शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विद्युत पोलच्या तारांपर्यंत पोहोचल्या वेली व झाडांच्या फांद्या

By admin | Updated: November 19, 2014 22:35 IST

शहरातील नागरिकांच्या घराघरात विद्युत पोहचविण्याचे काम ज्या महावितरण कंपनीकडे आहे. त्याच कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे विद्युत सेवा देणाऱ्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाही जीवंत

आयुध निर्माणी : शहरातील नागरिकांच्या घराघरात विद्युत पोहचविण्याचे काम ज्या महावितरण कंपनीकडे आहे. त्याच कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे विद्युत सेवा देणाऱ्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाही जीवंत तारापर्यंत वेली व झाडांच्या फांद्या पोहचल्या आहेत. त्यामुळे शहरातील जागोजागी उभे असलेले महावितरणचे विद्युत खांब अपघाताला कारण ठरू शकते. महावितरणने विद्युत खांबांवरील विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या झाडे व वेली यांची छाटणी करून भावी अपघात टाळावेत, अशी मागणी होत आहे.विद्युत ग्राहकांना सुनियोजीत व सुव्यवस्थीत वीज पुरवठा व्हावा, याकरिता महावितरण कंपनीतर्फे जागोजागी विजेचे खांब उभे केलेले आहे. पावसाळ्यात या खांबाभोवती कचरा व वेली तथा झाडे वाढतात. त्यांची मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाढ झाल्याने अनेकदा ती जिवंत विद्युत तारांपर्यंत वाढतात.अशा वेली व फांद्याची व्यवस्थित कटींग करणे व नागरिक तथा वीज ग्राहकांच्या जिवितांचे रक्षण करणे हे महावितरण विभागाचेच कर्तव्य आहे. कारण विद्युत प्रवाही तारांपर्यंत झाडांच्या फांद्या व वेली पोहचल्यावर त्यावरून विद्युत प्रवाह जमिनीपर्यंत पोहचू शकतो. अनेकदा अशा घटना घडल्याचे चर्चेत आहे.ज्या वीज खांबापर्यंत अशा वेली पोहचलेल्या आहेत, त्याची तातडीने पाहणी करणे गरजेचे आहे. महावितरण कंपनीने अशा विद्युत खांबासभोवतीचे व तारांना स्पर्श करणारी झाडे व वेली छाटावीत. शहरात अनेक ठिकाणी असे चित्र दिसत असले तरी महावितरण विभाग, ही बाब गंभीरतेने घेत नाही. कधी झाडांनी वेढलेल्या पोलवरून विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास नागरिकांना सेवा द्यायला कमीत कमी तीन-चार दिवस लागू शकतात. नागरिकांची होणारी गैरसोय व जिवीत हानी टाळण्याकरिता याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.याबाबत महावितरणचे शहर अभियंता बहादुरे यांना विचारले असता सध्या लेबरची समस्या असल्याने हे काम प्रलंबित असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)