शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

नाफेडच्या चुकाऱ्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:14 IST

मागीलवर्षी वेळी अवेळी पाऊस पडला. त्यानंतर रोगाच्या प्रादुर्भावाचा तुरीलाही फटका बसला. मात्र, वेळीच उपाययोजना केल्याने शेतकऱ्यांना तूर वाचविण्यात यश आले. बऱ्यापैकी तूर निघाली.

ठळक मुद्देतूर उत्पादकांची बोळवण : जिल्ह्यात ३१ क्विंटलची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागीलवर्षी वेळी अवेळी पाऊस पडला. त्यानंतर रोगाच्या प्रादुर्भावाचा तुरीलाही फटका बसला. मात्र, वेळीच उपाययोजना केल्याने शेतकऱ्यांना तूर वाचविण्यात यश आले. बऱ्यापैकी तूर निघाली. मात्र योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना नकार देत नाफेडला पसंती दिली. त्यामुळे मागील चार महिन्यांत जवळपास ३१ हजार ६१७ क्विंटल तुरीची खरेदी नाफेडने केली. मात्र, त्यातील काही मोजक्यात तूर उत्पादकांना चुकारे देण्यात आले. तर शेकडो उत्पादकांना अजूनही तूर खरेदीच्या चुकाºयाची प्रतीक्षा आहे. परिणामी शेतकऱ्यांना नाफेड कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.धान, सोयाबीन, कापसापाठोपाठ जिल्ह्यात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. खासकरुन कोरपना, राजुरा, वरोरा आणि चंद्रपूरच्या काही भागांत तुरीचे पीक घेतल्या जाते. यंदा तुरीचे उत्पादनबºयापैकी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचवल्या होत्या. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांपासून जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीची प्रक्रिया सुरु केली. यासाठी जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, वरोरा आणि चंद्रपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीची व्यवस्था करण्यात आली होती. पूर्वी बाजार समितीत तूर आणल्यानंतर त्याची खरेदी व्हायची. मात्र, खरेदीला वेळ लागायचा. त्यामुळे त्यात नाफेडने बदल केला.यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आॅनलाईन नोंदणी करण्याचे तूर उत्पादकांना सांगण्यात आले. त्यामुळे पीकपेराचा सातबारा, बँक पासबुक आणि आधार कॉर्ड घेऊन शेतकºयांनी नोंदणी केली. त्यानंतर बाजार समितीतून संदेश आल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर नाफेडच्या स्वाधीन केली. एप्रिल महिन्यात पाच हजार ९१७.४५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यांचे पैसेही टप्प्याटप्प्याने देण्यात आले होते.१५ मे रोजी तूर खरेदीची शेवटची तारीख होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात अनेक शेतकºयांनी तूर नाफेडला विकली. त्यात चंद्रपुरात चार हजार ६९६ क्विंटल, वरोरा येथे १५ हजार ६५७ क्विंटल, कोरपना आठ हजार ५९२ क्विंटल आणि राजुरा येथे दोन हजार ६१६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. एप्रिल महिन्यात ज्यांनी तूर विकली. त्यांना पैसे देण्यात आले. मात्र, शेवटच्या टप्प्यात तूर विकणाऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही.निधीच नसल्याने पैसे तूर उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. त्यामुळे त्यांच्या नाफेडच्या कार्यालयात चकरा सुरु झाल्या असून त्वरीत चुकारा देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.