शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

पहाडावरील गावे ओस पडू लागली

By admin | Updated: May 20, 2014 23:34 IST

निसर्गाचे दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव, यामुळे स्वातंत्र्याच्या अर्ध शतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सततच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांची पिके हातून गेली.

कामाच्या शोधात स्थलांतर : रोजगार हमी योजनेची कामे बंद

शंकर चव्हाण - जिवती

निसर्गाचे दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव, यामुळे स्वातंत्र्याच्या अर्ध शतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सततच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांची पिके हातून गेली. त्यातच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. अशातच पहाडावरील अनेक गावांमधील मजूर भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात स्थलांतरित होत आहेत, तर काही तरूण कामगार कंत्राटदाराच्या हाताखाली काम करण्यासाठी शहराकडे धाव घेत असल्याने पहाडावरील अनेक गाव आता ओस पडू लागली आहेत. माणिकगड पहाडावरील नागरिकांचे स्थलांतर हा दरवर्षीचाच गंभीर प्रश्न आहे. दिवाळीनंतर काही मजूर मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक आदी जिल्ह्यांत ऊसतोड कामगार म्हणून, तर यवतमाळ, व आंध्रातील आदिलाबाद जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी स्थलांतरित होतात. अशावेळी त्यांच्या शिकत असलेल्या मुलांनाही सोबत घेऊन जावे लागते. परिणामी मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. जिवती तालुक्यात सिंचनाची सोय केल्यास येथील शेतकर्‍यांचे भवितव्य निश्चितच बदलू शकते. मात्र बारमाही वाहणार्‍या नद्यांच्या पाण्याचे व्यवस्थित नियोजनच केले जात नाही. पुराचे पाणी वाहून जाते. नद्या कोरड्या पडतात. लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत बांधलेला तलाव अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे आठ दिवसांतच कोरडा पडला. तलावातील पाण्याच्या भरवशावर केलेला रबी हंगाम पाण्याअभावी करपून गेला. मात्र प्रशासकीय अधिकार्‍यांना जाग आली नाही. पहाडावरील अनेक गावांत फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. रोजगार हमी योजनेची कामेही अद्याप तालुक्यात सुरू झाली नाही. त्यामुळे हाताला काम नाही. त्यामुळे गावातील मजुरांना कामाच्या शोधात स्थलांतरित व्हावे लागत आहे. पाणी टंचाईमुळे गुराढोरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पशुपालकांना आपली जनावरे कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत. निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकर्‍याला केवळ एका पिकावर अवलंबून राहावे लागते. त्यातच या परिसरात अद्याप रोजगार हमी योजनेची कामे सुरू न झाल्याने निराश झालेले मजूर कामाच्या शोधात अन्य जिल्ह्यांत स्थलांतरित होत आहेत.