शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

अन् प्रेमनगरातील ग्रामस्थांनी गावच सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:03 IST

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या प्रेमनगरातील ग्रामस्थांवर आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे अखेर गावच सोडून देण्याची पाळी आली.

ठळक मुद्देदहा वर्षांची वस्ती क्षणार्धात ओसाड : गावाला पोलीस छावणीचे स्वरुप

शंकर चव्हाण।आॅनलाईन लोकमतजिवती : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या प्रेमनगरातील ग्रामस्थांवर आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे अखेर गावच सोडून देण्याची पाळी आली. वाद विकोपाला जाऊन एखादी अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनीच यासाठी ग्रामस्थांचे समुपदेशन केले. त्याला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी हा निर्णय घेत सोमवारी आपले बस्तान सेवादासनगरात हलविले.जिवतीपासून २७ कि.मी. अंतरावर असलेल्या नोकेवाडा ग्रा.पं. मधील प्रेमनगरातील नागरिक उदरनिर्वाहासाठी सेवादासनगरातून स्थलांतरित झाले होते. दहा वर्षांपूर्वी प्रेमनगरात येऊन त्यांनी आपली वस्ती थाटली होती. गाव महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असल्याने नोकेवाडा ग्रामपंचायतींतर्गत प्रेमनगरात सिमेंट रस्ता व पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. आणि आता गावात विजेचे खांबही आले होते. दरम्यान, तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून बंजारा व आदिवासी समाजात वाद पेटला आहे. विशेष म्हणजे, प्रेमनगर गावाची महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा राज्यातही नोंद झाली आहे. ग्रामस्थांची नावेसुद्धा तेलंगणातील मतदान यादीत समाविष्ट झाली आहे. हीच बाब तेलंगणा राज्यातील कोलामा येथील नागरिकांच्या मनात खटकत होती. आता प्रेमनगरातील ग्रामस्थसुद्धा आपल्या आरक्षणाचा फायदा घेत सुविधा घेतील, असा समज झाल्याने तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरात हल्ला चढविला. गाव उठवा नाहीतर घरे जाळू व जिवानिशी मारू, अशा धमक्या दिल्या. याबाबत प्रेमनगरातील ग्रामस्थांनी पोलिसात तक्रार करून संरक्षक मागितले. निवेदन दिल्यानंतर पुन्हा तेलंगणातील लोकांनी प्रेमनगरात येऊन गोंधळ घातला. सोमवारपर्यंत गाव न हटविल्यास घरे जाळून टाकू, असा इशारा देत लोकांनी प्रेमनगरातील एका मांडवाला आग लावली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस विभागाने प्रेमनगरात दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त कुमक पाठवून तगडा बंदोबस्त लावला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तेलंगणातील लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा रोष वाढतच असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी प्रेमनगरातील ग्रामस्थांचेच समुपदेशन करीत त्यांना सेवादासनगरात हलविले.