शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

५१५९ ग्रामपंचायत सदस्यांसाठी होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:26 IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. ...

चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. ५ हजार १५९ ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यावर्षी १५ हजारावर नवमतदार तरुण आपला मतदानाचा हक्क पहिल्यांदाज बजावणार आहे.जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील ८५, वरोरा ७७, ब्रह्मपुरीतील ७० ग्रामपंचायतीसह अन्य तालुक्यातही निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, जिवती तालुक्यात केवळ एका ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात विसापूर, माजरी, घुग्घुस या मोठ्या ग्रामपंचायतीचीही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे गावागावात सध्या राजकीय वातावरण तापायला लागले असून अनेकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केली आहे. तर काही इच्छुकांनी शहरातील नेत्यांसोबतच गाठीभेटी वाढविल्या आहे. ग्रामपंचायत निवडणून पॅनलद्वारे लढविली जात असली तरी अधिकाधिक उमेदवार आपल्याच पक्षाचे निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरु केली असून कर्मचाऱ्यांचे विविध प्रशिक्षणही पार पडले आहे.

ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान -६२९

एकूण सदस्य -५१५९

एकूण प्रभाग -१९८१

मतदान केंद्र- २१४५

---

१५ जानेवारी रोजी २ हजार १४५ मतदान केंद्रावरून निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनानेही तयारी केली आहे. अनुचित प्रकार घडू नयम्म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांची मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

अर्ज दाखल करण्यापूर्वी हे करा

उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापूर्वी ग्रामपंचातीचा कर भरणे गरजेचे आहे. शौचालय असल्याचे प्रमाणपत्र असले पाहिजे, दोनपेक्षा जास्त अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता प्रमआमपत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्ज भरताना असणे बंधनकारक आहे.

२)उमेदवारी अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी तो ऑनलाईन पद्धतीने भरून त्याचे प्रिंट घेऊन संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. सोबतच प्रतिज्ञापत्र ऑनलाईन भरून त्याची प्रिंट आवश्यक कार्यवाही करून अधिकाऱ्यांना सादर करावा लागेल. जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावती असली तरीही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार येणार. वयाचा पुरावाही अर्जासोबत जोडावा लागणार आहे.