शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 01:11 IST

गत खरिप व रबी हंगामात वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. वनविभागाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण केले.

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान : खरिप हंगाम तोंडावरब्रह्मपुरी : गत खरिप व रबी हंगामात वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. वनविभागाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण केले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही वन्यप्राण्यांकडून नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही मतद तातडीने वाटप करण्याची मागणी आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव वनपरिक्षेत्रांतर्गत आवळगाव, वांद्रा, हळदा, कोसंबी ही गावे येतात. या गावालगतच जंगल क्षेत्र आहे. त्यामुळे चितळ, हरिण, सांभर, रानडुकर या वन्यप्राण्यांचा नेहमीचा परिसरात वावर असतो. जंगलालगत शेतजमीन असल्याने वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करतात. रबी हंगाम रानडुकरांचे कळप सर्व शेतच फक्त करतात. तसेच गावात शेतातील जनावरांवर हल्ले करून ठार करतात. अशा नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. नुकसान झालेल्या शेतीचे वनकर्मचाऱ्यांची पंचनामे केले होते. पंचनामे केल्यानंतर काही दिवसात मदत मिळेल, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. मात्र चार- पाच महिने लोटूनही अद्यापही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाकडून निधी आला नसल्याची चर्चा सुरू असल्ी तरी खरिपाचा हंगाम सुरू झाला आहे. त्याच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. पैशाची आता गरज आहे. मात्र मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)