शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

जादुटोण्याच्या भयाने घोडणकप्पीचे अख्खे गाव झाले उजाड!

By admin | Updated: September 23, 2015 04:49 IST

पिढ्यान्पिढ्यापासून एकोप्याने जीवन जगणाऱ्या आदिवासी गुड्यात कुणीतरी जादुटोणा करीत आहे. त्यामुळेच गुड्यात

शंकर चव्हाण ल्ल जिवतीपिढ्यान्पिढ्यापासून एकोप्याने जीवन जगणाऱ्या आदिवासी गुड्यात कुणीतरी जादुटोणा करीत आहे. त्यामुळेच गुड्यात आजाराचे प्रमाण नेहमीच घडत असल्याने त्या काळात एकाचा मृत्यु तर दुसऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले. ही जादुटोण्याचीच करामत असावी, कुणीतरी आपला छेड करतोयं, या भीतीपोटी घोडणकप्पी गुड्यातील २२ कुटुंबांनी शासनाने दिलेल्या घरकुलाचा थारा सोडल्याची घटना मागील आठ महिण्यापूर्वी भारी ग्रामपंचायत मधल्या घोडणकप्पी गावात घडली आहे. २९ कुटुंब व १५२ लोकसंख्या असलेल्या या गुड्यात आजच्या स्थितीत सातच कुटुंब वास्तव्यास असून तेही दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. मात्र आजपर्यंत या गंभीर घटनेची दखल कुणीही घेतले नसल्याचे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या आॅन द स्पॉट भेटीत पाहायला मिळाले. भारी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या घोडणकप्पी या गुड्यात गेल्या अनेक वर्षापासून एकोप्याने राहणाऱ्या आदिवासी बांधवांना प्यायला पाणी नाही, जायला धड रस्ता नाही, जवळपास दवाखाण्याची सोय नाही, दोन शिक्षकी जिल्हा परिषदेची शाळा असलेल्या या गुड्यात विद्युत खांब आहे. मात्र चार महिन्यापासून वीज नाही, अशा अनेक समस्या आवासून उभ्या असतानासुद्धा संपूर्ण कुटुंबात, गावात आनंदाचे वातावरण राहायचे. मात्र या गावाला कुणाची दृष्टच लागली काय, गावात जादुटोण्याच्या संशयाचे भूत निर्माण झाले व काही दिवसातच शासनाच्या योजना सोडून २२ कुटुंबांनी स्थलांतरित होऊन दोन किमी अंतरावर वास्तव्य करीत असल्याचा गंभीर प्रकार पाहायला मिळत आहे.एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असले तरी पहाडावरील काही गावात अंधश्रद्धेवरचा विश्वास कायम आहे. छोट्या-मोठ्या आजारावर ते घरीच उपचार करताना पाहायला मिळते. मागील एक दोन वर्षापूर्वी जादुटोणा करीत असल्याच्या कारणावरुन सोरेकासा येथील पती-पत्नीचा दगडाने ठेचून शेतात हत्या झाली. तेव्हापासून गावकऱ्यांच्या मानगुटीवर अंधश्रद्धेचे भूत बसले असून यावर जनजागृती करण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हालसध्या घोडणकप्पी गावात वास्तव्यास असलेल्या सात कुटुंबापैकी रामु आत्राम या आदिवासी बांधवासोबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने चर्चा केली असता ते म्हणाले, गावात रस्ता, वीज व पिण्याच्या पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत होती. मार्चनंतर गावात आंघोळीचे पाणी तर सोडाच प्यायलाही पाणी मिळत नाही. त्यामुळे त्या नागरिकांनी कंटाळून गाव सोडल्याचे सांगितले.हातपंपही दुर्लक्षित४गेल्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर गावात शासनाने हातपंप खोदले. मात्र गेल्या सहा महिन्यापासून त्याची फिटींग केली नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल कायम दिसत असून विद्युत पुरवठाही गेल्या चार महिन्यापासून गावात बंद आहे. नाल्याच्या कडेला त्यांचे वास्तव्य!४जादुटोण्याच्या कारणावरुन शासकीय योजनेंतर्गत राहण्यासाठी दिलेले घरकुल सोडून स्थलांतरित झालेले २२ आदिवासी कुटुंबांनी गेल्या आठ महिन्यापासून घोडणकप्पी गावापासून दोन किमी अंतरावर नाल्याच्या कडेला कुठलीही सोय-सुविधा नसतानाही ते आपले जीवन कंठत आहे.परिसरातील काही गावात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असून आजही अनेक गावातील आदिवासी बांधवात शैक्षणिक जनजागृती निर्माण झालेली नाही. त्यांचा अंधश्रद्धेवर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. त्यामुळे जादुटोण्याच्या कारणावरुन नेहमीच वाद घडत असतात आणि अशाच प्रकारामुळे काही कुटुंबांनी गाव सोडल्याचा अंदाज आहे.- पंकज पवार, जिल्हा परिषद सदस्य, चंद्रपूर