शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी रोखले दिंदोडा प्रकल्पाचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:29 IST

पुनर्वसनाशिवाय प्रकल्पाचे बांधकाम करू नये, यासाठी सातत्याने आंदोलन करूनही प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने दिंदोडा येथील गावकऱ्यांनी रविवारी दिंदोडा सिंचन प्रकल्पाचे काम थांबविले. गावाचे पुनर्वसन करून प्रत्येक कुटुंबाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देअसंतोष : पुनर्वसनाशिवाय काम सुरू न करण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : पुनर्वसनाशिवाय प्रकल्पाचे बांधकाम करू नये, यासाठी सातत्याने आंदोलन करूनही प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने दिंदोडा येथील गावकऱ्यांनी रविवारी दिंदोडा सिंचन प्रकल्पाचे काम थांबविले. गावाचे पुनर्वसन करून प्रत्येक कुटुंबाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.तालुक्यातील दिंदोडा गावालगत दिंदोडा सिंचन प्रकल्प आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रकल्पाचे रखडलेले काम सुरु करण्यात आले. जलसंपदा विभागाने एका कंपनीला प्रकल्पाचे काम दिले. प्रकल्पाचे भूमिपूजन राज्य शासनाकडून केले जाणार होते. परंतु गावकऱ्यांनी विविध मागण्या पुढे ठेवल्या. मागण्यांची पूर्तता झाल्यानंतरच काम सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी होती. परंतु राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून थेट बांधकामाला सुरू केली. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.प्रकल्प जमीन गेलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केल्याशिवाय बांधकाम सुरू न करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला होता. दरम्यान, रविवारी प्रकल्पस्थळी जावून बांधकाम बंद केले. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासोबतच औद्योगिक व पिण्यांच्या पाण्यासाठी वापर होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी केला आहे.दिंडोडा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबतचा निर्णय महसूल विभागाकडून घेतला जातो. पाटबंधारे विभागाच्या कक्षेत येणारे निर्णय वरिष्ठांच्या आदेशानुसार घेतल्या जाते. प्रकल्पग्रस्तांना निश्चितपणे न्याय मिळेल.- एस.एस. वाकोडे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, वरोरा