शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

स्वयंसेवकांनी रचनात्मक कार्यासाठी पुढे यावे

By admin | Updated: September 26, 2016 01:13 IST

समाजसेवा हे सर्वात मोठे राष्ट्रभक्ती व देशसेवेचे कार्य आहे. समाजातील दीनदुबळे व पीडित लोकांकरिता रासेयोच्या स्वयंसेवकांनी

एन.एस. कोकोडे : राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिनब्रह्मपुरी : समाजसेवा हे सर्वात मोठे राष्ट्रभक्ती व देशसेवेचे कार्य आहे. समाजातील दीनदुबळे व पीडित लोकांकरिता रासेयोच्या स्वयंसेवकांनी समस्या समजून घेऊन त्यांच्या जीवनामध्ये नवसंजिवनी प्राप्त करून देण्याचे कार्य करावे. तसेच समाजातील राष्ट्रीय एकात्मता व समानता निर्माण करण्याकरीता साक्षर-निरक्षर यातील दरी कमी करावी. त्याकरिता रासेयोच्या स्वयंसेवकानी रचनात्मक व विधायक कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. एन.एस. कोकोडे यांनी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षीय मार्गदर्शनातून केले.हा कार्यक्रम संस्थेचे सचिव अशोक भैया यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. ए. पारधी यांनी आपल्या अनुभवातून ने. हि. महाविद्यालयातील माजी स्वयंसेवकांचे योगदान कसे होते, याबाबत स्वयंसेवकांना अनेक उदाहरणे व स्वत:चे अनुभव रासेयोच्या स्वयंसेवकांसमोर व्यक्त केले. शांताबाई महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. भास्कर लेनगुरे यांनी रासेयोचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगून उदाहरणे सादर केली. रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रकाश वट्टी यांनी पाहुण्याचा परिचय व प्रास्ताविक केले. संचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. मिलिंद पठाडे यांनी केले.आभार शांताबाई भैया महाविद्यालयाच्या रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. सोनाली पारधी यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ. रेखा मेश्राम, डॉ. मोहन कापगते, डॉ. असलम शेख, प्रा. आदे, डॉ. विवेक नागभीडकर, प्रा. आकाश मेश्राम, प्रा. खाजगीवाले, प्रा. वानखडे आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज चन्ने, प्रशांत राऊत, प्रशांत मस्के, वैभव मानगुडे, उत्पल नागदेवते, खानोरकर या स्वयंसेवकांनी व महाविद्यालयातील शेंडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)