शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

जादुटोण्याच्या भयाने घोडणकप्पीचे अख्खे गाव झाले उजाड!

By admin | Updated: September 23, 2015 04:49 IST

पिढ्यान्पिढ्यापासून एकोप्याने जीवन जगणाऱ्या आदिवासी गुड्यात कुणीतरी जादुटोणा करीत आहे. त्यामुळेच गुड्यात

शंकर चव्हाण ल्ल जिवतीपिढ्यान्पिढ्यापासून एकोप्याने जीवन जगणाऱ्या आदिवासी गुड्यात कुणीतरी जादुटोणा करीत आहे. त्यामुळेच गुड्यात आजाराचे प्रमाण नेहमीच घडत असल्याने त्या काळात एकाचा मृत्यु तर दुसऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले. ही जादुटोण्याचीच करामत असावी, कुणीतरी आपला छेड करतोयं, या भीतीपोटी घोडणकप्पी गुड्यातील २२ कुटुंबांनी शासनाने दिलेल्या घरकुलाचा थारा सोडल्याची घटना मागील आठ महिण्यापूर्वी भारी ग्रामपंचायत मधल्या घोडणकप्पी गावात घडली आहे. २९ कुटुंब व १५२ लोकसंख्या असलेल्या या गुड्यात आजच्या स्थितीत सातच कुटुंब वास्तव्यास असून तेही दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. मात्र आजपर्यंत या गंभीर घटनेची दखल कुणीही घेतले नसल्याचे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या आॅन द स्पॉट भेटीत पाहायला मिळाले. भारी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या घोडणकप्पी या गुड्यात गेल्या अनेक वर्षापासून एकोप्याने राहणाऱ्या आदिवासी बांधवांना प्यायला पाणी नाही, जायला धड रस्ता नाही, जवळपास दवाखाण्याची सोय नाही, दोन शिक्षकी जिल्हा परिषदेची शाळा असलेल्या या गुड्यात विद्युत खांब आहे. मात्र चार महिन्यापासून वीज नाही, अशा अनेक समस्या आवासून उभ्या असतानासुद्धा संपूर्ण कुटुंबात, गावात आनंदाचे वातावरण राहायचे. मात्र या गावाला कुणाची दृष्टच लागली काय, गावात जादुटोण्याच्या संशयाचे भूत निर्माण झाले व काही दिवसातच शासनाच्या योजना सोडून २२ कुटुंबांनी स्थलांतरित होऊन दोन किमी अंतरावर वास्तव्य करीत असल्याचा गंभीर प्रकार पाहायला मिळत आहे.एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असले तरी पहाडावरील काही गावात अंधश्रद्धेवरचा विश्वास कायम आहे. छोट्या-मोठ्या आजारावर ते घरीच उपचार करताना पाहायला मिळते. मागील एक दोन वर्षापूर्वी जादुटोणा करीत असल्याच्या कारणावरुन सोरेकासा येथील पती-पत्नीचा दगडाने ठेचून शेतात हत्या झाली. तेव्हापासून गावकऱ्यांच्या मानगुटीवर अंधश्रद्धेचे भूत बसले असून यावर जनजागृती करण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हालसध्या घोडणकप्पी गावात वास्तव्यास असलेल्या सात कुटुंबापैकी रामु आत्राम या आदिवासी बांधवासोबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने चर्चा केली असता ते म्हणाले, गावात रस्ता, वीज व पिण्याच्या पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत होती. मार्चनंतर गावात आंघोळीचे पाणी तर सोडाच प्यायलाही पाणी मिळत नाही. त्यामुळे त्या नागरिकांनी कंटाळून गाव सोडल्याचे सांगितले.हातपंपही दुर्लक्षित४गेल्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर गावात शासनाने हातपंप खोदले. मात्र गेल्या सहा महिन्यापासून त्याची फिटींग केली नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल कायम दिसत असून विद्युत पुरवठाही गेल्या चार महिन्यापासून गावात बंद आहे. नाल्याच्या कडेला त्यांचे वास्तव्य!४जादुटोण्याच्या कारणावरुन शासकीय योजनेंतर्गत राहण्यासाठी दिलेले घरकुल सोडून स्थलांतरित झालेले २२ आदिवासी कुटुंबांनी गेल्या आठ महिन्यापासून घोडणकप्पी गावापासून दोन किमी अंतरावर नाल्याच्या कडेला कुठलीही सोय-सुविधा नसतानाही ते आपले जीवन कंठत आहे.परिसरातील काही गावात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असून आजही अनेक गावातील आदिवासी बांधवात शैक्षणिक जनजागृती निर्माण झालेली नाही. त्यांचा अंधश्रद्धेवर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. त्यामुळे जादुटोण्याच्या कारणावरुन नेहमीच वाद घडत असतात आणि अशाच प्रकारामुळे काही कुटुंबांनी गाव सोडल्याचा अंदाज आहे.- पंकज पवार, जिल्हा परिषद सदस्य, चंद्रपूर