शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

श्रमदानातून चेहरा बदललेल्या कोटगावला सीओंची भेट

By admin | Updated: April 25, 2015 01:32 IST

नागभीड तालुक्यातील कोटगाव येथील गावकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलवून टाकला व प्रशासनाचे लक्ष वेधले.

चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील कोटगाव येथील गावकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलवून टाकला व प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी कोटगावला प्रत्यक्ष भेट देऊन गावकऱ्यांची प्रशंसा केली.तहसीलदार श्रीराम मुंधडा, संवर्ग विकास अधिकारी बीरमवार, कृषी अधिकारी पठाण, माजी जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, माजी जि.प. सदस्य विलास दोनोड, सभापती रेखा जगनाडे, सरपंच अरुण काटेखाये व तालुक्यातील प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्या सर्वांनी गावाची पहाणी करुन एकूण स्थितीचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले. स्व. केशवराव भेंडारकरांनी १५ वर्षांपर्यंत कोटगावचे सरपंचपद सांभाळले आणि १९५६ ला आदर्श गाव म्हणून तत्कालीन शासनाने या गावाला गौरविले होते. नव्हे, विशेष बक्षिस देऊन गावात विविध सोयी- सुविधा प्राप्त करुन दिल्या होत्या. १२ जानेवारीला संपूर्ण गावकऱ्यांनी खराटा हाती घेऊन गाव स्वच्छ केले. गावातील नाल्या उपसून त्यामधून ५० ट्रॅक्टर अस्वच्छ माती बाहेर काढून योग्य विल्हेवाट लावली. गावातील मुख्य रस्यावर मुरुम पसरवून रस्ते निटनेटके व योग्य केले. गावातील अतिक्रमणे हटविली, घनकचऱ्यांचे योग्य व्यवस्थापन केले. शौचालयाचा वापर करण्याचा निर्धार करण्यात आला.गाव व्यसनमुक्त करण्याचा सर्वांनी निर्धार केला. सेंद्रीय खतांचा वापर करुन शेती पिकविण्याचे निश्चित करण्यात आले. हे सर्व कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने गावात मोहल्ला समित्याची स्थापना करण्यात आली. त्यामुळे गावात आज सर्वत्र शांतता व स्वच्छता दृष्टीस पडते. गावाचा चेहरा -मोहरा बदलल्याचे दिसून येते.जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी कोटगावला भेट देऊन गावाची पाहणी केली आणि गावाला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निश्चित केले. यावरुन ‘गाव करी ते राव न करी’ याचा प्रत्यय कोटगावच्या उदाहरणावरुन होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)