शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

पणन महासंघाच्या कापूस खरेदीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत कापूस व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावा लागत आहे. कापसाला ५ हजार ५५० रूपये हमीभाव असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कपाशीची बोंडे झाडावरच सडली. यावर्षी लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत.

ठळक मुद्देव्यापारी मालामाल : केंद्रांअभावी शेतकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पणन महासंघाने अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. परिणामी, खासगी व्यापारी कवडीमोल भावात कापसाची लूट करत आहे. त्यामुळे शासनाने सरकारी कापूस केंद्र्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. पण, जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ नाही. शासनाने अद्याप सरकारी कापूस संकलन केंद्र्र सुरू केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस व्यापाऱ्यांना अल्प भावात विकावा लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. राजुरा, कोरपना, वरोरा, माढेळी येथे पणन महासंघाची कापूस खरेदी केली जायची. परंतु पणनने अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत कापूस व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावा लागत आहे. कापसाला ५ हजार ५५० रूपये हमीभाव असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कपाशीची बोंडे झाडावरच सडली. यावर्षी लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.धान उत्पादकांची चिंता वाढलीसिंदेवाही : धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता दिसत असल्याने धान उत्पादकांची चिंता वाढली तर दुसरीकडे रब्बी हंगामाकरिता शेतात काय पेरावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाच्या वतीने हरभरा व गहू अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जात आहे. अत्यल्प पाण्यात पिकणारे वाण हरभºयाला चांगली मागणी आहे. मात्र, सरकारच्या धोरणामुळे गतवर्षी हरभरा व गव्हाला अल्प भाव जाहीर मिळाला. नफातोट्याचा विचार करता शेतकºयांची गुजरान होईल, एवढे उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी रब्बी हंगामात कोणती पिके घ्यावी, याविषयी चिंताग्रस्त झाले आहेत. भाजीपाल्यातही फुलकोबी व पानकोबीला पाहिजे तेवढा भाव नसल्याने शेतकरी हे पीक घेवू शकत नाही. टमाटरला वर्षभर भाव मिळाला नाही. वांग्याला व मिरचीला बºयांपैकी भाव मिळाला. नवे तंत्र शेतकºयाच्या शेतात पोहचल्यास निश्चितच शेतकरी रब्बी पिके घेऊ शकतात. मात्र, अवकाळी पावसाने यंदा शेतकºयांचे नियोजन कोलमडल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.

टॅग्स :cottonकापूस