शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

वैनगंगा नदीचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:26 IST

मूल तालुक्यातील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून तालुक्यातील ३१ गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या तीनही योजनेचे मुख्य केंद्र गडीसुर्ला असून तीनही योजनांना हरणघाट वैनगंगा नदीपात्रातून पाणी पुरवठा होतो.

ठळक मुद्देबॅरेजमुळे नदी आटली : ३१ गावांचा पाणी पुरवठा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून तालुक्यातील ३१ गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या तीनही योजनेचे मुख्य केंद्र गडीसुर्ला असून तीनही योजनांना हरणघाट वैनगंगा नदीपात्रातून पाणी पुरवठा होतो. या नदी किनाऱ्यावर स्वतंत्र्य पाण्याची टाकी उभारल्या जात आहेत. या माध्यमातून ३१ गावांना पाणी पुरवठा होतो. मात्र यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने वैनगंगा दुथडी भरून वाहू शकली नाही. सध्या या नदीचे पात्र कोरडे पडले आहे. परिणामी ग्रामीण पाणी पुरवठा प्रभावित होऊन जलसंकट निर्माण झाले आहे.पंधरा दिवसांपूर्वी प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने पाट काढून पाण्याचा मार्ग टाकीपर्यंत काढला. मात्र तोही आटत आल्याने पाणी समस्या उग्ररूप धारण करणार असून हजारो कुटुंबीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधीकरणतर्फे लाखो रूपये खर्च करून १९ गावांकरिता बोरचांदली, आठ गावांकरिता बेंबाळ, पाच गावांकरिता टेकाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पंधरा वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.याच नदिपात्रातून मूल शहरालाही पाणी पुरवठा होतो. या योजनांच्या माध्यमातून ३१ गावांची तहान भागत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनांना पाणी कमी पडत असून महिलांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही आहे. परिणामत: पाणी समस्या गंभीर होत असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सावली तालुक्यातील लोंढोली गावाजवळ वैनगंगा नदीवर पाच वर्षापासून लाखो रूपये खर्चुन बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यात पाणी साठवणूक सुरू आहे. त्यामुळे बॅरेजच्या खालील वैनगंगेचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे.वैनगंगेच्या नदीपात्रावर जि.प.च्या जवळपास दहा ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यांना पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन पाणी समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे.जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन खिळखिळीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावांकरिता असलेल्या योजनेची पाईप लाईन १५ वर्षे जुनी आहे. ही पाईपलाईन गंजून खिळखिळी झाली आहे. ठिकठिकाणी छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण वाढले असून हजारो लिटर पाणी बारमाही वाया जाते. ही बाब संबंधित कंत्राटदाराने प्रशासनाला वारंवार कळविली. मात्र प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.वैनगंगा नदीवर बंधाऱ्याचे काम झाल्याने नदी कोरडी होत आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील तिन्ही योजनांना पाणी कमी पडत आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असून पाणी मे महिन्यापर्यंत केबसे पुरेल, यासाठी नियोजन केले जात आहे.- कोटनाके, शाखा अभियंताग्रामीण पाणी पूरवठा, जि.प. चंद्रपूर