शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पेल्लोरा येथे गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:29 IST

गोवरी : राजुरा तालुक्यातील पेल्लोरा गावात मार्च महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली ...

गोवरी : राजुरा तालुक्यातील पेल्लोरा गावात मार्च महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राजुरा तालुका स्थळापासून २५ किमी. अंतरावर असलेल्या पेल्लोरा येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जेमतेम १ हजार ३७० लोकसंख्या असलेल्या गावात पाण्यासाठी सरकारी हातपंप असेल तरी काही हातपंप आटले तर काही हातपंप अखेरच्या घटका मोजत आहे. दरवर्षी पेल्लोरा गावात पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यावर्षीही गावकऱ्यांच्या वाट्याला पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.

येथील सरपंच कल्पना झाडे, उपसरपंच मंगेश भोयर यांनी प्रशासनाकडे पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा केला. गावकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत येथील नागरिक विनोद झाडे, रुपेश दुबे यांच्या शेतातील बोअरवेलमधून बाबाकर राजूरकर यांच्या ट्रॅक्टरवर टँकरने व काही सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या नागरिकांकडून पाणी देऊन तात्पुरती सोय करून दिली. पेल्लोरा परिसरात उन्हाळ्यापूर्वीच पाण्याची पातळी खालावत असल्याने अनेक घरगुती बोअरवेलला पाणी येत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

पेल्लोरा गावात मागील काही दिवसांपासून पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावात पूर्वीपासून पाण्यासंबंधी तुटवडा आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना गावात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त आहे. याकडे प्रशासनाने गावकऱ्यांची पाणी समस्या लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.

बाॅक्स

परिसरात पाण्याचे जलस्त्रोत आटले

पेल्लोरा,चार्ली, निर्ली, धिडसी, मारडा नदीपट्यात दरवर्षी पाण्याची स्थिती अतिशय बिकट असते. यावर्षी मार्च महिन्यातच पाण्याची समस्या जाणवू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गावकऱ्यांची पाण्याची समस्या दूर करावी.