शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

विद्यार्थ्यांच्या रस्त्यावर वाघोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:13 IST

सध्या जिल्ह्यात वन्यजीव व मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. दररोज कुठे ना कुठे वाघाचे, बिबट्यांचे हल्ले होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावातील जनजीवन विस्कळीत होत आहे. अशातच आज शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावर वाघ ठाण मांडून बसला.

ठळक मुद्देरस्त्यावरच ठाण : नागरिकांनी पिटाळून लावल्यानंतर रस्ता झाला मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : सध्या जिल्ह्यात वन्यजीव व मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. दररोज कुठे ना कुठे वाघाचे, बिबट्यांचे हल्ले होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावातील जनजीवन विस्कळीत होत आहे. अशातच आज शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावर वाघ ठाण मांडून बसला. यामुळे विद्यार्थ्यांची पाचावर धारणच बसली. मात्र काही वेळानंतर तिथे काही नागरिक जमा झाले. त्यांनी वाघाला पिटाळून लावले. त्यानंतर विद्यार्थी व नागरिक त्या रस्त्याने पुढे जाऊ शकले.सावली वनपरिक्षेत्रात वाघ आणि बिबटासह हिंस्र पशुंचा वावर आहे. आता हे प्राणी मानवीे वस्त्यांकडे येऊ लागले आहेत. गेवरा- मेहा बिटातील बारसागड, निफंद्रा, डोंगरगाव, गेवरा बुज, करोटी, आकापूर, खानाबाद या गावातील शेतकरी, नागरिकांना सध्या गाव शिवारातून पट्टेदार वाघीण फिरताना दिसून येत आहे. कराली जंगलात गेवरा येथील एका शेतकऱ्यांच्या बैलबंडीवर वाघाने हल्ला चढविला.मात्र अन्य शेतकºयांच्या प्रसंगवधनाने बैलासह शेतकरी बचावला. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावरुन वाघ ठाण मांडून बसला होता. त्यामुळे विद्यार्थी तिथेच थांबले. त्यानंतर ते घाबरुन माघारी वळले. काही वेळाने नागरिकही तिथे आले. सर्वांनी मिळून वाघाला रस्त्यावरून पिटाळून लावले.मागील आठवड्यापासून बारसागड, गेवरा बुज, निफंद्रा परिसरात पट्टेदार वाघ व दुसरीकडे दोन पिलांसह वाघीण गावशिवारातून फिरत असल्याने शेतकºयात दहशत आहे. शेतीची कामे सायंकाळच्या आत आटोपून घरी परतत आहेत. रस्त्यावर वाघ दिसल्याची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली. वनकर्मचारी परिसरात लक्ष ठेवून आहे.दोन बछड्यासह फिरत आहे वाघीणबारसागड परिसरात दोन बछड्यासह वाघीण फिरत आहे. वाघीण सध्या बछड्यांना सोडण्याच्या परिस्थितीत असल्याने तिचा वावर झुडपी जंगल परिसरात वाढला आहे. वाघांच्या प्रत्येक हालचालीवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. अनुचित प्रकार घडू नये, याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे यांनी लोकमतशी बोलताना केले.वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठारचिंधिचक (बुज.): नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे गावात वाघाची दहशत सुरु असून गुरुवार सकाळी वाघाने श्यामराव कोरेवार यांच्या मालकीच्या दोन शेळ्या ठार केल्या. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पुन्हा वाघाने शेळ्यावर हल्ला केला. परंतु दिवसाची वेळ असल्यामुळे नागरिक धावले व वाघ झुडपी जंगलात पसार झाला.