शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 01:11 IST

गत खरिप व रबी हंगामात वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. वनविभागाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण केले.

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान : खरिप हंगाम तोंडावरब्रह्मपुरी : गत खरिप व रबी हंगामात वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. वनविभागाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण केले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही वन्यप्राण्यांकडून नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही मतद तातडीने वाटप करण्याची मागणी आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव वनपरिक्षेत्रांतर्गत आवळगाव, वांद्रा, हळदा, कोसंबी ही गावे येतात. या गावालगतच जंगल क्षेत्र आहे. त्यामुळे चितळ, हरिण, सांभर, रानडुकर या वन्यप्राण्यांचा नेहमीचा परिसरात वावर असतो. जंगलालगत शेतजमीन असल्याने वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करतात. रबी हंगाम रानडुकरांचे कळप सर्व शेतच फक्त करतात. तसेच गावात शेतातील जनावरांवर हल्ले करून ठार करतात. अशा नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. नुकसान झालेल्या शेतीचे वनकर्मचाऱ्यांची पंचनामे केले होते. पंचनामे केल्यानंतर काही दिवसात मदत मिळेल, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. मात्र चार- पाच महिने लोटूनही अद्यापही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाकडून निधी आला नसल्याची चर्चा सुरू असल्ी तरी खरिपाचा हंगाम सुरू झाला आहे. त्याच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. पैशाची आता गरज आहे. मात्र मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)