शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ग्रामपंचायतींसाठी शातंतेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:31 IST

जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २३ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले.

ठळक मुद्देआज निकाल : उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २३ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले. सर्व उमेदवारांचे भाग्य मशिन बंद झाले असून बुधवारी निकाल घोषित होणार आहे.बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे, लावारी व मानोरा येथील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले. लावारी येथे ८१.९७, नांदगाव पोडे येथे ७२.१० तर मानोरा येथे ७८.४३ टक्के मतदान झाले. वरोरा तालुक्यातील सोईट, भटाळा, वनोजा येथे पोटनिवडणूक तर येन्सा व अर्जुनी येथे सार्वत्रिक निवडणुकीसाठी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान झाले.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील वॉर्ड नं. २ साठी पोटनिवडणूक झाली. येथे ८७.७७ टक्के मतदान झाले तर सास्ती येथील ११ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. येथे ३८ उमेदवार सदस्यपदासाठी तर सात उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात होते. रात्री उशीरापर्यंत मतदान चालले. त्यामुळे येथील मतदानाची टक्केवारी मिळू शकली नाही. तर चुनाळा येथील पोटनिवडणुकीसाठी ८५.८६ टक्के, पाचगाव येथे ८० टक्के तर डोंगरगाव येथे ७८ टक्के मतदान झाले.चिमूर तालुक्यातील भिसी येथील वॉर्ड नं. २ मधील एका जागेसाठी ७२.३३ टक्के तर कोरपना तालुक्यातील नारंडा येथील पोटनिवडणुकीसाठी ७९.७२ व शेरज (बु) येथे ६७.९८ टक्के मतदान झाले. जिवती तालुक्यातील शेडवाही ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८४.८० टक्के मतदान झाले. मूल तालुक्यातील चिरोलीच्या वॉर्ड नं. २ च्या पोटनिवडणुकीत ७२.३३ टक्के मतदान झाले. निवडणुकी दरम्यान मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बुधवारी मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची धडधड वाढली आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात एकही नामांकन नाहीब्रह्मपुरी : तालुक्यातील मरारमेंढा, किटाळी, बरडकिन्ही व चौगान या चार ग्रामपंचायतीमध्ये सहा जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र चारही ग्रामपंचायतीमधून एकही नामनिर्देशन पत्र न आल्याने येथे मतदान घेण्यात आले नाही.