शहरं
Join us  
Trending Stories
1
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
2
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
3
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
4
तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही
5
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
6
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य
7
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार
8
पांड्याचं सेलिब्रेशन झालं! हेडनं मान खाली घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरलेला अन् 'सायरन' वाजला
9
वेलांटी, मात्रा चुकल्याने बोगसपणा उघड; शिक्षण घोटाळ्यात बोगस कागदपत्रे बनविणारा अखेर सापडला
10
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात
11
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
12
…तर ते कागद दाखवावे लागतील?, नव्या ‘वक्फ’ कायद्यावरील सुनावणीत ती मेख, केंद्र होणार खूश   
13
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
14
आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...
15
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
16
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
17
बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण
18
आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
19
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
20
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा

कोळसा वाहतुकीसाठी आता विसापूर जंक्शन ; रेल्वे मार्ग प्रस्तावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:41 IST

बाबूपेठ ते सास्तीदरम्यान रेल्वे मार्ग प्रस्तावित : १६ हेक्टर शेती संपादित करणार

सुभाष भटवलकर लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातून तीन रेल्वे मार्ग गेले. चौथ्याचे सध्या काम सुरू आहे. आता नव्याने बाबूपेठ ते सास्ती हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला. या मार्गामुळे विसापूरला कोळसा वाहतुकीसाठी जंक्शनचे स्वरूप येणार आहे. यासाठी १६ हेक्टर शेती संपादीत केली जाईल. मात्र प्रस्तावामुळे केवळ शेतीवरच उदरनिर्वाह करणारे शेतकरी पुढे जगाचे कसे, या प्रश्नाने धास्तावले आहेत.

रेल्वे विभागाने रेल्वे सुधारित अधिनियम १९८९ आणि भूसंपादन रेल्वे (सुधारणा) कायदा, २००८ कलम २० (अ) अन्वये नवीन बाबूपेठ ते सास्ती दरम्यान रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे. प्रस्तावित मार्गासाठी विसापूर हद्दीतील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाईल. भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/२०२४-२५ नुसार ७० च्या आसपास शेतीच्या खातेदारांची जमीन संपादनाच्या हालचाली सुरू आहेत. रेल्वे मार्गात पिढीजात शेती गेल्यावर थोडा मोबदला मिळेल. मात्र, आधीच नोकरी संपल्या. पेपरमीलपासून गावाला रोजगार मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या पिढ्या कसे जगणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. यापूर्वी औष्णिक विद्युत केंद्र, प्लायवुड कंपनी, चुनाभट्टी आदी उद्योग होते. ते देखील काळाच्या ओघात गायब झाले.

गृहकलह वाढणार आणि गावाची नाकाबंदीहीविसापुरात एका शेत सर्वे क्रमांकावर अनेक भूधारकांची नावे आहेत. यामुळे भूसंपादनाच्या मोबदल्यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता अधिक आहे. यातून गृहकलह वाढण्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे. विसापूर गावाच्या मध्यभागातून आधीच तीन रेल्वे मार्ग गेले आहेत. या मार्गामुळे अपघातांच्या घटना वाढल्या. पुन्हा पाच मार्ग झाल्यास गावाची नाकाबंदी होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

जनसुनावणीच्या तारखेकडे लक्षकेंद्र सरकारने विसापूर शिवारात सनफ्लग कंपनीची भूमिगत कोळसा खाण मंजूर केले होते. यासंदर्भात कंपनी व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाने जनसुनावणीही घेतली. कंपनी सोबत महाराष्ट्र सरकारने उद्योग समूहासोबत ३०० कोटी खर्चाचा करारदेखील केला होता. त्यावेळी येथील शेतकऱ्यांनी जनसुनावणीत प्रचंड विरोध केला होता. आता रेल्वे विभागाने शेतकऱ्यांची शेती संपादन करून नवीन बाबूपेठ ते सास्ती दरम्यान रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला. यावर शेतकऱ्यांची काय भूमिका असणार, याकडे लक्ष लागले आहे.

७० शेतकरी प्रस्तावित रेल्वे मार्गाने प्रकल्पग्रस्त होऊ शकतात विसापुरात बेरोजगारी वाढली. शेतीपासूनच रोजगार मिळत आहे. नव्याने होऊ घातलेल्या रेल्वे मार्गात शेती गेली तर विस्थापित होण्याची वेळ येऊ शकते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर