शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

श्रमदानातून चेहरा बदललेल्या कोटगावला सीओंची भेट

By admin | Updated: April 25, 2015 01:32 IST

नागभीड तालुक्यातील कोटगाव येथील गावकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलवून टाकला व प्रशासनाचे लक्ष वेधले.

चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील कोटगाव येथील गावकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलवून टाकला व प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी कोटगावला प्रत्यक्ष भेट देऊन गावकऱ्यांची प्रशंसा केली.तहसीलदार श्रीराम मुंधडा, संवर्ग विकास अधिकारी बीरमवार, कृषी अधिकारी पठाण, माजी जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, माजी जि.प. सदस्य विलास दोनोड, सभापती रेखा जगनाडे, सरपंच अरुण काटेखाये व तालुक्यातील प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्या सर्वांनी गावाची पहाणी करुन एकूण स्थितीचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले. स्व. केशवराव भेंडारकरांनी १५ वर्षांपर्यंत कोटगावचे सरपंचपद सांभाळले आणि १९५६ ला आदर्श गाव म्हणून तत्कालीन शासनाने या गावाला गौरविले होते. नव्हे, विशेष बक्षिस देऊन गावात विविध सोयी- सुविधा प्राप्त करुन दिल्या होत्या. १२ जानेवारीला संपूर्ण गावकऱ्यांनी खराटा हाती घेऊन गाव स्वच्छ केले. गावातील नाल्या उपसून त्यामधून ५० ट्रॅक्टर अस्वच्छ माती बाहेर काढून योग्य विल्हेवाट लावली. गावातील मुख्य रस्यावर मुरुम पसरवून रस्ते निटनेटके व योग्य केले. गावातील अतिक्रमणे हटविली, घनकचऱ्यांचे योग्य व्यवस्थापन केले. शौचालयाचा वापर करण्याचा निर्धार करण्यात आला.गाव व्यसनमुक्त करण्याचा सर्वांनी निर्धार केला. सेंद्रीय खतांचा वापर करुन शेती पिकविण्याचे निश्चित करण्यात आले. हे सर्व कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने गावात मोहल्ला समित्याची स्थापना करण्यात आली. त्यामुळे गावात आज सर्वत्र शांतता व स्वच्छता दृष्टीस पडते. गावाचा चेहरा -मोहरा बदलल्याचे दिसून येते.जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी कोटगावला भेट देऊन गावाची पाहणी केली आणि गावाला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निश्चित केले. यावरुन ‘गाव करी ते राव न करी’ याचा प्रत्यय कोटगावच्या उदाहरणावरुन होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)