शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

वेकोलिचा अहवाल कोळसा मंत्रालयाला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:25 IST

बल्लारपूर वेकोलि क्षेत्राच्या अंतर्गत पौनी-२ खुल्या खाणीकरिता ७६० एकर जमिनीचे अधिग्रहण झाले. गात्र अनेकांना नोकऱ्या मिळाल्या नाही. त्यामुळे वेकोलि विरोधात संतप्त प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण सुरू केले. याबाबत ना. हंसराज अहीर यांनीही प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा केला. अखेर वेकोलि मुख्यालयाने सकारात्मक अहवाल कोळसा मंत्रालयाला पाठविला. त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे : नोकरी देण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्राच्या अंतर्गत पौनी-२ खुल्या खाणीकरिता ७६० एकर जमिनीचे अधिग्रहण झाले. गात्र अनेकांना नोकऱ्या मिळाल्या नाही. त्यामुळे वेकोलि विरोधात संतप्त प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण सुरू केले. याबाबत ना. हंसराज अहीर यांनीही प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा केला. अखेर वेकोलि मुख्यालयाने सकारात्मक अहवाल कोळसा मंत्रालयाला पाठविला. त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.पौनी-२ खुल्या खाणीकरिता ७६० एकर जमिनीचे अधिग्रहण झाले. त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने आठ लाख, १० लाख रूपये प्रति एकर भाव व दोनशेच्यावर नोकऱ्या, महिला, अंध, अपंगांनासुध्दा नोकºया मिळाल्या. परंतु या दरम्यान या प्रकल्पामध्ये सीबी अ‍ॅक्ट १९५७ सेक्शन ९ च्या अधिसूचनेच्या दिल्ली येथील प्रकाशनाची अधिसूचना जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना देण्यात न आल्याने व दुय्यम निबंधक, राजुरा यांना उशिरा देण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांच्या खरेदी-विक्री चालू राहिल्या. परंतु या सर्व नवीन जमीन मालकांना नोकऱ्या देण्यास वेकोलिने नकार दिला होता.प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हा विषय खुशाल बोंडे, राहुल सराफ, राजू घरोटे, अ‍ॅड. प्रशांत घरोटे यांच्यापर्यंत पोचविल्यानंतर ना. अहीर यांच्या मार्गदर्शनात हा विषयावरील शेतकऱ्यांना नोकरी मिळण्याबाबत वेगवेगळया पातळयांवर प्रयत्न करण्यात आले व जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी याबाबत या २२ शेतकऱ्यांना नोकरीत सामावून घेण्याबाबत १९ आॅक्टोंबर २०१६ व ३ आॅक्टोबर २०१८ रोजी आदेश पारित केला आणि वेकोलि मुख्यालयाने हा आदेश कोळसा मंत्रालयाकडे पुढील निदेर्शाकरिता पाठविला. परंतु ही सगळी प्रक्रिया ना. अहीर यांच्या प्रयत्नाने सुरळीत चालू असताना अंतिम टप्प्यात मंत्रालयातून मुख्यालयाला अहवाल मागितला असता मुख्यालयाने पुर्णत: चुकीचा व नकारात्मक अहवाल पाठविला. यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी वेकोलिच्या विरोधात २६ नोव्हेंबर २०१८ पासून ााजपा जिल्हा किसान आघाडीचे महामंत्री राजू घरोटे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणाची सुरूवात केली. आंदोलनादरम्यान वेकोलि प्रबंधन व उपोषणकर्ते यांच्यामध्ये चर्चा होवून मागणीनुसार मुख्यालयाने पाठविलेला चुकीचा अहवालाऐवजी नवीन सकारात्मक अहवाल प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मुद्यासह २९ नोव्हेबरला कोळसा मंत्रालयाला पाठविला व याची प्रत उपोषणकर्त्र्यांना देण्यात आली व याबाबत मंत्रालयातून त्वरित निर्णय येण्याबाबत वेकोलिसोबत पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासनसुध्दा देण्यात आले. यावेळी वेकोलि मुख्यालय महाप्रबंधक बी.सी. सिंह, उपक्षेत्रिय प्रबंधक सी.पी. सिंग, राजुराचे ठाणेदार कोकाटे, खुशाल बोंडे, वाघुजी गेडाम, राहुल सराफ, सतीश दांडगे, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, सचिन डोहे, उपोषणकर्ते किरण सिंगाराव, प्रताप सिंगाराव, सिनू दुडम, विक्रम बोंतला, सागर काटवले आदी उपस्थित होते.