शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

कन्हाळगाव अभयारण्याला गावकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:53 IST

चंद्रपूर : राज्य शासनाने नुकतेच कन्हाळगाव अभयारण्य म्हणून घोषणा केली. मात्र त्याचा परिणाम परिसरातील ३३ गावांवर पडणार असून त्यांचा ...

चंद्रपूर : राज्य शासनाने नुकतेच कन्हाळगाव अभयारण्य म्हणून घोषणा केली. मात्र त्याचा परिणाम परिसरातील ३३ गावांवर पडणार असून त्यांचा रोजगार हिरावण्याची भीती गावकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे हे कन्हारगाव अभयारण्य रद्द करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कन्हारगाव, झरण, धाबा, तोहोगाव वनक्षेत्राचा २६९ चौ. कि.मी क्षेत्र अभयारण्य करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. तालुक्यातील ४२ हजार १४४ लोकसंख्यांची ३३ गावे बाधित होणार आहेत. येथील २७०० ते २८०० मजूर जंगलाच्या कामावर अवलंबून आहेत. या परसिरातील शेतकरी, शेतमजूर व वनकामगार आणि जंगलापासून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून असणाऱ्या मजुरांचा रोजगार प्रभावित होण्याची शक्यता आहे. तसेच पाळीव प्राण्यांना जंगलात चारईची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे कन्हारगाव अभयारण्य रद्द करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी प्रमोद कातकर, गणेश चचाणे, विश्वनाथ मंडळ. हेमंत कुसराम, अमोल नसुरवार, सत्यावान जीवणे, अरुण धकाते, ज्ञानेश्वर मरस्कोल्हे, विनोद पोनलवार, संदीप जाधव, उत्तम मंडळ आदी उपस्थित होते.