शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

वैनगंगा नदीचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:26 IST

मूल तालुक्यातील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून तालुक्यातील ३१ गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या तीनही योजनेचे मुख्य केंद्र गडीसुर्ला असून तीनही योजनांना हरणघाट वैनगंगा नदीपात्रातून पाणी पुरवठा होतो.

ठळक मुद्देबॅरेजमुळे नदी आटली : ३१ गावांचा पाणी पुरवठा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून तालुक्यातील ३१ गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या तीनही योजनेचे मुख्य केंद्र गडीसुर्ला असून तीनही योजनांना हरणघाट वैनगंगा नदीपात्रातून पाणी पुरवठा होतो. या नदी किनाऱ्यावर स्वतंत्र्य पाण्याची टाकी उभारल्या जात आहेत. या माध्यमातून ३१ गावांना पाणी पुरवठा होतो. मात्र यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने वैनगंगा दुथडी भरून वाहू शकली नाही. सध्या या नदीचे पात्र कोरडे पडले आहे. परिणामी ग्रामीण पाणी पुरवठा प्रभावित होऊन जलसंकट निर्माण झाले आहे.पंधरा दिवसांपूर्वी प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने पाट काढून पाण्याचा मार्ग टाकीपर्यंत काढला. मात्र तोही आटत आल्याने पाणी समस्या उग्ररूप धारण करणार असून हजारो कुटुंबीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधीकरणतर्फे लाखो रूपये खर्च करून १९ गावांकरिता बोरचांदली, आठ गावांकरिता बेंबाळ, पाच गावांकरिता टेकाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पंधरा वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.याच नदिपात्रातून मूल शहरालाही पाणी पुरवठा होतो. या योजनांच्या माध्यमातून ३१ गावांची तहान भागत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनांना पाणी कमी पडत असून महिलांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही आहे. परिणामत: पाणी समस्या गंभीर होत असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सावली तालुक्यातील लोंढोली गावाजवळ वैनगंगा नदीवर पाच वर्षापासून लाखो रूपये खर्चुन बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यात पाणी साठवणूक सुरू आहे. त्यामुळे बॅरेजच्या खालील वैनगंगेचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे.वैनगंगेच्या नदीपात्रावर जि.प.च्या जवळपास दहा ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यांना पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन पाणी समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे.जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन खिळखिळीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावांकरिता असलेल्या योजनेची पाईप लाईन १५ वर्षे जुनी आहे. ही पाईपलाईन गंजून खिळखिळी झाली आहे. ठिकठिकाणी छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण वाढले असून हजारो लिटर पाणी बारमाही वाया जाते. ही बाब संबंधित कंत्राटदाराने प्रशासनाला वारंवार कळविली. मात्र प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.वैनगंगा नदीवर बंधाऱ्याचे काम झाल्याने नदी कोरडी होत आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील तिन्ही योजनांना पाणी कमी पडत आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असून पाणी मे महिन्यापर्यंत केबसे पुरेल, यासाठी नियोजन केले जात आहे.- कोटनाके, शाखा अभियंताग्रामीण पाणी पूरवठा, जि.प. चंद्रपूर