शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील गावांना घागरभर पाणी मिळेना !

By admin | Updated: May 27, 2016 01:06 IST

दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असून पाण्याची मागणीही वाढताना दिसत आहे. उन्हाळ्याचे अजूनही काहीदिवस शिल्लक आहेत.

वर्षानुवर्षे पाण्यासाठी भटकंती: दूषित पाण्यावर भागवितात तहानंशंकर चव्हाण जिवतीदिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असून पाण्याची मागणीही वाढताना दिसत आहे. उन्हाळ्याचे अजूनही काहीदिवस शिल्लक आहेत. सुर्याचा पारा आणखी किती दिवस तिव्र राहणार, याची नागरिकांना चिंता असतानाच पाणी टंचाईनेही तोंडचे पाणी पळविले आहे. पहाडावरील गावांना घागरभर पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. नाईलाजाने दूषित पाणी पिऊन तहान भागवित आहेत. मात्र प्रशासन सर्व आलबेल असल्याचे सांगत हातावर हात ठेवून गप्प आहे. उल्लेखनीय असे की जिवती तालुक्यातील गावे टंचाईमुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केल्याची बतावणी करीत असले तरी पाणी टंचाईची झळ मात्र पहाडावर जीवघेणी ठरत आहे. तालुक्यातील घनपठार, जनकापूर, पाटागुडा, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, गढपांढरवणी, खडकी, हिरापूर, पोचगुडा, नगराळा, लेंडीगुडा, जानकपठार, लोलडोह, टाटाकोहाड, भुरी येसापूर, गोंदापूर, भोस्कापूर, संगणापूर, आनंदगुडा, चिलाटीगुडा, चलपतगुडा, गोंडगुडा (मरकागोंदी), घाटराईगुडा, पाळडोह, चिखली, घोडणकप्पी, सेवादासनगर, हिमायतनगर, परमडोली, मुकादमगुडा, देशमुखगुडा, धाबा, राहपल्ली अशा अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. काही आदिवासी गुडे नाल्यात डबके खोदून दूषित पाण्यावर आपली तहान भागवित आहे. गावात असलेल्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंतच पुरले. त्यानंतर टँकरने पाणी पुरवठा केल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे पहाडावरील बहुतांश टंचाईग्रस्त गावात टँकर पोहचले नाही. त्यामुळे पहाडावरील नागरिकांना घागरभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पाण्याचे महत्त्व एवढे वाढले आहे की लहान -मुलांनाही पाणी आणण्यासाठी भरउन्हात पाठविले जात आहे. अनेक गावात महिलांच्या डोक्यावर पाण्याची घागर घेऊन दोन ते तीन मैल अंतरावर भटकंती करावी लागत आहे.लग्नकार्यात येतात विघ्नअनेक तरुणांनी आपल्या जन्माचा साथीदार निवडला आहेत. काही जण तयारीत आहे. मात्र पाणी टंचाईमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लग्नकार्यात येणाऱ्या वऱ्हाड्यांना पाणी पाजायचे कुठून, असा प्रश्न निर्माण होत आहे. काही प्रतिष्ठीत व्यक्ती टँकरने पाणी विकत घेत वऱ्हाड्यांची सोय करताना दिसत आहे. गरीब कुटुंबावर मात्र अनेक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे होतात आजारगावात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. पण नियमित ब्लिचींग पावडर टाकत नाही. पाणी उपसा करीत नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. ब्लिचींग पावडर टाकले तरी ते प्रमाणानुसार टाकले जात नाही. त्यामुळेसुद्धा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.खड्डे खोदून कोलाम भागवितात तहानप्रत्येक नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पिण्यास मिळावे, यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयोग राबविले जाते. पिण्याच्या पाण्यासाठी पाण्यासारखा खर्चही केला जातो. तरी पण पहाडावरील खडकी, मच्छीगुडा, चलपतगुडा, अशा अनेक गुड्यांतील नागरिक अजूनही खड्डे खोदून दूषित पाण्यावरच तहान भागवत आहे.