शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

विद्युत पोलच्या तारांपर्यंत पोहोचल्या वेली व झाडांच्या फांद्या

By admin | Updated: November 19, 2014 22:35 IST

शहरातील नागरिकांच्या घराघरात विद्युत पोहचविण्याचे काम ज्या महावितरण कंपनीकडे आहे. त्याच कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे विद्युत सेवा देणाऱ्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाही जीवंत

आयुध निर्माणी : शहरातील नागरिकांच्या घराघरात विद्युत पोहचविण्याचे काम ज्या महावितरण कंपनीकडे आहे. त्याच कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे विद्युत सेवा देणाऱ्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाही जीवंत तारापर्यंत वेली व झाडांच्या फांद्या पोहचल्या आहेत. त्यामुळे शहरातील जागोजागी उभे असलेले महावितरणचे विद्युत खांब अपघाताला कारण ठरू शकते. महावितरणने विद्युत खांबांवरील विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या झाडे व वेली यांची छाटणी करून भावी अपघात टाळावेत, अशी मागणी होत आहे.विद्युत ग्राहकांना सुनियोजीत व सुव्यवस्थीत वीज पुरवठा व्हावा, याकरिता महावितरण कंपनीतर्फे जागोजागी विजेचे खांब उभे केलेले आहे. पावसाळ्यात या खांबाभोवती कचरा व वेली तथा झाडे वाढतात. त्यांची मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाढ झाल्याने अनेकदा ती जिवंत विद्युत तारांपर्यंत वाढतात.अशा वेली व फांद्याची व्यवस्थित कटींग करणे व नागरिक तथा वीज ग्राहकांच्या जिवितांचे रक्षण करणे हे महावितरण विभागाचेच कर्तव्य आहे. कारण विद्युत प्रवाही तारांपर्यंत झाडांच्या फांद्या व वेली पोहचल्यावर त्यावरून विद्युत प्रवाह जमिनीपर्यंत पोहचू शकतो. अनेकदा अशा घटना घडल्याचे चर्चेत आहे.ज्या वीज खांबापर्यंत अशा वेली पोहचलेल्या आहेत, त्याची तातडीने पाहणी करणे गरजेचे आहे. महावितरण कंपनीने अशा विद्युत खांबासभोवतीचे व तारांना स्पर्श करणारी झाडे व वेली छाटावीत. शहरात अनेक ठिकाणी असे चित्र दिसत असले तरी महावितरण विभाग, ही बाब गंभीरतेने घेत नाही. कधी झाडांनी वेढलेल्या पोलवरून विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास नागरिकांना सेवा द्यायला कमीत कमी तीन-चार दिवस लागू शकतात. नागरिकांची होणारी गैरसोय व जिवीत हानी टाळण्याकरिता याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.याबाबत महावितरणचे शहर अभियंता बहादुरे यांना विचारले असता सध्या लेबरची समस्या असल्याने हे काम प्रलंबित असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)