शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

गावकऱ्यांनी घेतली स्वच्छतेची प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:03 IST

तालुक्यातील इवलेसे खेडेगाव गुजगव्हाण. ज्या गावाने बालपण दिले. तिथल्या शाळेनेच लिहितावाचता केले. त्या शाळेचा मुख्याध्यापक होण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करून गाव व शाळेच्या ऋणातून मुक्त होता यावे या हेतूने येथे रूजू झालेल्या प्रल्हाद बोरकर यांनी गावात स्वच्छता अभियान राबवून गावाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याकरिता सर्व ग्रामस्थांना एकत्र आणले.

ठळक मुद्देगाव झाले चकचकीत : स्वच्छतेतून समृद्धीकडे गुजगव्हाणची वाटचाल

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील इवलेसे खेडेगाव गुजगव्हाण. ज्या गावाने बालपण दिले. तिथल्या शाळेनेच लिहितावाचता केले. त्या शाळेचा मुख्याध्यापक होण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करून गाव व शाळेच्या ऋणातून मुक्त होता यावे या हेतूने येथे रूजू झालेल्या प्रल्हाद बोरकर यांनी गावात स्वच्छता अभियान राबवून गावाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याकरिता सर्व ग्रामस्थांना एकत्र आणले. प्रल्हाद बोरकर यांनी गावाच्या हृदयात हात घातला. हृदयसंवाद साधत गावाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. स्वच्छतेमुळे मनेही स्वच्छ राहतात. आपली प्रगती होते, हे त्यांनी पटवून दिले. टाळ्यांच्या कडकडाटासह गावकºयांनी दाद दिली आणि कृती कार्यक्रम ठरला. यातूनच सुरेख सुंदर गावासाठी प्रतिज्ञा स्फुरली. जी प्रत्येक गावासाठी प्रेरणादायी ठरु शकेल.चिमूर पं. स. अंतर्गत येत असलेल्या गुजगव्हान या गावातील तुंबलेल्या नाल्यातील साचलेले पाणी गावाच्या आरोग्याला हानीकारक ठरू लागले होते. या पार्श्वभूमीवर गुरुजींनी केलेले ग्रामस्वच्छतेचे आवाहन प्रासंगिक असल्याचे जाणून गावाने स्वच्छतेचा निर्धार केला. एक दिवस गावासाठी देण्याकरिता सारा गाव तयार झाला. स्वच्छ सुंदर गावाची प्रतिज्ञा घेऊन सर्व गावकरी कामाला लागले.गावातून स्वच्छता रॅली काढून जाणीवजागृती करण्यात आली. गावातील सर्व महिला-पुरुष, बालगोपाल ग्रामस्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी झाले आणि गावाला खरे चळवळीचे रुप आले. पाहता-पाहता गाव स्वच्छ चकचकीत झाले. आज गावात एक वेगळे चैतन्य संचारले आहे. गाव स्वच्छ, हागणदारीमुक्त व व्यसनमुक्त गाव झालेच पाहिजे. या जाणिवेतून सर्व ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. माजी सरपंच माणिकराव निखाडे यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली. पोलीस पाटील युवराज मेश्राम, सरपंच ए.आर.धोटे दुर्योधन दहेकार, प्रमोद पाटील, सुधाकर राजनहिरे उपस्थित होते. श्रमदानातून गावाचा कायापालट होऊ शकतो, याचा वस्तूपाठ गावाने गिरवला. या स्वच्छता अभियानाला सरपंच ए.आर.धोटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुर्योधन दहेकार, प्रमोद पाटील, सुधाकर राजनहिरे, शाळा व्यवस्थापन सदस्य, युवक मंडळ, महिला बचत गट तथा ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गावाला स्वच्छ, सुंदर, हागनदारीमुक्त करून व्यसनमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.