शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पणन महासंघाच्या कापूस खरेदीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत कापूस व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावा लागत आहे. कापसाला ५ हजार ५५० रूपये हमीभाव असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कपाशीची बोंडे झाडावरच सडली. यावर्षी लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत.

ठळक मुद्देव्यापारी मालामाल : केंद्रांअभावी शेतकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पणन महासंघाने अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. परिणामी, खासगी व्यापारी कवडीमोल भावात कापसाची लूट करत आहे. त्यामुळे शासनाने सरकारी कापूस केंद्र्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. पण, जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ नाही. शासनाने अद्याप सरकारी कापूस संकलन केंद्र्र सुरू केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस व्यापाऱ्यांना अल्प भावात विकावा लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. राजुरा, कोरपना, वरोरा, माढेळी येथे पणन महासंघाची कापूस खरेदी केली जायची. परंतु पणनने अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत कापूस व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावा लागत आहे. कापसाला ५ हजार ५५० रूपये हमीभाव असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कपाशीची बोंडे झाडावरच सडली. यावर्षी लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.धान उत्पादकांची चिंता वाढलीसिंदेवाही : धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता दिसत असल्याने धान उत्पादकांची चिंता वाढली तर दुसरीकडे रब्बी हंगामाकरिता शेतात काय पेरावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाच्या वतीने हरभरा व गहू अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जात आहे. अत्यल्प पाण्यात पिकणारे वाण हरभºयाला चांगली मागणी आहे. मात्र, सरकारच्या धोरणामुळे गतवर्षी हरभरा व गव्हाला अल्प भाव जाहीर मिळाला. नफातोट्याचा विचार करता शेतकºयांची गुजरान होईल, एवढे उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी रब्बी हंगामात कोणती पिके घ्यावी, याविषयी चिंताग्रस्त झाले आहेत. भाजीपाल्यातही फुलकोबी व पानकोबीला पाहिजे तेवढा भाव नसल्याने शेतकरी हे पीक घेवू शकत नाही. टमाटरला वर्षभर भाव मिळाला नाही. वांग्याला व मिरचीला बºयांपैकी भाव मिळाला. नवे तंत्र शेतकºयाच्या शेतात पोहचल्यास निश्चितच शेतकरी रब्बी पिके घेऊ शकतात. मात्र, अवकाळी पावसाने यंदा शेतकºयांचे नियोजन कोलमडल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.

टॅग्स :cottonकापूस