शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला रस्त्यावर उतरून जागे करा

By admin | Updated: October 9, 2016 01:27 IST

राज्यात अनेक प्रश्न आणि समस्या खितपत पडलेल्या असतानाही सरकार आणि त्यातील मंत्री केवळ वारेमाप घोषणा देत आहेत.

अशोक चव्हाण : धरणा मंडपात दिला कार्यकर्त्यांना संदेशचंद्रपूर : राज्यात अनेक प्रश्न आणि समस्या खितपत पडलेल्या असतानाही सरकार आणि त्यातील मंत्री केवळ वारेमाप घोषणा देत आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला रस्त्यावर उतरुन जागे करा, असा संदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची दिला.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुढाकारात विदर्भ मजदूर काँग्रेसच्या वतीने आयोजित रॅली आणि धरणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत घारड, राहुल पुगलिया, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महानगर अध्यक्ष नंदू नागरकर, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबूराव वाघमारे, आसावरी देवतळे आदी प्रामुख्याने मंचावर होते.यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, हे सरकार कामाचे नाही. जिवंतपणी शेतकरी मरणयातना भोगत असताना आत्महत्येनंतर मात्र मदत दिली जाते. पेट्रोल-डिझेलवर एक रुपया अधिभार लावून दीड हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले. मात्र शेतकऱ्यांना छदामही दिला नाही. सरकारने हा अधिभार दूर करून शेतकऱ्यांना मदत करावी. राज्यातील वनजमिनी मोकळ्या करण्याच्या सरकारच्या निर्णयावरही अशोक चव्हाण यांनी टिका केली. वनजमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी आदिवासींच्या जमिनी वृक्षारोपणाच्या नावाखाली बळकविण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, काँग्रेस आदिवासींच्या पाठिशी असल्याने घाबरु नका, असा धिर त्यांनी दिला.चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करातून जनतेवर बोझा टाकला असला तरी जनताच पराभवाच्या रुपाने उत्तर देईल, काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक मुद्दे लावून धरावे, असे ते म्हणाले. महानगर पालिकेच्या राजकारणात जे पक्ष सोडून दुसरीकडे गेले त्यांना जाऊ द्या. परत बोलाविण्याची गरज नाही. नव्यांना संधी देऊ, आहे त्यांना ताकद देऊ असे ते म्हणाले.माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सरकारवर टिका केली. केंद्रात व राज्यात काँग्रेसचा पराभव झाला असला तरी ७५ टक्के ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा विजय झाला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी पालकमंत्र्यावरही टिका केली. आदिवासींच्या वनजमिनी रिकाम्या करुन घेण्याचे सरकारचे आदेश असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान मार्गदर्शनानंतर हजारो कार्यकर्त्यांनी रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. त्यानंतर स्थानिक गांधी चौकात दिवसभर धरणे दिले. (जिल्हा प्रतिनिधी)वडेट्टीवारांनी फिरविली पाठप्रदेशाध्यक्षांचा कार्यक्रम गावात असतानाही आणि विधानसभा उपगटनेते विजय वडेट्टीवार कालपासून चंद्रपुरात मुक्कामी असूनही धरणास्थळी मात्र फिरकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीची कार्यक्रमात जोरदार चर्चा होती. असे असले तरी वडेट्टीवार गटाचे मानले जाणारे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची मंचावर उपस्थिती होती.