शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील गावे ओस पडू लागली

By admin | Updated: May 20, 2014 23:34 IST

निसर्गाचे दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव, यामुळे स्वातंत्र्याच्या अर्ध शतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सततच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांची पिके हातून गेली.

कामाच्या शोधात स्थलांतर : रोजगार हमी योजनेची कामे बंद

शंकर चव्हाण - जिवती

निसर्गाचे दृष्टचक्र आणि शासनाचा नियोजनाचा अभाव, यामुळे स्वातंत्र्याच्या अर्ध शतकानंतरही पहाडावरील नागरिकांच्या भाकरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सततच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांची पिके हातून गेली. त्यातच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. अशातच पहाडावरील अनेक गावांमधील मजूर भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात स्थलांतरित होत आहेत, तर काही तरूण कामगार कंत्राटदाराच्या हाताखाली काम करण्यासाठी शहराकडे धाव घेत असल्याने पहाडावरील अनेक गाव आता ओस पडू लागली आहेत. माणिकगड पहाडावरील नागरिकांचे स्थलांतर हा दरवर्षीचाच गंभीर प्रश्न आहे. दिवाळीनंतर काही मजूर मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक आदी जिल्ह्यांत ऊसतोड कामगार म्हणून, तर यवतमाळ, व आंध्रातील आदिलाबाद जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी स्थलांतरित होतात. अशावेळी त्यांच्या शिकत असलेल्या मुलांनाही सोबत घेऊन जावे लागते. परिणामी मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. जिवती तालुक्यात सिंचनाची सोय केल्यास येथील शेतकर्‍यांचे भवितव्य निश्चितच बदलू शकते. मात्र बारमाही वाहणार्‍या नद्यांच्या पाण्याचे व्यवस्थित नियोजनच केले जात नाही. पुराचे पाणी वाहून जाते. नद्या कोरड्या पडतात. लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत बांधलेला तलाव अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे आठ दिवसांतच कोरडा पडला. तलावातील पाण्याच्या भरवशावर केलेला रबी हंगाम पाण्याअभावी करपून गेला. मात्र प्रशासकीय अधिकार्‍यांना जाग आली नाही. पहाडावरील अनेक गावांत फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. रोजगार हमी योजनेची कामेही अद्याप तालुक्यात सुरू झाली नाही. त्यामुळे हाताला काम नाही. त्यामुळे गावातील मजुरांना कामाच्या शोधात स्थलांतरित व्हावे लागत आहे. पाणी टंचाईमुळे गुराढोरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पशुपालकांना आपली जनावरे कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत. निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकर्‍याला केवळ एका पिकावर अवलंबून राहावे लागते. त्यातच या परिसरात अद्याप रोजगार हमी योजनेची कामे सुरू न झाल्याने निराश झालेले मजूर कामाच्या शोधात अन्य जिल्ह्यांत स्थलांतरित होत आहेत.