनी गेल्या आठ महिन्यापासून घोडणकप्पी गावापासून दोन किमी अंतरावर नाल्याच्या कडेला कुठलीही सोय-सुविधा नसतानाही ते आपले जीवन कंठत आहे.परिसरातील काही गावात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असून आजही अनेक गावातील आदिवासी बांधवात शैक्षणिक जनजागृती निर्माण झालेली नाही. त्यांचा अंधश्रद्धेवर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. त्यामुळे जादुटोण्याच्या कारणावरुन नेहमीच वाद घडत असतात आणि अशाच प्रकारामुळे काही कुटुंबांनी गाव सोडल्याचा अंदाज आहे.- पंकज पवार, जिल्हा परिषद सदस्य, चंद्रपूर