शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:26 IST

मूल तालुक्यातील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून तालुक्यातील ३१ गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या तीनही योजनेचे मुख्य केंद्र गडीसुर्ला असून तीनही योजनांना हरणघाट वैनगंगा नदीपात्रातून पाणी पुरवठा होतो.

ठळक मुद्देबॅरेजमुळे नदी आटली : ३१ गावांचा पाणी पुरवठा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून तालुक्यातील ३१ गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या तीनही योजनेचे मुख्य केंद्र गडीसुर्ला असून तीनही योजनांना हरणघाट वैनगंगा नदीपात्रातून पाणी पुरवठा होतो. या नदी किनाऱ्यावर स्वतंत्र्य पाण्याची टाकी उभारल्या जात आहेत. या माध्यमातून ३१ गावांना पाणी पुरवठा होतो. मात्र यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने वैनगंगा दुथडी भरून वाहू शकली नाही. सध्या या नदीचे पात्र कोरडे पडले आहे. परिणामी ग्रामीण पाणी पुरवठा प्रभावित होऊन जलसंकट निर्माण झाले आहे.पंधरा दिवसांपूर्वी प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने पाट काढून पाण्याचा मार्ग टाकीपर्यंत काढला. मात्र तोही आटत आल्याने पाणी समस्या उग्ररूप धारण करणार असून हजारो कुटुंबीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधीकरणतर्फे लाखो रूपये खर्च करून १९ गावांकरिता बोरचांदली, आठ गावांकरिता बेंबाळ, पाच गावांकरिता टेकाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पंधरा वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.याच नदिपात्रातून मूल शहरालाही पाणी पुरवठा होतो. या योजनांच्या माध्यमातून ३१ गावांची तहान भागत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनांना पाणी कमी पडत असून महिलांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही आहे. परिणामत: पाणी समस्या गंभीर होत असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सावली तालुक्यातील लोंढोली गावाजवळ वैनगंगा नदीवर पाच वर्षापासून लाखो रूपये खर्चुन बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यात पाणी साठवणूक सुरू आहे. त्यामुळे बॅरेजच्या खालील वैनगंगेचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे.वैनगंगेच्या नदीपात्रावर जि.प.च्या जवळपास दहा ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यांना पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन पाणी समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे.जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन खिळखिळीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावांकरिता असलेल्या योजनेची पाईप लाईन १५ वर्षे जुनी आहे. ही पाईपलाईन गंजून खिळखिळी झाली आहे. ठिकठिकाणी छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण वाढले असून हजारो लिटर पाणी बारमाही वाया जाते. ही बाब संबंधित कंत्राटदाराने प्रशासनाला वारंवार कळविली. मात्र प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.वैनगंगा नदीवर बंधाऱ्याचे काम झाल्याने नदी कोरडी होत आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील तिन्ही योजनांना पाणी कमी पडत आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असून पाणी मे महिन्यापर्यंत केबसे पुरेल, यासाठी नियोजन केले जात आहे.- कोटनाके, शाखा अभियंताग्रामीण पाणी पूरवठा, जि.प. चंद्रपूर