शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या रस्त्यावर वाघोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:13 IST

सध्या जिल्ह्यात वन्यजीव व मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. दररोज कुठे ना कुठे वाघाचे, बिबट्यांचे हल्ले होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावातील जनजीवन विस्कळीत होत आहे. अशातच आज शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावर वाघ ठाण मांडून बसला.

ठळक मुद्देरस्त्यावरच ठाण : नागरिकांनी पिटाळून लावल्यानंतर रस्ता झाला मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : सध्या जिल्ह्यात वन्यजीव व मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. दररोज कुठे ना कुठे वाघाचे, बिबट्यांचे हल्ले होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावातील जनजीवन विस्कळीत होत आहे. अशातच आज शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावर वाघ ठाण मांडून बसला. यामुळे विद्यार्थ्यांची पाचावर धारणच बसली. मात्र काही वेळानंतर तिथे काही नागरिक जमा झाले. त्यांनी वाघाला पिटाळून लावले. त्यानंतर विद्यार्थी व नागरिक त्या रस्त्याने पुढे जाऊ शकले.सावली वनपरिक्षेत्रात वाघ आणि बिबटासह हिंस्र पशुंचा वावर आहे. आता हे प्राणी मानवीे वस्त्यांकडे येऊ लागले आहेत. गेवरा- मेहा बिटातील बारसागड, निफंद्रा, डोंगरगाव, गेवरा बुज, करोटी, आकापूर, खानाबाद या गावातील शेतकरी, नागरिकांना सध्या गाव शिवारातून पट्टेदार वाघीण फिरताना दिसून येत आहे. कराली जंगलात गेवरा येथील एका शेतकऱ्यांच्या बैलबंडीवर वाघाने हल्ला चढविला.मात्र अन्य शेतकºयांच्या प्रसंगवधनाने बैलासह शेतकरी बचावला. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावरुन वाघ ठाण मांडून बसला होता. त्यामुळे विद्यार्थी तिथेच थांबले. त्यानंतर ते घाबरुन माघारी वळले. काही वेळाने नागरिकही तिथे आले. सर्वांनी मिळून वाघाला रस्त्यावरून पिटाळून लावले.मागील आठवड्यापासून बारसागड, गेवरा बुज, निफंद्रा परिसरात पट्टेदार वाघ व दुसरीकडे दोन पिलांसह वाघीण गावशिवारातून फिरत असल्याने शेतकºयात दहशत आहे. शेतीची कामे सायंकाळच्या आत आटोपून घरी परतत आहेत. रस्त्यावर वाघ दिसल्याची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली. वनकर्मचारी परिसरात लक्ष ठेवून आहे.दोन बछड्यासह फिरत आहे वाघीणबारसागड परिसरात दोन बछड्यासह वाघीण फिरत आहे. वाघीण सध्या बछड्यांना सोडण्याच्या परिस्थितीत असल्याने तिचा वावर झुडपी जंगल परिसरात वाढला आहे. वाघांच्या प्रत्येक हालचालीवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. अनुचित प्रकार घडू नये, याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे यांनी लोकमतशी बोलताना केले.वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठारचिंधिचक (बुज.): नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे गावात वाघाची दहशत सुरु असून गुरुवार सकाळी वाघाने श्यामराव कोरेवार यांच्या मालकीच्या दोन शेळ्या ठार केल्या. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पुन्हा वाघाने शेळ्यावर हल्ला केला. परंतु दिवसाची वेळ असल्यामुळे नागरिक धावले व वाघ झुडपी जंगलात पसार झाला.