शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मालकी हक्काची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By admin | Updated: February 5, 2015 23:06 IST

जमिनीचा पट्टा हा आपल्याला शासनाकडून मिळालेला हक्काचा दाखला असतो. मात्र, आंध्र सीमेवरील १४ गावातील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टेच मिळालेले नाही. येथील शेतकरी जमीन

संघरक्षित तावाडे - जिवतीजमिनीचा पट्टा हा आपल्याला शासनाकडून मिळालेला हक्काचा दाखला असतो. मात्र, आंध्र सीमेवरील १४ गावातील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टेच मिळालेले नाही. येथील शेतकरी जमीन कसून उत्पन्न तर घेतात मात्र, मालकी हक्क मिळालेला नाही. शेतीच्या पट्ट्यासाठी येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे हट्ट धरला आहे. मात्र, दोन्ही राज्याच्या शासनाने अद्यापही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या गावांत रस्त्यांचाही प्रश्न तितकाच ऐरणीवर आहे. गावांचा विकास रस्त्याने होतो असे मानले जात असले तरी अनेक गावात रस्तेच पोहचले नाहीत. हिच स्थिती सीमेवरील चौदा गावांपैकी काही गावांची आहे. इंदिरानगर, पळसगुडा, नारायनगुडा, शंकरलोधी या गावांपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. परमडोली ते मुकदमगुडा हा तीन किमीचा रस्ता आंध्र शासनाने तयार केला तर दुसरीकडे मुकदमगुडा ते महाराजगुडा हा पाच किमीचा रस्त्यासाठी दोन-तीन वर्षापासून केवळ गिट्टी टाकून ठेवण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र व आंध्र सरकार या गावांवर आपला दावा सांगत असले तरी विकास मात शून्य आहे. एकमेकांच्या हेव्यादाव्याने आमचा विकास होत नाही, दोन्ही राज्याच्या कचाट्यात सापडून आमचा विकास खुंटल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जमिनीचे पट्टे असते तर दुष्काळ स्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत येथील शेतकऱ्यांना मिळाली असती. अडचणींच्या वेळेस कर्ज घेण्यास मदत झाली असती. मात्र, मालकी हक्कच नसल्याने शासनाच्या योजनांपासून येथील शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. शासन कधी लक्ष देणार याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.