शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

ग्रामपंचायतीमधून ग्रामस्थांना मिळतो अर्धा किलो भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:31 IST

शंकरपूर : ग्रामपंचायत नेहमीच नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवत असते. तरुण सरपंच झाला तर गाव विकासासोबतच एक नावीन्यपूर्ण उपक्रम ...

शंकरपूर : ग्रामपंचायत नेहमीच नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवत असते. तरुण सरपंच झाला तर गाव विकासासोबतच एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील असतो. असाच एक नावीन्यपूर्ण उपक्रम चिंचाळाशास्त्री या ग्रामपंचायतने प्रत्यक्षात उतरविला आहे. ग्रामपंचायतच्या रिकाम्या जागेत एक सुंदर परसबाग फुलविलेली आहे.

शंकरपूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचाळाशास्त्री हे जवळपास ५०० लोकसंख्येचे गाव आहे. तीन गावे मिळून ग्रामपंचायत स्थापन झालेली आहे. या सात सदस्यीय ग्रामपंचायतीने परसबाग हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविलेला आहे. या ग्रामपंचायतीची एक इमारत असून जवळपास २ हजार फूट जागा ही रिकामी राहत होती. दरवर्षी इथे काडीकचरा उगवत होता. नव्यानेच सरपंच म्हणून निवडून आलेल्या अरविंद राऊत यांनी या जागेत परसबाग निर्माण करण्याचा संकल्प केला. सर्व सदस्यांनी एकमताने या उपक्रमाला पाठिंबा दिला. जागेची नांगरणी, वखरणी व शेणखत टाकून परसबागेची निर्मिती करण्यात आली. या परसबागेत कारले, चवळी शेंगा, भेंडी व इतर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. ही परसबाग चांगली फुलली आहे. चवळीच्या शेंगा व कारल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. हे उत्पादन गावकऱ्यांसाठी मोफत देण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना या भाजीपाल्याची गरज आहे त्या व्यक्ती ग्रामपंचायत चपराशाच्या समक्ष कारले व चवळी शेंग तोडून घेऊन जातात. सर्वांना याचा लाभ मिळावा, यासाठी एका कुटुंबाला अर्धा किलोच्या वर भाजीपाला नेऊ देण्यात येत नाही. यामुळे चिंचाळाशास्त्री येथील कुटुंबीयांना या परसबागेतील भाजीपाला मोफत मिळत आहे. ग्रामपंचायतीने राबविलेला हा नावीन्यपूर्ण उपक्रम तालुक्यातील पहिलाच असावा, असे बाेलले जात आहे.

कोट

रिकाम्या जागेचा चांगला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून या परसबागेची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या कुटुंबाला गरज आहे अशा कुटुंबाला या परसबागेतील अर्धा किलो भाजीपाला मोफत देत आहोत.

- अरविंद राऊत, सरपंच, चिंचाळाशास्त्री.