शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 20, 2016 00:33 IST

या वर्षी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर बळीराजाही शेतीच्या हंगामपूर्व मशागतीच्या कामाला लागला.

जिल्हा कोरडाच : हवामान खात्याच्या अंदाजानंतरही पाऊस नाहीचंद्रपूर : या वर्षी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर बळीराजाही शेतीच्या हंगामपूर्व मशागतीच्या कामाला लागला. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून बी-बियाणांच्या खरेदी केली आहे. आता हंगामपूर्व मशागतीची कामेही संपुष्टात येत आहेत. दोन-तीनदा मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. मात्र हा पाऊस अत्यल्प होता. आता बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.विशेष म्हणजे, हवामान खात्याने शनिवारी मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील सतत दोन वर्ष शेतकऱ्यांना दुर्दैवी ठरले. आधी अतिवृष्टीने मारले. नंतर अल्पवृष्टीने नुकसान केले. या दोन वर्षात शेतकरी चांगलाच कर्जबाजारी झाला. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी पूर्णता खचून गेला होता. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र पैसेवारीत जिल्हा पात्र ठरला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मदत मिळाली नाही. मागील दोन वर्षांचे झालेले नुकसान विसरून बळीराजा पुन्हा खरीपाच्या तयारीला लागला आहे. शेतातील अनावश्यक कचरा स्वच्छ करण्यात आला आहे. शेणखत टाकण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुंपणाचीही आतापासूनच व्यवस्था करून ठेवलीे आहे. नांगरणी-वखरणीची कामेही सुरू असून तीसुध्दा अंतिम टप्प्यात आहे. इकडे कृषी विभागानेही खरीप हंगामाचे नियोजन करून ठेवले आहे. यंदा कृषी विभागाने ४ लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७७ हजार ६८ हेक्टरवर धानाची लागवड होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यापाठोपाठ कापूस १ लाख ३४ हजार ८२७ हेक्टर व सर्वात कमी सोयाबीन १ लाख १८ हजार हेक्टर, असे लागवड क्षेत्र आहे. मागील वर्षी कापसाने दगा दिल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंत दर्शविली होती. मात्र यावेळी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाची लागवड वाढणार आहे, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. बियाणे व खतांचे आवंटन मंजूर करून घेतले आहे. यावर्षी खरीप हंगामात भात, ज्वारी, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, कडधान्य, अन्नधान्य, भुईमूग, तीळ, सोयाबीन, एरंडी, गळीतधान्य, कापूस, ऊस पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ऐनवेळी शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाने खते मागविली आहेत. खताची एक खेप जिल्ह्यात उपलब्धही झाल्याची माहिती आहे. एकूणच हंगामपूर्वीची सर्व कामे आता आटोपली आहेत. आता बळीराजा केवळ पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मागील दोन-चार दिवसांपासून वातावरणातही फरक पडला आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होते. जिल्ह्यात दोन-तीनदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरीही लावली आहे. मात्र हा पाऊस किरकोळ स्वरुपाचा होता. आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)अंदाज चुकेल का, अशी भीती हवामान खात्याने यावर्षी सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडेल, व मान्सून वेळेवर दाखल होईल असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. मात्र मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले. आता शनिवारी पुन्हा पुणे येथील हवामान खात्याने मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे म्हटले आहे. २४ तासात विदर्भात मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज होता. मात्र जिल्ह्यात रविवारी दिवसभर पाऊस आला नाही. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकेल काय, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. खताच्या लिंकिंगची शक्यताखरीप हंगामात कृषी केंद्रधारकांकडून बी-बियाणे व खतांचा तुटवडा दाखवून अधिकच्या भावाने खत व बियाणांची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. यासोबतच खताची लिंकिंगही केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात कृषी विभागाने पथके गठित केलीदरपत्रक लावणे आवश्यककृषी केंद्रधारकांनी आपापल्या केंद्रात खत व बियाणांचे दरपत्रक लावणे आवश्यक आहे. दरपत्रक लावले आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात यावे, अशी मागणी आहे. यासोबतच केंद्रधारकांनी त्यांच्याकडे असलेल्या स्टॉकची माहितीही दरपत्रकात नमूद करणे अनिवार्य आहे.