शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पहाडावरील गावांना घागरभर पाणी मिळेना !

By admin | Updated: May 27, 2016 01:06 IST

दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असून पाण्याची मागणीही वाढताना दिसत आहे. उन्हाळ्याचे अजूनही काहीदिवस शिल्लक आहेत.

वर्षानुवर्षे पाण्यासाठी भटकंती: दूषित पाण्यावर भागवितात तहानंशंकर चव्हाण जिवतीदिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असून पाण्याची मागणीही वाढताना दिसत आहे. उन्हाळ्याचे अजूनही काहीदिवस शिल्लक आहेत. सुर्याचा पारा आणखी किती दिवस तिव्र राहणार, याची नागरिकांना चिंता असतानाच पाणी टंचाईनेही तोंडचे पाणी पळविले आहे. पहाडावरील गावांना घागरभर पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. नाईलाजाने दूषित पाणी पिऊन तहान भागवित आहेत. मात्र प्रशासन सर्व आलबेल असल्याचे सांगत हातावर हात ठेवून गप्प आहे. उल्लेखनीय असे की जिवती तालुक्यातील गावे टंचाईमुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केल्याची बतावणी करीत असले तरी पाणी टंचाईची झळ मात्र पहाडावर जीवघेणी ठरत आहे. तालुक्यातील घनपठार, जनकापूर, पाटागुडा, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, गढपांढरवणी, खडकी, हिरापूर, पोचगुडा, नगराळा, लेंडीगुडा, जानकपठार, लोलडोह, टाटाकोहाड, भुरी येसापूर, गोंदापूर, भोस्कापूर, संगणापूर, आनंदगुडा, चिलाटीगुडा, चलपतगुडा, गोंडगुडा (मरकागोंदी), घाटराईगुडा, पाळडोह, चिखली, घोडणकप्पी, सेवादासनगर, हिमायतनगर, परमडोली, मुकादमगुडा, देशमुखगुडा, धाबा, राहपल्ली अशा अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. काही आदिवासी गुडे नाल्यात डबके खोदून दूषित पाण्यावर आपली तहान भागवित आहे. गावात असलेल्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंतच पुरले. त्यानंतर टँकरने पाणी पुरवठा केल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे पहाडावरील बहुतांश टंचाईग्रस्त गावात टँकर पोहचले नाही. त्यामुळे पहाडावरील नागरिकांना घागरभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पाण्याचे महत्त्व एवढे वाढले आहे की लहान -मुलांनाही पाणी आणण्यासाठी भरउन्हात पाठविले जात आहे. अनेक गावात महिलांच्या डोक्यावर पाण्याची घागर घेऊन दोन ते तीन मैल अंतरावर भटकंती करावी लागत आहे.लग्नकार्यात येतात विघ्नअनेक तरुणांनी आपल्या जन्माचा साथीदार निवडला आहेत. काही जण तयारीत आहे. मात्र पाणी टंचाईमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लग्नकार्यात येणाऱ्या वऱ्हाड्यांना पाणी पाजायचे कुठून, असा प्रश्न निर्माण होत आहे. काही प्रतिष्ठीत व्यक्ती टँकरने पाणी विकत घेत वऱ्हाड्यांची सोय करताना दिसत आहे. गरीब कुटुंबावर मात्र अनेक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे होतात आजारगावात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. पण नियमित ब्लिचींग पावडर टाकत नाही. पाणी उपसा करीत नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. ब्लिचींग पावडर टाकले तरी ते प्रमाणानुसार टाकले जात नाही. त्यामुळेसुद्धा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.खड्डे खोदून कोलाम भागवितात तहानप्रत्येक नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पिण्यास मिळावे, यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयोग राबविले जाते. पिण्याच्या पाण्यासाठी पाण्यासारखा खर्चही केला जातो. तरी पण पहाडावरील खडकी, मच्छीगुडा, चलपतगुडा, अशा अनेक गुड्यांतील नागरिक अजूनही खड्डे खोदून दूषित पाण्यावरच तहान भागवत आहे.