लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये जमा करण्यात येत आहे. ५०० रूपयांसाठी खातेदारांना बँकांसमोर उन्हातान्हात तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लाँकडाऊन सुरू केले. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व कामधंदे बंद पडले आहेत. लोक हातावर हात ठेऊन घरी बसले आहेत. नागभीड तालुक्यात दरवर्षी या महिन्यात शासनाच्या रोजगार हमीची कामे सुरू असायची. रोजगार हमीच्या या कामांवर ८ ते १० हजार मजूर कामावर असायचे. याशिवाय तालुक्यातील २५ ते ३० गावात मिरचीचे सातरे सुरू असायचे. या सातऱ्यांवरही सात ते आठ हजार मजूर काम करायचे. आता रोजगार हमीची कामे आणि मिरची सातरेही बंद आहेत. लोकांचे सर्व आर्थिक प्रवाहच बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळत असलेली ५०० रुपयांची मदत खातेदारांना मोठा आधार ठरत आहेत.सदर अनुदान बँकेतून काढण्यासाठी या खातेदारांची बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेक बँकांनी आपले व्यवहार खातेदारांना आवारात ठेवूनच सुरू केले आहेत. खातेदार अगदी ९ वाजल्यापासूनच बँकेच्या आवारात जमा होत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने १० वाजेपासूनच सूर्य आग ओकायला सुरूवात करतो. या उन्हात बसून किंवा उभे राहून या खातेदारांना आपला नंबर केव्हा लागतो याची तासोगणती प्रतीक्षा करावी लागत आहे.उन्हामुळे दुकानाचा आसराकाही बँक खातेदारांच्या सोईसाठी आवारात छत टाकले आहे. छत तोकडे आहेत. त्यामुळे अर्धोपेक्षा अधिक खातेदार हे रस्त्यावर किंवा दुकानांच्या आडोशाचा आसरा घेत आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियम राखण्यासाठी काही खातेदारच बँकांच्या आवारात बसून असतात. मात्र तरीसुद्धा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे.
५०० रुपयांसाठी उन्हात प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:01 IST
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लाँकडाऊन सुरू केले. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व कामधंदे बंद पडले आहेत. लोक हातावर हात ठेऊन घरी बसले आहेत. नागभीड तालुक्यात दरवर्षी या महिन्यात शासनाच्या रोजगार हमीची कामे सुरू असायची. रोजगार हमीच्या या कामांवर ८ ते १० हजार मजूर कामावर असायचे. याशिवाय तालुक्यातील २५ ते ३० गावात मिरचीचे सातरे सुरू असायचे.
५०० रुपयांसाठी उन्हात प्रतीक्षा
ठळक मुद्देबँकेसमोर ग्राहकांच्या रांगा : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना