शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छतेसाठी पुन्हा कसणार कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:09 IST

राज्य शासनाने प्लास्टिकबंदी घातली आहे. आता महापालिकेनेही शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासोबतच स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय कामगिरी करण्याच्या दृष्टीने कचरामुक्त शहर करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआमसभेत विविध विषयांवर चर्चा : शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा ठराव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने प्लास्टिकबंदी घातली आहे. आता महापालिकेनेही शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासोबतच स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय कामगिरी करण्याच्या दृष्टीने कचरामुक्त शहर करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. ३०) झालेल्या आमसभेत हे दोन्ही ठराव मंजूर करण्यात आले. यासोबतच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.राज्यात प्लास्टिकमुक्तीचा निर्णय घेतल्यानंतर या निणर्याची चंद्रपुरात कडक अंमलबजावणी करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. यावेळी शहरात व्यावसायिकांकडून प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याने व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाईची मोहीम राबविण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्यानंतर महापौर अंजली घोटेकर यांनी पानठेलाचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश सहायक आयुक्त, झोन अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर चंद्रपूर प्लास्टिकमुक्तीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा आणि अमृतवरून सत्ताधारी नगरसेवकासह विरोधकांनीही काही वेळासाठी गोंधळ घातला. शहरातील काही भागात अनियमित पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना आम्हाला करावा लागत असल्याचे नगरसेवकांनी आमसभेत सांगितले. अमृत योजनेच्या कामामुळे ठिकठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झाली. अनेक पाईपलाइन फुटली. मात्र, अमृतच्या कंत्राटदारांकडून या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उज्ज्वल आणि अमृत योजनेच्या कंत्राटदाराला पुढील आमसभेत बोलाविण्याची मागणी करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सहभागी शहरांना आता केंद्र सरकार ‘स्टार’ मानांकन देणार आहे. सेवन स्टारपर्यंत हे स्टार दिले जातील. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीच चंद्रपूरला सर्वाधिक स्टार मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आयुक्त संजय काकडे यांनी व्यक्त केली. यावेळी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण करण्यात आले. रामाळा तलावातील अशुद्ध पाण्याकडे लक्ष वेधले असता तलावात केवळ वेकोलिचेच पाणी येईल, अशी व्यवस्था करण्यासाठी आणि ते पाणी शुद्ध करून तलावात सोडण्यासाठी ३९ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती काकडे यांनी दिली.आमसभेला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे उपस्थित होते.